शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

शणै गोंयबाबमुळेच कोंकणी भाषेचे अस्तित्व: जेष्ठ ज्ञानपिठ पुरस्कार विजेते लेखक दामोदर मावजो

By समीर नाईक | Updated: December 16, 2023 13:54 IST

पणजी: शणै गोंयबाब यांचे जीवन आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. कोंकणी भाषा अस्तित्वासाठी झटत असताना, शणै गोंयबाब यांनी आमच्या कोंकणी भाषेला ...

पणजी: शणै गोंयबाब यांचे जीवन आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. कोंकणी भाषा अस्तित्वासाठी झटत असताना, शणै गोंयबाब यांनी आमच्या कोंकणी भाषेला न्याय मिळवून दिला. दुदैवाने त्यांचे मोठे कर्तृत्व शंभर वर्षे झाली तरी अजूनही गोमंतकीयांकडे पोहचलेले नाही. पण आता आमची जबाबदारी आहे की त्यांचे साहित्य, जीवन लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी कार्य केले पाहीजे. यासाठी शालेय, महाविद्यालयीन स्तरावरुन काम करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जेष्ठ ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक दामोदर मावजो यांनी केले.

पणजी बालभवन येथे केंद्रीय साहित्य अकादमी, गोवा कोंकणी अकादमी आणि बालभवन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ‘शणै गोंयबाब : जीवित आणि बरप’ या विषयावर परिसंवाद कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत आहे. यावेळी त्यांच्यासोबत जेष्ठ लेखक ॲड. उदय भेंब्रे, साहित्यीक डॉ. पुर्णानंद च्यारी, कोंकणी अकादमीचे अध्यक्ष अरुण साखरदांडे, केंद्रीय साहित्य अकादमीचे प्रादेशिक कार्यालयाचे प्रभारी ओम प्रकाश नागर, कोंकणी सल्लागार मंडळाचे निमंत्रक मॅलवीन रॉड्रिग्ज, व इतर मान्यवर उपस्थित होते.

शणै गोंयबाब लोकांना कधीच कळलेला नाही. मला आठवते जेव्हा जवाहरलाल नेहरु राज्यात आले होते, तेव्हा त्यांनी विधान केलेले की गोवा के लोग अजीब है. हे त्यांचे विधान अजूनही गाेमंतकीयांबाबत खरे ठरत आहे. गोंयबाब यांनी कोंकणीच्या भाषेसाठी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. त्यांनी गोवा, गोंयकारपण व भाषा हे मिशीन म्हणूनच त्यावेळेस काम केले. त्यांच्यामुळे आज काेंकणी भाषेचे अस्तित्व आहे. आमचा इतिहास पाहता आमच्यावर अनेकांनी राज्य केले, यातून भाषा व संस्कृतीवर मर्यादा आल्या, पण या गोष्टी कधीच नष्ट झाल्या नाही, याचे प्रमुख कारण म्हणजे राज्यात त्या काळात संस्कृती व भाषा जपण्यासाठी वावरणारे शणै गोंयबाब सारखे इतर कार्यकर्ते, असे मावजो यांनी यावेळी सांगितले.

आम्ही कुठल्याही भाषेचा इतिहास पाहिल्यावर लक्षात येते की जेव्हा जेव्हा कूठल्याही भाषेवर अन्याय झाला, त्यावेळीस एका महापुरुषाने पुढाकार घेत भाषा वाचविण्यासाठी प्रयत्न केला. मराठीच्या बाबतीत हे कार्य संत ज्ञानेश्वराने केले, तर कोंकणीसाठी हे कार्य शणै गोंयबाब यांनी केले, यात शंका नाही. आज शणै गोंयबाब यांच्यावर संशोधन करण्याची गरज आहे, कारण त्यांचे जीवन व साहित्य त्या तोडीचे आहे, असेही मावजो यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :goaगोवा