शहरं
Join us  
Trending Stories
1
टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
2
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
3
UPSC कँडिडेट हत्येप्रकरणी मोठा खुलासा; घरातील हार्ड ड्राइव्हमध्ये १५ महिलांचे अश्लील फोटो
4
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
5
ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर काळाच्या पडद्याआड! वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
6
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
7
कॉफीसाठी जगभरात प्रसिद्ध असलेला 'हा' देश मोठ्या संकटात! यावर्षीच्या सगळ्यात भयंकर विनाशाला सामोरा जाणार
8
पेटीएम, जीपे, फोनपेवरील ऑटो पे कसे बंद कराल? आपोआप जातायत सबस्क्रीप्शन, पेमेंटचे पैसे... 
9
CCTV फुटेजमध्ये भलत्याच ठिकाणी दिसला आरोपी अन्...; अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात ट्विस्टवर ट्विस्ट
10
Aadhaar Card New Rules 1st Nov: महत्त्वाची बातमी! १ नोव्हेंबरपासून बदलणार आधार कार्डाशी निगडीत ३ मोठे नियम, जाणून घ्या
11
शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स ८४,८८० च्या पार; निफ्टीही वधारला, 'या' प्रमुख स्टॉक्समध्ये तेजी
12
वनप्लस १५ येतोय...! पण १४ क्रमांक का वगळला? चिनी संस्कृतीत असे काय आहे...
13
शंकर महाराज प्रकट दिन: म्हणा अकरा कवनांचे स्तोत्र, विजयी होईल सर्वत्र; कामना होतील पूर्ण
14
Bank Holidays November 2025: नोव्हेंबरमध्ये किती दिवस बँका राहणार बंद? पाहा RBI ची हॉलिडे लिस्ट, पटापट आटपा काम
15
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
16
१०० वर्षांनी महालक्ष्मीसह ४ राजयोग: ७ राशींना सुबत्ता, कल्याण; बक्कळ लाभ, यशाचा मंगलमय काळ!
17
Tulasi Vivah 2025: विष्णू हे लक्ष्मीपती असूनही दरवर्षी तुळशीशी का लावला जातो विवाह?
18
LIC ची ‘ही’ स्कीम गुंतवणूकदारांना बनवेल कोट्यधीश!; ४ वर्षापर्यंत भरा प्रीमिअम, मिळतील १ कोटी
19
"मी तुला कच्च खाऊन टाकेन"; बायकोने नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, चपलेने धू-धू धुतलं
20
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक

जीवरक्षक किना-यावरचे जीवनदायी, 3 हजार लोकांचे वाचवले जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 19:13 IST

गोवा म्हणजे समुद्र किनारा. या किना-यावरील निसर्गाचे सौंदर्य लुटण्यासाठी येणा-या प्रत्येक व्यक्तीला पाण्यात उतरण्याचा मोह आवरत नाही.

