शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

मजूर आरोपीच्या पिंजऱ्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2023 13:19 IST

गोवा सरकार सातत्याने राज्यातील परप्रांतीय मजुरांना दोष देत आहे.

गोवा सरकार सातत्याने राज्यातील परप्रांतीय मजुरांना दोष देत आहे. गोव्यात जे गुन्हे होतात त्यापैकी बहुतांश गुन्ह्यांशी परप्रांतीय मजुरांचा संबंध येतो हे मान्य आहे. मात्र, या स्थितीवर उपाय काढण्याऐवजी, पोलिस यंत्रणा अधिक सक्रिय करण्याऐवजी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सातत्याने त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे आश्चर्यकारक आहे. परप्रांतीय मजूर म्हणजे चोर, डाकू, लुटेरे, गुन्हेगारच आहेत, अशा पद्धतीने सरकार मजुरांकडे पाहणार असेल तर गोमंतकीय जनतादेखील मजुरांना तीच वागणूक देईल. यातून एक नवाच संघर्ष पुढील काही वर्षांत उभा राहील. मुख्यमंत्री गेल्या सहा महिन्यांत किमान तीनवेळा तरी जाहीर बोलले की, परप्रांतीय मजूर गोव्यात गुन्हेगारी करतात. मजुरांमुळेच गुन्हे वाढत आहेत. हा मुद्दा मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी विधानसभेतही मांडला होता. मुख्यमंत्री बोलतात ती वस्तुस्थिती असली तरी गोव्याची पोलिस यंत्रणादेखील निष्क्रिय आहे, हे नमूद करावे लागेल. रस्त्यांवरील सध्याचे अपघातदेखील परप्रांतीय मजूरच घडवतात का? 

अर्थात सरकारने अजून तेवढा दोष स्थलांतरित मजुरांना दिलेला नाही. मात्र, रस्त्यांवरील अपघात रोखू न शकणारी वाहतूक पोलिसांची यंत्रणा सगळीकडे उभी राहून रोज वाहनचालकांना तालांव मात्र देत असते. जे दुचाकीस्वार हेल्मेट घालत नाहीत, त्यांना थांबवून तालांव द्यायलाच हवा. मात्र, वाहतूक पोलिस केवळ परप्रांतीय वाहन दिसले की ते थांबवतात. पर्यटकांच्या चारचाकी गाड्या दिसल्या किंवा कर्नाटक महाराष्ट्रातून येणारे ट्रक दिसले की ते अडवून चलन दिले जाते. ही लूट कशासाठी? वाहन अपघात कमी करायचे असतील तर सगळी यंत्रणा त्यासाठी वापरायला हवी. मात्र, प्रत्यक्षात पर्यटकांना लुटण्यासाठी यंत्रणा वापरली जात आहे. पोलिसांची फौज अपघातप्रवण क्षेत्रात कुठेच नसते, पोलिस तसेच बांधकाम खात्याचे अभियंते यांनी मिळून अशा क्षेत्रात उपाययोजना करायला हवी. वळणे कापायला हवीत. स्पीडब्रेकर रंगवायला हवेत. यापैकी काहीच काम केले जात नाही. रस्त्यांवर रोज माणसे मरत आहेत आणि सरकारी यंत्रणा काहीच करू शकत नाही, हे सावंत सरकारचे अपयश आहे. लोक बेजबाबदार पद्धतीने वाहने हाकतात हे मान्य केले, तरी सगळेच चालक बेजबाबदार नसतात, हेही मान्य करावेच लागेल.

परप्रांतीय मजुरांना लेबर कार्ड नोंदणी करणे अनिवार्य असेल ही मुख्यमंत्र्यांची भूमिका योग्य आहे. परवा १ मे रोजी कामगार दिनी मुख्यमंत्री मजुरांविषयी नव्याने बोलले. गोव्यात १० टक्के गुन्हे परप्रांतीय मजूरच करतात, असे मुख्यमंत्र्यांनी नव्याने जाहीर केले. गोव्यात येणाऱ्या प्रत्येक मजुराची नोंदणी व्हायलाच हवी. कंत्राटदार, बांधकामांचे मालक किंवा मजूर संघटनांना पुढाकार घेऊन मजुरांची नोंदणी व लेबर कार्ड वितरण ही कामे करावीच लागतील. मात्र, परप्रांतीय मजुरांना वारंवार जाहीरपणे आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले गेले तर पुढे या मजुरांना गोव्यात जगणेच अशक्य होईल. मग मजुरांना भाड्याने घरे कुणीच देणार नाहीत. शिवाय प्रत्येक गुन्ह्याबाबत मजुरांवरच संशय घेऊन लोक त्यांना धडा शिकवण्यास पुढे येतील. लोक स्वतःच कायदा हाती घेऊ शकतात. ही स्थिती टाळायची असेल तर सरकार प्रमुखांनी थोडे जबाबदारीचे विधान करावे. विरोधी आमदार बोलतात तसे सरकारचे मंत्री किंवा मुख्यमंत्री बोलूशकत नाहीत. 

परप्रांतीय मजुरांवर लक्ष ठेवायला हवे, त्यांच्याद्वारे गोव्यात गुन्हेगारी वाढू नये, म्हणूनही सरकारने प्रयत्न करायला हवेत. पोलिसांकडे किती मजुरांचा रेकॉर्ड असतो? प्रत्येक तालुक्यातील झोपडपट्टयांमध्ये राहणाऱ्या व विविध भागात संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या तरुणांचा तरी रेकॉर्ड पोलिसांकडे असतो का? पोलिस यंत्रणाच अजून हवी तेवढी सक्रिय नाही. चोऱ्या किंवा लैंगिक अत्याचार अशा गुन्ह्यांमध्ये परप्रांतीय मजूर अनेकदा आढळून येतात. मात्र, गोव्यातील प्रत्येक मूळ गोंयकाराला आता घरातील व बागायतीमधील कामे करण्यासाठी हेच मजूर हवे असतात. अगदी पाव विकण्यापासून घरातील फरशी पुसण्यापर्यंतची कामे परप्रांतीय मजुरांकडूनच करून घेतली जातात. अशा स्थितीत परप्रांतीय मजूर म्हणजे कुणी तरी पाकिस्तानीच आहेत, असे चित्र निदान सरकार प्रमुखांनी तरी उभे करू नये, एवढेच!

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :goaगोवा