शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

खंडणीसाठी दोघांचे अपहरण; ११ संशयितांची टोळी जेरबंद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2023 15:50 IST

बांबोळीत डांबून ठेवलेल्या इसमांची क्राईम ब्रँचकडून सुटका

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यातील एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या हैदराबादच्या दोघा नागरिकांचे अपहरण करून त्यांना ओलीस ठेवून त्यांच्या कंपनीकडून ४ कोटी रुपये खंडणी मागणाऱ्या ११ जणांच्या गँगला क्राईम बँचने शनिवारी जेरबंद केले.

हैदराबाद पोलिसांच्या एका टीमने आगशी पोलिसांशी संपर्क करून ही अपहरणाची धक्कादायक माहिती दिली. हैदराबादमधील दोघांना गोव्यात कुठेतरी ओलीस ठेवण्यात आले आहे आणि संशयित अपहरणकर्ते त्यांच्या सुटकेसाठी संबंधितांच्या हैदराबादस्थित कंपनीकडे मोठी रक्कम रक्कम मागत आहेत, असे त्यांनी सांगितले. ही माहिती मिळाल्यावर अतिरिक्त अधीक्षक राजू राऊत देसाई यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या एका टीमने शोधमोहीम सुरू केली. अत्यंत हुशारीने पोलिसांनी या अपहरणकर्त्यांना गाठले आणि त्यांच्या मुसक्या आवळल्या. अपहरण केलेल्यांना बांबोळी येथील एका इमारतीत बंदी बनविण्यात आले होते.

पोलिसांनी अल्ताफ शा सैयद (फातोर्डा), सुनील नायक (सांगे), निखिल पाटील (शांतीनगर फोंडा), शफी उल्ला (मडगाव), जाफर शेख हसन, सागर (दोघेही रा. म्हापसा), निशांत (पर्वरी), अस्लम सय्यद मुजावर (मडगाव), सादीक शेख (नावेली), तुकाराम दोंडे (हैदराबाद), जोस एल्ड्रिन (केपे) अशी संशयितांची नावे आहेत. दरम्यान हैदराबादस्थित कंपनीकडे या संशयितांनी खंडणी मागितल्यावर कंपनीने तेथे पोलिस स्थानकात तक्रार नोंदवली होती.

मास्टरमाइंडचे पीएफआय कनेक्शन

अल्ताफ हा या प्रकरणातील मास्टरमाइंड आहे. अल्ताफ हा देशविघातक कारवायांसाठी बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेचा सदस्य आहे. तो पीएफआयला पैसे पुरवित होता, असा त्याच्यावर आरोपही होता. आयकर खात्याकडूनही त्याच्यावर छापा टाकला होता. तसेच त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे, असे क्राईम ब्रँचचे अधीक्षक निधीन वाल्सन यांनी सांगितले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :goaगोवाCrime Newsगुन्हेगारी