म्हापसा : गोवा म्हणजे समुद्र किनारा. या किना-यावरील निसर्गाचे सौंदर्य लुटण्यासाठी येणा-या प्रत्येक व्यक्तीला पाण्यात उतरण्याचा मोह आवरत नाही. या मोहापायी पाण्यात उतरलेल्या अनेकांवर जीव गमावण्याची वेळ आली आहे. मग ती पोहता न आल्याने असो पाण्याच्या गतीमान प्रवाहामुळे असो किंवा नशेत असो. हा मोह आवरता यावा. लोकांचे बहुमूल्य जीव वाचवावे त्यांना सुरक्षा मिळावी म्हणून सरकारने किना-यावर जीव रक्षकांची नेमणूक केली आहे. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता प्रसंगी जीव धोक्यात घालून किना-यावर येणा-या लोकांना बहुमूल्य असे मार्गदर्शन करणा-या या जीव रक्षकांकडे किना-यावरील जीवनदायिनी म्हणून बघितले जाते. आता नवीन पर्यटन हंगाम सुरू झाल्याने पुन्हा त्याच आव्हानांना सामोरे जाण्यास ते सज्ज झाले आहेत. यांच्या नेमणुकीमुळे बुडून मरण्याच्या प्रकार ९९ टक्क्यांनी कमी झाले आहेत.विविध समुद्र किना-यांवर दृष्टीच्या वतीने सुमारे ६०० जीवरक्षक तैनात करण्यात आले आहेत. काही किना-यांवर सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत तर काही किना-यांवर रात्रीच्या वेळीही हे जीवरक्षक सेवा पुरवत असतात. पर्यटनाच्या बिगर हंगामी दिवसात सुद्धा किना-यावर सेवा बजावणा-या या जीव रक्षकांची खरी कसोटी हंगाम सुरू झाल्यानंतर लागते. डोळ्यात तेल घालून त्यांना लोकांच्या जीवाचे रक्षण करावे लागते. स्वत:चे जीव धोक्यात घालून हे जीवरक्षक लोकांचे जीव वाचवतात. राज्यातील महत्त्वाच्या समुद्र किना-यावर दृष्टीच्या जीवरक्षकांची सरकारने नेमणूक केली आहे.आॅक्टोबर २००८ पासून सुरू केलेल्या सेवेत अजूनपर्यंत ३ हजार लोकांचे जीव वाचवण्यात आले आहेत. यात २०१४ साली ४२५, २०१५ साली ३३०, २०१६ साली ४०८ तर या वर्षी अजूनपर्यंत १९५ लोकांचे प्राण जीवरक्षकांनी वाचवले आहेत. सरासरीवर प्रती किनारे १४ रक्षकांची नेमणूक केली जाते. कळंगुट तसेच कोलवा सारख्या किना-यावर २२ जणांची नेमणूक केली आहे. एकूण ३८ किना-यावर तसेच दूधसागर धबधब्यावर व मये येथील तलावावर त्याची नेमणूक केली आहे. यात उत्तरेतील १६ तर दक्षिणेतील २२ किना-यांचा समावेश आहे.ही सेवा उत्तरेतील केरी, हरमलपासून ते दक्षिणेतील पाळोळे पर्यंत महत्त्वाच्या किना-यांवर सुरू आहे. यात कळंगुट, मिरामार, बोगमाळो, वार्का तसेच इतर किना-यांचा समावेश आहे. मानवाच्या जीवाचे संरक्षण करताना समुद्र किना-यावर अंडी घालण्यासाठी येणा-या कासवांचे संवर्धन करणे, लोकांना मार्गदर्शन करणे तसेच इतर महत्त्वाची कामे हे जीवरक्षक जीवाची तमा न बाळगता अत्यंत कुशलतेने करतात. या जीवरक्षकांना अत्यंत चांगल्या तसेच उच्च दर्जाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.या सेवेत काम करणा-या जीवरक्षकांना प्रशिक्षणा बरोबर प्रथोमचार पुरवण्याचे प्रशिक्षणही देण्यात आले आहे. त्यामुळे बुडलेल्या लोकांना अनेकवेळा तिथल्या तिथे उपचार देऊन त्यांना वाचवण्यात आले आहे. लोकांनी पोहण्याची सुरक्षित जागाही त्यांच्या वतीने किनारी भागात लाल झेंडे लावून निर्देशित केली आहे. या जीवरक्षकांना सेवा देण्यासाठी वॉच टॉवर, जीव वाचवण्याच्या वापरात येणारी उपकरणे, सुचना फलक, विश्रांतीसाठी सुविधा तसेच इतर अनेक सुविधा पुरवण्यात आल्या आहेत.जीव वाचवण्यासाठी लागणारी सर्व उपकरणांनी ते युक्त आहेत. किना-यांवर पायी सुरक्षा पुरवताना वाहना वरुनही त्यांची सततची गस्त सुरूच असते. पुरूष रक्षका बरोबर महिला जीवरक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. या रक्षकांनी ब-याच समुद्र किना-यांवर सुरक्षित पोहण्याची जागा, महिलांसाठी पोहण्याची जागा, असुरक्षित पोहण्याची जागा निश्चित केली आहे. त्यामुळे त्याचा फायदा समुद्रात जाणा-या असंख्य लोकांना होत असतो. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता जीव धोक्यात घालून हे जीवरक्षक सेवा पुरवत असतात.या जीवरक्षकांच्या अनेक समस्या असून आपली जबाबदारी पार पाडताना अनेक वेळा त्यांना मारही खावा लागतो. दारू पिऊन किनारी भागात दंगा करणा-यांच्या त्रासाला सामोरे जावे लागते. नशेत असलेले लोक अनेकदा जीवरक्षकांनी दिलेला सल्ला न मानता समुद्रात उतरतात. त्यांचा विरोध न जुमानता ते त्यांना प्रवृत्त करीत असतात. प्रसंगी पोलिसांची सुद्धा मदत घेत असतात. किना-यावर येणा-या लोकांचे जीव वाचवण्यास दृष्टीचे जीवरक्षक सततपणे मेहनत घेत असल्याची माहिती दृष्टीचे सरव्यवस्थापक पी. एन. पांडे यांनी दिली.