शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

जीवरक्षक किना-यावरचे जीवनदायी, 3 हजार लोकांचे वाचवले जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 19:13 IST

गोवा म्हणजे समुद्र किनारा. या किना-यावरील निसर्गाचे सौंदर्य लुटण्यासाठी येणा-या प्रत्येक व्यक्तीला पाण्यात उतरण्याचा मोह आवरत नाही.

म्हापसा : गोवा म्हणजे समुद्र किनारा. या किना-यावरील निसर्गाचे सौंदर्य लुटण्यासाठी येणा-या प्रत्येक व्यक्तीला पाण्यात उतरण्याचा मोह आवरत नाही. या मोहापायी पाण्यात उतरलेल्या अनेकांवर जीव गमावण्याची वेळ आली आहे. मग ती पोहता न आल्याने असो पाण्याच्या गतीमान प्रवाहामुळे असो किंवा नशेत असो. हा मोह आवरता यावा. लोकांचे बहुमूल्य जीव वाचवावे त्यांना सुरक्षा मिळावी म्हणून सरकारने किना-यावर जीव रक्षकांची नेमणूक केली आहे. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता प्रसंगी जीव धोक्यात घालून किना-यावर येणा-या लोकांना बहुमूल्य असे मार्गदर्शन करणा-या या जीव रक्षकांकडे किना-यावरील जीवनदायिनी म्हणून बघितले जाते. आता नवीन पर्यटन हंगाम सुरू झाल्याने पुन्हा त्याच आव्हानांना सामोरे जाण्यास ते सज्ज झाले आहेत. यांच्या नेमणुकीमुळे बुडून मरण्याच्या प्रकार ९९ टक्क्यांनी कमी झाले आहेत.विविध समुद्र किना-यांवर दृष्टीच्या वतीने सुमारे ६०० जीवरक्षक तैनात करण्यात आले आहेत. काही किना-यांवर सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत तर काही किना-यांवर रात्रीच्या वेळीही हे जीवरक्षक सेवा पुरवत असतात. पर्यटनाच्या बिगर हंगामी दिवसात सुद्धा किना-यावर सेवा बजावणा-या या जीव रक्षकांची खरी कसोटी हंगाम सुरू झाल्यानंतर लागते. डोळ्यात तेल घालून त्यांना लोकांच्या जीवाचे रक्षण करावे लागते. स्वत:चे जीव धोक्यात घालून हे जीवरक्षक लोकांचे जीव वाचवतात. राज्यातील महत्त्वाच्या समुद्र किना-यावर दृष्टीच्या जीवरक्षकांची सरकारने नेमणूक केली आहे.आॅक्टोबर २००८ पासून सुरू केलेल्या सेवेत अजूनपर्यंत ३ हजार लोकांचे जीव वाचवण्यात आले आहेत. यात २०१४ साली ४२५, २०१५ साली ३३०, २०१६ साली ४०८ तर या वर्षी अजूनपर्यंत १९५ लोकांचे प्राण जीवरक्षकांनी वाचवले आहेत. सरासरीवर प्रती किनारे १४ रक्षकांची नेमणूक केली जाते. कळंगुट तसेच कोलवा सारख्या किना-यावर २२ जणांची नेमणूक केली आहे. एकूण ३८ किना-यावर तसेच दूधसागर धबधब्यावर व मये येथील तलावावर त्याची नेमणूक केली आहे. यात उत्तरेतील १६ तर दक्षिणेतील २२ किना-यांचा समावेश आहे.ही सेवा उत्तरेतील केरी, हरमलपासून ते दक्षिणेतील पाळोळे पर्यंत महत्त्वाच्या किना-यांवर सुरू आहे. यात कळंगुट, मिरामार, बोगमाळो, वार्का तसेच इतर किना-यांचा समावेश आहे. मानवाच्या जीवाचे संरक्षण करताना समुद्र किना-यावर अंडी घालण्यासाठी येणा-या कासवांचे संवर्धन करणे, लोकांना मार्गदर्शन करणे तसेच इतर महत्त्वाची कामे हे जीवरक्षक जीवाची तमा न बाळगता अत्यंत कुशलतेने करतात. या जीवरक्षकांना अत्यंत चांगल्या तसेच उच्च दर्जाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.या सेवेत काम करणा-या जीवरक्षकांना प्रशिक्षणा बरोबर प्रथोमचार पुरवण्याचे प्रशिक्षणही देण्यात आले आहे. त्यामुळे बुडलेल्या लोकांना अनेकवेळा तिथल्या तिथे उपचार देऊन त्यांना वाचवण्यात आले आहे. लोकांनी पोहण्याची सुरक्षित जागाही त्यांच्या वतीने किनारी भागात लाल झेंडे लावून निर्देशित केली आहे. या जीवरक्षकांना सेवा देण्यासाठी वॉच टॉवर, जीव वाचवण्याच्या वापरात येणारी उपकरणे, सुचना फलक, विश्रांतीसाठी सुविधा तसेच इतर अनेक सुविधा पुरवण्यात आल्या आहेत.जीव वाचवण्यासाठी लागणारी सर्व उपकरणांनी ते युक्त आहेत. किना-यांवर पायी सुरक्षा पुरवताना वाहना वरुनही त्यांची सततची गस्त सुरूच असते. पुरूष रक्षका बरोबर महिला जीवरक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. या रक्षकांनी ब-याच समुद्र किना-यांवर सुरक्षित पोहण्याची जागा, महिलांसाठी पोहण्याची जागा, असुरक्षित पोहण्याची जागा निश्चित केली आहे. त्यामुळे त्याचा फायदा समुद्रात जाणा-या असंख्य लोकांना होत असतो. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता जीव धोक्यात घालून हे जीवरक्षक सेवा पुरवत असतात.या जीवरक्षकांच्या अनेक समस्या असून आपली जबाबदारी पार पाडताना अनेक वेळा त्यांना मारही खावा लागतो. दारू पिऊन किनारी भागात दंगा करणा-यांच्या त्रासाला सामोरे जावे लागते. नशेत असलेले लोक अनेकदा जीवरक्षकांनी दिलेला सल्ला न मानता समुद्रात उतरतात. त्यांचा विरोध न जुमानता ते त्यांना प्रवृत्त करीत असतात. प्रसंगी पोलिसांची सुद्धा मदत घेत असतात. किना-यावर येणा-या लोकांचे जीव वाचवण्यास दृष्टीचे जीवरक्षक सततपणे मेहनत घेत असल्याची माहिती दृष्टीचे सरव्यवस्थापक पी. एन. पांडे यांनी दिली.