शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

खादी आणि ग्रामोद्योग आयोगतर्फे ग्रामीण कामगारांना टूल किट प्रदान

By समीर नाईक | Updated: March 16, 2024 17:23 IST

भारत सरकारतर्फे शनिवारी राज्यातील ग्रामीण कामगारांना उच्च गुणवत्ता टूल किट प्रदान केले. 

समीर नाईक,पणजी: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार 'विकसित आणि स्वायत्त भारत' निर्मितीसाठी 'खादी ग्राम स्वराज अभियान' सक्षम करण्यासाठी खादी आणि ग्रामोद्योग आयोग (केव्हायसीआय), सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय, भारत सरकारतर्फे शनिवारी राज्यातील ग्रामीण कामगारांना उच्च गुणवत्ता टूल किट प्रदान केले. 

राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थान, दोनापावला, येथील ऑडिटोरियममध्ये सदर वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून केव्हायसीआय अध्यक्ष मनोज कुमार उपस्थित होते, तर सन्मानिय पाहुणे म्हणूनकेंद्रीय पर्यटन राज्य मंत्री श्रीपाद नाईक उपस्थित होते. त्यांच्यासोबत डॉ. स्नेहा भागवत, डी. एस माेरजकर, डॉ. प्रदिप सरमाेकदम, व इतर मान्यवर उपस्थित होते. या दरम्यान एकूण ९० कामगारांना १८० मशीनरी आणि टूल किट प्रदान करण्यात आले.

या योजनांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आणि अनुसार 'खादी ग्राम स्वराज अभियान' ग्रामीण भारताला आर्थिकदृष्ट्या सशक्त आणि सक्षम करीत आहेत. पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (पीएमईजीपी) ने कुटीर उद्योगांच्या स्थापनेच्या क्षेत्रात क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. पीएमईजीपी साठी अर्ज करण्यापासून ते अनुदान जारी करण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन आहे. पीएमईजीपी योजना सुरू झाल्यापासून देशात ९.४० लाख नवीन प्रकल्प स्थापन झाले आहेत, ज्यातून ८१.४८ लाखांहून अधिक नवीन लोकांना रोजगार मिळाला आहे. आतापर्यंत, केंद्र सरकारने या योजनांसाठी २४५२०.१९ कोटी रुपयांपेक्षा जास्त अनुदान वितरित केले आहे. असे यावेळी मनोज कुमार यांनी सांगितले.

गेल्या १० वर्षात ‘न्यू इंडिया ऑफ न्यू खादी’ ने ‘आत्मनिर्भर भारत अभियाना’ला एक नवी दिशा दिली आहे. त्यामुळे या काळात खादी उत्पादनांच्या विक्रीत चार पटीहून अधिक वाढ झाली आहे. खादीचे उत्पादन आणि विक्री वाढल्याने ग्रामीण भारतातील कारागीर आर्थिकदृष्ट्या संपन्न झाले आहेत. यातून कारागिरांच्या मजुरीमध्ये अधिक वाढ झाल्याने कारागीर खादीच्या कामाकडे आकर्षित झाले आहेत. 'वोकल फॉर लोकल' आणि 'मेक इन इंडिया' या मंत्रामुळे खादी तरुणांमध्ये लोकप्रिय झाली आहे. गेल्या १० वर्षात खादी आणि ग्रामोद्योग उत्पादनांच्या उलाढालीने १.३४ लाख कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे, तर या काळात ९.५० लाखांहून अधिक नवीन लोकांना रोजगार मिळाला आहे, असेही कुमार यांनी अधिक माहिती देताना सांगितले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली खादी आणि ग्रामोद्योग आयोगांनी ग्रामीण भारताच्या कामगारांना सशक्त केले आहे. युवकांनी आणि बेरोजगारांनी खादीसह स्वताला जोडून आत्मनिर्भर बनवण्याची आणि विकसित भारत अभियानात आपले योगदान द्यावे, तसेच स्वताचा विकास करुन घ्यावा,असे आवाहन श्रीपाद नाईक यांनी केले.

टॅग्स :goaगोवाNarendra Modiनरेंद्र मोदी