शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

कायदा हाती घेणाऱ्यांना रासुका लावू, आयजीपींचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 20:08 IST

सांताक्रूझ टोळी युद्ध हे दोन गटातील वैमन्‍यासातून झाले असले तरी त्याचा त्रास लोकांना झालेला आहे. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांना कडक  कारवाई करण्याचा इशारा मुख्यालयातून देण्यात आला आहे.

पणजी: कायदा हाती घेणाऱ्यांविरुद्ध राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली (रासुका) कारवाई करण्याचा इशारा पोलीस महानिरीक्षक जसपाल सिंग यांनी दिला आहे. सांताक्रूझ गँगवॉरनंतर झालेल्या एका महत्त्वाच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.  

सांताक्रूझ टोळी युद्ध हे दोन गटातील वैमन्‍यासातून झाले असले तरी त्याचा त्रास लोकांना झालेला आहे. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांना कडक  कारवाई करण्याचा इशारा मुख्यालयातून देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस अधिकाऱ्यांच्या झालेल्या एका तातडीच्या बैठकीत रासुका लागू करण्यासंबंधी चर्चा झाली. कायदा सुव्यवस्था बिघडवू पाहणा-यांविरुद्ध गरज पडल्यास रासुका लावण्याचा पर्यायही पोलीस खात्याने खुला ठेवला आहे. 

या बैठकीत त्यावर  शिक्कामोर्तबही झाल्याची माहिती पोलीस मुख्यालयानेच जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.  शिवाय, गुन्हेगारी पार्श्वभूमीवर असलेल्यांची यादी करून त्यांना तडीपार करण्याचीही प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे. 

एकूण 13 टोळी युद्धवाल्यांना अटकपोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा केलेल्या कारवाईत सांताक्रूझ टोळी युद्धातील संशयित नागोवा येथील सर्वेश दिवकर, व्हडलें भाट येथील यासीन नामक युवक, करंजाळे येथील साहील नामक युवकाला तसेच, सांताक्रूझ येथील जयेश नामक युवकाला अटक करण्यात आली. या चार जणांना अटक करण्यापूर्वी टोळी युद्धाच्या दिवशी 9 जणांना अटक करण्यात आली होती. शिवाय दोघे अल्पवयीनही या प्रकरणात आढळले होते. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांची संख्या आता 13 झाली आहे.  आणखी किमान 4 जण दडून बसल्याचा संशय पोलिसांना आहे. 

टॅग्स :goaगोवा