शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

खादी आणि ग्रामोद्योग आयोगतर्फे ग्रामीण कामगारांना टूल किट प्रदान

By समीर नाईक | Updated: March 16, 2024 17:23 IST

भारत सरकारतर्फे शनिवारी राज्यातील ग्रामीण कामगारांना उच्च गुणवत्ता टूल किट प्रदान केले. 

समीर नाईक,पणजी: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार 'विकसित आणि स्वायत्त भारत' निर्मितीसाठी 'खादी ग्राम स्वराज अभियान' सक्षम करण्यासाठी खादी आणि ग्रामोद्योग आयोग (केव्हायसीआय), सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय, भारत सरकारतर्फे शनिवारी राज्यातील ग्रामीण कामगारांना उच्च गुणवत्ता टूल किट प्रदान केले. 

राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थान, दोनापावला, येथील ऑडिटोरियममध्ये सदर वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून केव्हायसीआय अध्यक्ष मनोज कुमार उपस्थित होते, तर सन्मानिय पाहुणे म्हणूनकेंद्रीय पर्यटन राज्य मंत्री श्रीपाद नाईक उपस्थित होते. त्यांच्यासोबत डॉ. स्नेहा भागवत, डी. एस माेरजकर, डॉ. प्रदिप सरमाेकदम, व इतर मान्यवर उपस्थित होते. या दरम्यान एकूण ९० कामगारांना १८० मशीनरी आणि टूल किट प्रदान करण्यात आले.

या योजनांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आणि अनुसार 'खादी ग्राम स्वराज अभियान' ग्रामीण भारताला आर्थिकदृष्ट्या सशक्त आणि सक्षम करीत आहेत. पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (पीएमईजीपी) ने कुटीर उद्योगांच्या स्थापनेच्या क्षेत्रात क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. पीएमईजीपी साठी अर्ज करण्यापासून ते अनुदान जारी करण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन आहे. पीएमईजीपी योजना सुरू झाल्यापासून देशात ९.४० लाख नवीन प्रकल्प स्थापन झाले आहेत, ज्यातून ८१.४८ लाखांहून अधिक नवीन लोकांना रोजगार मिळाला आहे. आतापर्यंत, केंद्र सरकारने या योजनांसाठी २४५२०.१९ कोटी रुपयांपेक्षा जास्त अनुदान वितरित केले आहे. असे यावेळी मनोज कुमार यांनी सांगितले.

गेल्या १० वर्षात ‘न्यू इंडिया ऑफ न्यू खादी’ ने ‘आत्मनिर्भर भारत अभियाना’ला एक नवी दिशा दिली आहे. त्यामुळे या काळात खादी उत्पादनांच्या विक्रीत चार पटीहून अधिक वाढ झाली आहे. खादीचे उत्पादन आणि विक्री वाढल्याने ग्रामीण भारतातील कारागीर आर्थिकदृष्ट्या संपन्न झाले आहेत. यातून कारागिरांच्या मजुरीमध्ये अधिक वाढ झाल्याने कारागीर खादीच्या कामाकडे आकर्षित झाले आहेत. 'वोकल फॉर लोकल' आणि 'मेक इन इंडिया' या मंत्रामुळे खादी तरुणांमध्ये लोकप्रिय झाली आहे. गेल्या १० वर्षात खादी आणि ग्रामोद्योग उत्पादनांच्या उलाढालीने १.३४ लाख कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे, तर या काळात ९.५० लाखांहून अधिक नवीन लोकांना रोजगार मिळाला आहे, असेही कुमार यांनी अधिक माहिती देताना सांगितले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली खादी आणि ग्रामोद्योग आयोगांनी ग्रामीण भारताच्या कामगारांना सशक्त केले आहे. युवकांनी आणि बेरोजगारांनी खादीसह स्वताला जोडून आत्मनिर्भर बनवण्याची आणि विकसित भारत अभियानात आपले योगदान द्यावे, तसेच स्वताचा विकास करुन घ्यावा,असे आवाहन श्रीपाद नाईक यांनी केले.

टॅग्स :goaगोवाNarendra Modiनरेंद्र मोदी