शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
2
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
3
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
4
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
5
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
6
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
7
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
8
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
9
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
10
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
11
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
12
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
13
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
14
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
15
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
16
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
17
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
18
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
19
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
Daily Top 2Weekly Top 5

सरकारला आजारी रजा द्या, विरोधकांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2018 18:30 IST

गोव्यातील विद्यमान भाजपाप्रणीत आघाडी सरकारमधील मंत्री एका पाठोपाठ आजारी पडू लागल्याने विरोधकांनी सरकारविरुद्ध नव्याने रान उठविणे सुरू केले आहे.

पणजी : गोव्यातील विद्यमान भाजपाप्रणीत आघाडी सरकारमधील मंत्री एका पाठोपाठ आजारी पडू लागल्याने विरोधकांनी सरकारविरुद्ध नव्याने रान उठविणे सुरू केले आहे. मुख्यमंत्री, वीजमंत्री वगैरे इस्पितळात आहेत तर ज्येष्ठ मंत्री फ्रान्सिस डिसोझा हे विदेश दौ-यावर गेले आहेत. अशा वेळी राज्यपालांनी पूर्ण सरकारलाच आजारी रजा मंजूर करावी, अशी मागणी विरोधकांनी सुरू केली आहे.

यापूर्वी काँग्रेसने राज्यपालांना निवेदन सादर करून सरकार बरखास्त करण्याची मागणी केली होती. आपण बहुमत सिद्ध करू शकतो, असा दावा काँग्रेसने करून मुख्यमंत्री दीर्घकाळ अमेरिकेत असल्याने प्रशासन ठप्प झाले आहे, अशी टीका काँग्रेसने केली होती. मुख्यमंत्री विदेशातून जूनच्या अखेरीस परततील असे सांगितले जाते. पण त्याबाबत निश्चित अशी माहिती नाही असे काही मंत्र्यांचे म्हणणे आहे. वीज मंत्री पांडुरंग मडकईकर यांना सोमवारी ब्रेन स्ट्रोकचा झटका आला. ते मुंबईच्या कोकिळाबेन इस्पितळात उपचार घेत आहेत. ते अजूनही अतिदक्षता विभागात आहेत. नगरविकासमंत्री फ्रान्सिस डिसोझा हे मध्यंतरी अडीच महिने उपचारांसाठी विदेशात राहिले होते. त्यांच्याही आरोग्याविषयी प्रश्न आहेत. ते आता पोर्तुगालच्या दौ-यावर गेले आहेत. सध्या मंत्री विजय सरदेसाई, सुदिन ढवळीकर, विश्वजित राणे, रोहन खंवटे, माविन गुदिन्हो अशा चार-पाच मंत्र्यांकडूनच सरकार चालविले जात आहे.अन्य मंत्र्यांची कामेही होत नाहीत. ते पर्रीकर कधी परततील हे पाहण्यासाठी थांबले आहेत. पर्रीकर आल्यानंतरच आपली कामे होतील असे दोघा-तिघा मंत्र्यांना वाटते. दरम्यान, जे मंत्री आजारी आहेत, त्या सर्वांना राज्यपालांनी रजा द्यावी जेणेकरून त्यांना लवकर बरे होऊन मग कामावर येता येईल, असे आम आदमी पक्षाचे निमंत्रक एल्विस गोम्स बुधवारी म्हणाले. एखादा सरकारी कर्मचारी आजारी पडल्यानंतर त्यास डॉक्टर रजा व विश्रांती घेण्याचा सल्ला देतात. सध्या सरकारमधील आजारी सेवकांनी (मंत्र्यांनी) रजा घ्यावी. ते आजारातून लवकर बरे व्हावे, असे आम्हाला वाटते. त्यांनी त्यांच्याकडील खात्यांचा व कामाचा ताबा दुस-यांकडे द्यावा, असे गोम्स म्हणाले. 

सध्या प्रशासन ठप्पच झाले आहे. सरकार एका बाजूने नोकरभरती बंद करते व दुस-या बाजूने निवृत्त अधिका-यांना सेवावाढ देते. गोमंतकीय युवकांचे भवितव्य सरकार अंधारमय करत आहे, असे गोम्स म्हणाले. एका बिल्डरच्या सेवेसाठी वीज वाहिनी हलवून तिसवाडीला अंधारात ठेवल्याप्रकरणी टीकेचे केंद्र बनलेल्या वीज खात्याचे मुख्य अभियंते एन. रेड्डी यांना निवृत्तीनंतर सेवावाढ देण्याचा प्रयत्न सुरू आहे, असेही गोम्स म्हणाले. 

टॅग्स :goaगोवा