शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

आधारकार्ड लिंक करा, अन्यथा 'दयानंद'चे पैसे नाहीत! अर्जाची छाननी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 08:29 IST

मंत्री सुभाष फळदेसाई यांचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: दयानंद सामाजिक सुरक्षा योजना (डीडीएस) अंतर्गत समाजकल्याण खात्याकडे असलेल्या सर्व अर्जाची छाननी प्रक्रिया सुरू झाली आहे. छाननी दरम्यान असे लक्षात आले आहे की, अनेक लाभार्थ्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करण्यात आलेले नाही. त्यामुळे आता लाभार्थ्यांनी त्वरित आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करावे, अन्यथा खात्यात पैसे जमा होण्यास अडथळे निर्माण होणार आहेत, अशी माहिती समाजकल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली.

लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी ३० एप्रिल २०२५ पूर्वी लिंक करणे गरजेचे आहे. याबाबत मुदतवाढ तवाढ देखील दिली जाणार नाही. केवळ दयानंद सामाजिक सुरक्षा योजनाच नाही तर समाजकल्याण खात्याच्या इतर योजनांचा लाभघेण्यासाठी या गोष्टी आवश्यक आहेत. त्यामुळे लोकांनी त्वरित आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक करावे. अन्यथा योजनांचे पैसे मिळणे कठीण होईल, असेही मंत्री फळदेसाई यांनी सांगितले.

३० कोटी वसूल

गेल्या दोन वर्षांपासून आम्ही कडकपणे अर्जाची छाननी करत आहोत. अनेकदा आमच्या लक्षात आले की लाभार्थ्यांचे मृत्यू होऊनही अनेक वर्षे त्यांच्या खात्यात पैसे गेले आहेत. तसेच लाभार्थी देशाबाहेर किंवा ही २ त्यांना पैसे जात आहेत, असे अनेक अर्ज रद्द केले आहेत. आतापर्यंत सुमारे ६००० अर्ज रद्द करण्यात आले असून अजूनही काही अर्ज रद्द होण्याच्या मार्गावर आहेत. यातून सुमारे ३० कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे.

दयानंद सामाजिक सुरक्षा योजना योग्य पद्धतीने सुरू राहावी. तसेच बोगस लाभार्थी यातून वगळे जावेत. यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे आधार कार्ड बैंक खात्याला लिंक केल्यास अशा बेकायदेशीर गोष्टींना आळा बसणार आहे. या गोष्टी करून घेण्यास आमच्या कर्मचाऱ्यांना देखील आम्ही कामाला लावले आहे. - सुभाष फळदेसाई, समाजकल्याण मंत्री 

टॅग्स :goaगोवाAdhar Cardआधार कार्ड