शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

‘क्यार’चा धोका टळला; वीज, पाण्याअभावी लोकांचे हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2019 23:22 IST

गोव्यात अतिवृष्टीने हाहाकार; पूरपरिस्थितीची भीती

पणजी : अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेले ‘क्यार’ वादळ अखेर घोंगावत किनारपट्टीपासून नेमक्या उलट्या दिशेने पश्चिमेकडे वेगाने सरकत आहे. त्यामुळे किनारपट्टीवर वादळाचा धोका टळला. मात्र, अतिवृष्टी आणि जोरदार वाऱ्यामुळे राज्यात हाहाकार माजला. जनजीवन विस्कळीत झाले.

नद्या-नाल्यांची पातळी वाढल्याने अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक ठप्प झाली. वीजपुरवठाही खंडित झाला. विजेअभावी पाणीही न मिळाल्यामुळे लोकांचे हाल झाले. वाहनांची कोंडी होऊन लोकांना रस्त्यातच अडकून पडावे लागले.हवामान वेधशाळेने समुद्रातील क्यार वादळाचा परिणाम म्हणून पुढील २४ तासांत राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. वेधशाळेचे संचालक के. व्ही. पडगीलवार यांनी किनारपट्टीला वादळाचा धोका टळला असल्याचे सांगितले.

ते म्हणाले की, समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्याचे पहाटे तीव्र वादळात रूपांतर झाले. हे वादळ ओमानच्या दिशेने पुढे सरकत आहे. परंतु पावसाची तीव्रता मात्र २४ तास कायम राहील. पुढील बारा तासांत किनाºयावर ताशी ५५ ते ६५ किलोमीटर वेगाने वारे वाहील आणि वाºयाचा वेग ताशी ७५ कि.मी.पर्यंत पोहचू शकतो. नंतर वातावरण निवळणार असून पर्यटक २७ नंतर गोव्याला भेट देऊ शकतात. समुद्र प्रचंड खवळलेला असेल व त्यामुळे मच्छीमारांनी मासेमारीसाठी जाऊ नये.

जहाजाच्या कप्तानाला अटक करा : मुख्यमंत्री

च्मुरगाव बंदरातून वादळी वाºयामुळे भरकटत दोनापावलपर्यंत आलेल्या नाफ्थावाहू जहाजाच्या कप्तानाला अटक करण्याचे तसेच एमपीटीविरुद्ध गुन्हा नोंदविण्याचे आदेश मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिले.

भरकटलेल्या या मानवरहित जहाजात सुमारे ३ हजार मेट्रिक टन नाफ्था आहे. त्यामुळे भीती व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्र्यांनी या विषयावर शुक्रवारी तातडीने उच्चस्तरीय बैठक घेऊन स्थितीचा आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना सांगितले की, ‘नाफ्थाची गळती झाली आहे का हे तपासण्यासाठी खासगी आस्थापनाची मदत घेतली आहे. या जहाजातील नाफ्था अन्य जहाजात हलविण्यात येणार आहे. सोमवारी नवे जहाज दाखल झाल्यानंतर ही कार्यवाही सुरू होईल.’

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत