शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात गाजलेल्या भू बळकाव प्रकरणांचा अहवाल आयोगाकडून मुख्यमंत्र्यांना सादर

By किशोर कुबल | Updated: November 1, 2023 12:35 IST

निवृत्त न्यायमूर्ती व्ही. के. जाधव यांनी दहा महिने घेतल्या सुनावण्या

पणजी : जमीन बळकाव प्रकरणात चौकशीसाठी नेमलेल्या निवृत्त न्यायमूर्ती व्ही. के. जाधव यांच्या एक सदस्यीय आयोगाने अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केला आहे. आयोगाने अहवालात काय निरीक्षणे नोंदवली आहेत याबाबत सर्वांनाच उत्कंठा आहे.

आयोगाने जानेवारी महिन्यात पहिली सुनावणी घेतली होती आणि आज १ नोव्हेंबर रोजी अहवाल सादर केला. दहा महिन्यांच्या विक्रमी कालावधीत हा अहवाल सादर करण्यात आलेला आहे, असे न्या. जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. या अहवालात काही गंभीर निरीक्षणे नोंदवली आहेत का? किंवा काही गैर आढळून आले आहे का? असा प्रश्न केला असता त्याबद्दल मी काहीच उघड करु शकत नाही, असे न्या. जाधव म्हणाले.

ते पुढे म्हणाले कि, ‘ आता चेंडू सरकारच्या कोर्टात आहे. सरकारच काय तो निर्णय घेईल.  न्या. जाधव हे मूळ बीड (महाराष्ट्र) येथील आहेत. उस्मानाबाद येथे २0१0 साली अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली. १ जाने २00४ ते १६ मे २00६ या काळात ते नागपूर हायकोर्टाचे रजिस्ट्रार होते. ३ मार्च २0१४ रोजी त्यांना मुंबई हायकोर्टात अतिरिक्त न्यायमुर्ती म्हणून बढती मिळाली.  

३० ॲागस्ट २०२२ रोजी राज्य सरकारने हा आयोग नेमला होता. चार महिन्यात आयोग अहवाल सादर करील, असे सरकारकडून सांगण्यात आले होते परंतु प्रत्यक्षात  गेल्या जानेवारीत सुनावण्या सुरु झाल्या आणि आज मुख्यमंत्र्यांकडे अहवाल आलेला आहे.

बेकायदा जमीन हडप करण्याच्या प्रकरणात आतापर्यंत १५ हून अधिक जणांना अटक झाली आहे. ९३ मालमत्ता स्कॅनरखाली असून एसआयटीने ४0 प्रकरणांमध्ये गुन्हे नोंदवून चौकशी चालवली आहे. आयजीपी ओमवीरसिंह बिश्नोई यांच्या नेतृत्त्वाखाली चौकशीसाठी आणखी एक पथकही स्थापन केले होते.एसआयटी तपासकाम करीत असलेली सर्व प्रकरणे तडीस नेण्याचे काम आयोगाकडे सोपवण्यात आले होते त्यासाठी कार्यकक्षा, नियम व इतर गोष्टी ठरवून दिल्या होत्या. सरकारी प्रक्रियेत काही त्रुटी असल्यास त्याबाबतही आयोग अभ्यास करण्यास सांगितले होते.

जमीन बळकावची अधिकतर प्रकरणे बार्देश तालुक्यात आढळून आलेली आहेत.  या प्रकरणांमध्ये पुरातत्त्व पुराभिलेख, महसूल आदी खात्यांच्या कर्मचाय्रांचेही संगनमत आढळून आल्याने त्यांना यापूर्वी अटक झालेली आहे. दरम्यान,  जमीन बळकाव प्रकरणातील काही संशयित फरारी असून देशाबाहेर पळून गेलेले आहेत.