शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

कायदा हाती घेणाऱ्यांना रासुका लावू, आयजीपींचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 20:08 IST

सांताक्रूझ टोळी युद्ध हे दोन गटातील वैमन्‍यासातून झाले असले तरी त्याचा त्रास लोकांना झालेला आहे. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांना कडक  कारवाई करण्याचा इशारा मुख्यालयातून देण्यात आला आहे.

पणजी: कायदा हाती घेणाऱ्यांविरुद्ध राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली (रासुका) कारवाई करण्याचा इशारा पोलीस महानिरीक्षक जसपाल सिंग यांनी दिला आहे. सांताक्रूझ गँगवॉरनंतर झालेल्या एका महत्त्वाच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.  

सांताक्रूझ टोळी युद्ध हे दोन गटातील वैमन्‍यासातून झाले असले तरी त्याचा त्रास लोकांना झालेला आहे. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांना कडक  कारवाई करण्याचा इशारा मुख्यालयातून देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस अधिकाऱ्यांच्या झालेल्या एका तातडीच्या बैठकीत रासुका लागू करण्यासंबंधी चर्चा झाली. कायदा सुव्यवस्था बिघडवू पाहणा-यांविरुद्ध गरज पडल्यास रासुका लावण्याचा पर्यायही पोलीस खात्याने खुला ठेवला आहे. 

या बैठकीत त्यावर  शिक्कामोर्तबही झाल्याची माहिती पोलीस मुख्यालयानेच जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.  शिवाय, गुन्हेगारी पार्श्वभूमीवर असलेल्यांची यादी करून त्यांना तडीपार करण्याचीही प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे. 

एकूण 13 टोळी युद्धवाल्यांना अटकपोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा केलेल्या कारवाईत सांताक्रूझ टोळी युद्धातील संशयित नागोवा येथील सर्वेश दिवकर, व्हडलें भाट येथील यासीन नामक युवक, करंजाळे येथील साहील नामक युवकाला तसेच, सांताक्रूझ येथील जयेश नामक युवकाला अटक करण्यात आली. या चार जणांना अटक करण्यापूर्वी टोळी युद्धाच्या दिवशी 9 जणांना अटक करण्यात आली होती. शिवाय दोघे अल्पवयीनही या प्रकरणात आढळले होते. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांची संख्या आता 13 झाली आहे.  आणखी किमान 4 जण दडून बसल्याचा संशय पोलिसांना आहे. 

टॅग्स :goaगोवा