शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
2
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
3
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
4
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
5
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
6
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
7
सात जन्माच्या साथीदारानेच केली क्रूरता! पतीमुळे ४ वर्षांच्या चिमुकल्याची आई ९ महिने तडफडत राहिली.. 
8
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
9
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
10
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
11
सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"
12
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय; रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनाला भारतात मोठी गती मिळणार
13
मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार की काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम...
14
टीम इंडियाचा दबदबा संपत चाललाय, काही जण तर..; लाजिरवाण्या पराभवानंतर हर्षा भोगलेंनी सुनावलं
15
पंडित देशमुख खुनाचा मुद्दा २० वर्षांनंतर प्रचारात, मोहोळच्या देशमुखांसोबत काय घडलं होतं?
16
'थोडी वाट पाहा, फोन करतो', मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेदरम्यान राहुल गांधींचा डीके शिवकुमार यांना मेसेज
17
एकनाथ शिंदे सत्ता मिळवून दिघे साहेबांचे स्वप्न साकारणार की गणेश नाईक पुन्हा दूर ठेवणार?
18
IND vs SA : गौतम गंभीरचा राजीनामा द्यायला नकार! म्हणाला, "मी जिंकवलेल्या मालिका आठवा..!!"
19
PF खातेधारकांसाठी मोठी बातमी! पेन्शन, पीएफ आणि ईपीएसच्या नियमांमध्ये मोठे बदल
20
सूरज चव्हाणचं प्री-वेडिंग फोटोशूट; होणाऱ्या पत्नीसोबत वेस्टर्न लूकमध्ये दिल्या रोमँटिक पोझ
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात गाजलेल्या भू बळकाव प्रकरणांचा अहवाल आयोगाकडून मुख्यमंत्र्यांना सादर

By किशोर कुबल | Updated: November 1, 2023 12:35 IST

निवृत्त न्यायमूर्ती व्ही. के. जाधव यांनी दहा महिने घेतल्या सुनावण्या

पणजी : जमीन बळकाव प्रकरणात चौकशीसाठी नेमलेल्या निवृत्त न्यायमूर्ती व्ही. के. जाधव यांच्या एक सदस्यीय आयोगाने अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केला आहे. आयोगाने अहवालात काय निरीक्षणे नोंदवली आहेत याबाबत सर्वांनाच उत्कंठा आहे.

आयोगाने जानेवारी महिन्यात पहिली सुनावणी घेतली होती आणि आज १ नोव्हेंबर रोजी अहवाल सादर केला. दहा महिन्यांच्या विक्रमी कालावधीत हा अहवाल सादर करण्यात आलेला आहे, असे न्या. जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. या अहवालात काही गंभीर निरीक्षणे नोंदवली आहेत का? किंवा काही गैर आढळून आले आहे का? असा प्रश्न केला असता त्याबद्दल मी काहीच उघड करु शकत नाही, असे न्या. जाधव म्हणाले.

ते पुढे म्हणाले कि, ‘ आता चेंडू सरकारच्या कोर्टात आहे. सरकारच काय तो निर्णय घेईल.  न्या. जाधव हे मूळ बीड (महाराष्ट्र) येथील आहेत. उस्मानाबाद येथे २0१0 साली अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली. १ जाने २00४ ते १६ मे २00६ या काळात ते नागपूर हायकोर्टाचे रजिस्ट्रार होते. ३ मार्च २0१४ रोजी त्यांना मुंबई हायकोर्टात अतिरिक्त न्यायमुर्ती म्हणून बढती मिळाली.  

३० ॲागस्ट २०२२ रोजी राज्य सरकारने हा आयोग नेमला होता. चार महिन्यात आयोग अहवाल सादर करील, असे सरकारकडून सांगण्यात आले होते परंतु प्रत्यक्षात  गेल्या जानेवारीत सुनावण्या सुरु झाल्या आणि आज मुख्यमंत्र्यांकडे अहवाल आलेला आहे.

बेकायदा जमीन हडप करण्याच्या प्रकरणात आतापर्यंत १५ हून अधिक जणांना अटक झाली आहे. ९३ मालमत्ता स्कॅनरखाली असून एसआयटीने ४0 प्रकरणांमध्ये गुन्हे नोंदवून चौकशी चालवली आहे. आयजीपी ओमवीरसिंह बिश्नोई यांच्या नेतृत्त्वाखाली चौकशीसाठी आणखी एक पथकही स्थापन केले होते.एसआयटी तपासकाम करीत असलेली सर्व प्रकरणे तडीस नेण्याचे काम आयोगाकडे सोपवण्यात आले होते त्यासाठी कार्यकक्षा, नियम व इतर गोष्टी ठरवून दिल्या होत्या. सरकारी प्रक्रियेत काही त्रुटी असल्यास त्याबाबतही आयोग अभ्यास करण्यास सांगितले होते.

जमीन बळकावची अधिकतर प्रकरणे बार्देश तालुक्यात आढळून आलेली आहेत.  या प्रकरणांमध्ये पुरातत्त्व पुराभिलेख, महसूल आदी खात्यांच्या कर्मचाय्रांचेही संगनमत आढळून आल्याने त्यांना यापूर्वी अटक झालेली आहे. दरम्यान,  जमीन बळकाव प्रकरणातील काही संशयित फरारी असून देशाबाहेर पळून गेलेले आहेत.