शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'म्हादई'बाबत विधितज्ज्ञ, सदस्यांनी पाहणी करावी, कर्नाटकच्या कामाचा पर्दाफाश करावा: राजेंद्र केरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2025 09:29 IST

समितीची आज बैठक 

लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : राज्य सरकारने म्हादईप्रश्नी अभ्यास करण्यासाठी जी गृह समिती स्थापन केली आहे, त्याची प्रदीर्घ काळानंतर आज, बुधवारी विधानसभेत दुसरी बैठक होणार आहे. दरम्यान, 'म्हादई' बाबत विधीतज्ज्ञ, सदस्यांनी पाहणी करावी अशी मागणी पर्यावरण चळवळीतील कार्यकर्ते राजेंद्र केरकर यांनी केली आहे.

कर्नाटकाने कळसा प्रकल्पाचे काम पूर्णत्वाकडे नेल्याने आणि कणकुंबी येथील कळसा नाल्याचे पाणी मलप्रभेत वळविण्यास त्यांना यश मिळाल्यानंतर आता हलतरा, सुर्ला आणि भांडुरा यांचे काम पूर्ण करण्यासाठी त्यांनी पूर्ण तयारी केलेली आहे. त्याबाबत सरकारने जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांच्या अध्यक्षतेखाली सत्तारुढ आणि विरोधी आमदारांच्या सहभागाने समिती नेमली आहे. या समितीचे एकच बैठक झाली आहे. आमदार विजय सरदेसाई यांनी सरकारला पत्र लिहिल्यानंतर आता दुसरी बैठक होत आहे, अशी माहिती राजेंद्र केरकर यांनी दिली.

सध्या म्हादई संदर्भात गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक यांनी सादर केलेल्या याचिका म्हादई जलविवाद लवादाबरोबरच सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी प्रतीक्षेत आहेत. राज्य सरकार कायदा सल्ल्यासाठी कोट्यवधींचा खर्च करत असून त्यातून कोणतीच निष्पत्ती होताना दिसून येत नाही.

केरकर म्हणाले की, सध्या व्याघ्र मार्ग या महत्त्वाच्या मुद्द्यावर कर्नाटक सरकारला आवश्यक पर्यावरण वन मंत्रालयाचा दाखला प्राप्त झालेल्या नाही. तो मिळवण्यासाठी कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या वारंवार पंतप्रधान व इतर नेत्यांना भेटत आहेत आणि त्यातून ते दबाव तंत्र वापरत आहेत.

सर्व कायदा सल्लागारांनी कळसा- भांडूरा नाल्याच्या प्रकल्पास भेट देऊन प्रकल्पाचे गांभीर्य समजून घेण्याची गरज असल्याचे मत राजेंद्र केरकर यांनी व्यक्त केले आहे. कर्नाटकने कळसाचे पाणी मालप्रभेत वळवले असून राज्य सरकारने हे लवाद आणि न्यायालयासमोर सिद्ध करण्यासाठी हवी तशी पूर्वतयारी केलेली दिसत नाही अशी खंत केरकर यांनी व्यक्त केली.

सरकारने गांभीर्याने काम करण्याची गरज

राज्याचे हित जपण्यासाठी वकिलांचे पथक तसेच सभागृह समितीने प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करण्यासाठी कणकुंबी येथे जाऊन सर्व गोष्टी समजून घेणे गरजेचे आहे. सरकारने सध्या घेतलेली भूमिका म्हणेज डोंगर पोखरून उंदीर काढल्यासारखी स्थिती आहे. सरकारने अधिक गांभीर्याने काम करण्याची गरज असल्याचे राजेंद्र केरकर यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :goaगोवाriverनदी