शहरं
Join us  
Trending Stories
1
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
2
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
3
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
4
कोट्यवधी रुपयांची अफरातफर; भ्रष्टाचार केला म्हणून चीनच्या बँकरला मृत्युदंड
5
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
6
बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
7
संपादकीय : महायुतीचा नवा बूस्टर..! नागपूर अधिवेशनात चर्चा, मुनगंटीवारांची सभागृहात तुफान टोलेबाजी
8
नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईत सकाळच्या वेळी येता येईल का? संध्याकाळी परत जाता येईल का?
9
नवी मुंबई विमानतळावर तिसरीही धावपट्टी! दीर्घकालीन हवाई वाहतुकीचा आढावा; सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू
10
गोवा अग्निकांड; अपघात नव्हे, अक्षम्य बेपर्वाई! २५ जणांच्या मृत्यूनंतर मालकांचे थायलंडमध्ये पलायन
11
विमा क्षेत्रात १०० टक्के एफडीआय- सर्वांसाठीच बाधक! कोट्यवधी विमाधारकांची गुंतवणूक धोक्यात
12
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
13
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
14
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
15
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
17
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
18
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
19
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
20
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
Daily Top 2Weekly Top 5

घटक राज्यात भूमिपुत्रांना सर्वांगीण संरक्षण मिळायला हवे: दामोदर मावजो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2024 07:13 IST

आज गोव्याच्या घटक राज्याच्या ३७ व्या वर्धापनदिनी मागे वळून पाहताना मनात अनेक आवर्तने उठतात.

लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव: आज गोव्याच्या घटक राज्याच्या ३७ व्या वर्धापनदिनी मागे वळून पाहताना मनात अनेक आवर्तने उठतात. भारतांतर्गत सर्वात लहान असूनही अग्रगण्य म्हणून मान्यता पावलेला हा निर्सगरम्य प्रदेश एक घटक राज्य म्हणून मिरवत आहे, त्याचा सार्थ अभिमान आहेच, पण घटकराज्याला अपेक्षित फायदे गोव्याला मिळत आहेत काय? हा प्रश्न डोके वर काढतो, अशी प्रतिक्रिया ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावजो यांनी व्यक्त केली.

मावजो म्हणाले, पंडित जवाहरलाल नेहरू म्हणाले होते, अजीब है ये गोवा के लोक. केंद्र सरकार आपल्याला स्वायत्तता देऊ पाहत होते. आमच्या भाषेला संविधानात समाविष्ठ करू पाहत होते, तेव्हा आमचेच काही गोमंतकीय बंधू आम्हाला विलीनीकरण हवे आहे, आमच्या भाषेला बोली म्हणून हिणवून घेण्यात धन्यता पावत होते. सुदैवाने भविष्याचा वेध घेऊ शकणारे दूरदृष्टी असलेले सुपुत्र त्यावेळी हयात होते. त्यांनी आग्रह धरला म्हणून गोव्याच्या कोकणी भाषेला स्वतंत्र साहित्यिक भाषा म्हणून मान्यता मिळाली म्हणून राज्य भाषेचा दर्जा मिळाला. संविधानाच्या आठव्या परिशिष्टात समावेशही झाला म्हणून गोव्याला घटक राज्याचा दर्जा प्राप्त झाला.

घटक राज्यात भूमिपुत्रांना जे सर्वांगीण संरक्षण मिळायला हवे ते अपेक्षित प्रमाणात मिळत नाही. स्व भाषेला शिक्षणात राज्य कारभारात हवे तेवढे महत्त्व दिले जात नाही. नव्या एमपीटी येथील जमिनी, कोमुनिदादी यांचा उपयोग केंद्र सरकारला हवा तसा केला जातो. राज्यातील धार्मिक आणि सामाजिक सहिष्णूता, सलोखा हळूहळू धोक्यात येत आहे. त्याकडे डोळेझाक करून चालणार नाही. पण आजचा दिवस हा गोमंतकीय अस्मितेचा गौरव करणारा आहे. उणीवांवर चर्चा अवश्य झाली पाहिजे. पण ती ही वेळ नव्हे, असेही मावजो म्हणाले.

प्रगतीचा आराखडा आखावा लागेल: खलप

राज्याला घटक राज्याचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर देशातील इतर घटक राज्यांत आपल्याला मानाचे स्थान प्राप्त झाले. आपल्या राज्याच्या तुलनेत देशातील इतर राज्ये आपल्यापेक्षाही व्याप्तीने, लोकसंख्येने, साध- नसुविधा तसेच इतर क्षेत्रांत मोठी असली तरी आपले वेगळेपण गोमंतकाला देशात राखता आले ही आपली जमेची बाजू आहे, असे मत माजी केंद्रीय मंत्री अॅड. रमाकांत खलप यांनी व्यक्त केली.

अॅड. खलप म्हणाले की, घटक राज्यासोबत संपूर्ण जगाचे लक्ष आपल्याकडे वेधले गेले. त्यातून जी रीघ आपल्याकडे लागली आहे आणि जे काही सामाजिक प्रश्न निर्माण झाले, तेही तेवढेच महत्त्वाचे आहे. त्याकडे लक्ष पुरवणे सरकारचे, लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे.

साधले भरपूर, पण त्याचबरोबर गोव्याच्या भवितव्याची समस्या जी आपल्याला जाणवली ती म्हणजे या ओघामुळे किंवा प्रगतीच्या रूपाने पुढे नेण्याच्या प्रयत्नाने आपली भाषा, संस्कृती आपण हरवून बसू का, ही भीती निर्माण होऊ लागली आहे.

तेव्हा गोव्याची जी क्षमता आहे, ती क्षमता तसेच आगामी १०० तथाकथित प्रगतीचा आराखडा आपल्याला आखावा लागेल. तसेच देशातील सुंदर अशा या आपल्या गोव्याचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील, असेही ते म्हणाले.

 

टॅग्स :goaगोवा