शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

गोहत्या बंदीचा देशात एक कायदा अशक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2017 03:56 IST

गोहत्या बंदीचा पूर्ण देशासाठी एक कायदा करणे शक्य नाही; कारण गोहत्या बंदी हा राज्य सरकारच्या अखत्यारित येणारा विषय आहे. तो

लोकमत न्यूज नेटवर्कपणजी : गोहत्या बंदीचा पूर्ण देशासाठी एक कायदा करणे शक्य नाही; कारण गोहत्या बंदी हा राज्य सरकारच्या अखत्यारित येणारा विषय आहे. तो राज्यांचा विषय आहे, असे प्रतिपादन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शनिवारी येथे केले.शहा दोन दिवसांच्या गोवा भेटीवर शनिवारी दाखल झाले. सायंकाळी त्यांनी गोव्यातील व्यावसायिकांशी संवाद साधला. ज्याप्रमाणे मोदी सरकारने पूर्ण देशासाठी एकच वस्तू व सेवा कर कायदा (जीएसटी) लागू केला, त्याचप्रमाणे पूर्ण देशासाठी गोहत्या बंदीचा एकच कायदा का लागू केला जात नाही, अशी विचारणा एका व्यावसायिकाने केली होती.देशातील सर्व जाती, धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन पुढे जाणे हे भाजपा सरकारचे धोरण आहे. गोव्याची सर्वधर्मीय लोकसंख्या जेवढी आहे, त्यापेक्षाही जास्त अल्पसंख्याकांची संख्या गुजरात, उत्तर प्रदेशसह अन्य अनेक राज्यांमध्ये आहे. गोमांस बंदीचा कोठेच कोणाला त्रास होत नाही. गोव्यात गोमांस बंदी भाजपा सरकारने लागू केलेली नाही. १९८६ मध्ये काँग्रेस सरकार अधिकारावर असतानाच ती लागू झालेली आहे, असे शहा म्हणाले.काश्मीरच्या प्रश्नासंबंधी शहा म्हणाले की, काश्मीरमधील स्थितीकडे केंद्र सरकारचे पूर्णपणे लक्ष आहे. काश्मीर कधीच भारतापासून आम्ही वेगळा होऊ देणार नाही. आम्ही काश्मीर अधिक मजबूत करू. देशाचे संरक्षण दल शत्रूंच्या कारवायांना योग्य ते प्रत्युत्तर देत आहे. यापुढेही ते उत्तर दिले जाईल.मोदी सरकारवर तीन वर्षांत भ्रष्टाचाराचा एकही आरोप झाला नाही. राजकारणातील घराणेशाही, जातीयवाद, लांगूलचालन आम्ही हद्दपार केले आहे, असेही त्यांनी सांगितले.