शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

गोव्यात यापुढे नोंदणी न करता केजी चालवता येणार नाही; मुख्यमंत्र्यांनी खडसावले 

By किशोर कुबल | Updated: October 19, 2023 15:19 IST

शाळांमधील पायाभूत सुविधा तसेच मनुष्यबळ या गोष्टीही हे केंद्र देखरेख करून नोंद करणार आहे.

पणजी - यापुढे नोंदणी न करता केजी चालवता येणार नाही. सरकार कडक कारवाई करील, असा इशारा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिला आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, 'केजी चालवणाऱ्या प्रत्येक संस्थेला नोंदणी करण्यासाठी आम्ही पुरेसा अवधी दिलेला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणास अनुसरून आम्ही पुढे निघालो आहोत.' मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पर्वरी येथे एससीईआरटी इमारतीत विद्या समीक्षा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. गुजरातनंतर हे केंद्र उघडणारे गोवा आहे दुसरे राज्य ठरले आहे. 

मुख्यमंत्री म्हणाले की, या केंद्रामुळे राज्यातील प्रत्येक शाळेतील शिक्षक, विद्यार्थी यांचे ट्रॅकिंग होईल. शिक्षकांनी काय शिकवले, विद्यार्थी काय शिकत आहेत वगैरे सर्व गोष्टी नोंद होतील आणि शिक्षकांना अध्यापनात सुधारणा करणे गरजेचे असल्यास तसे निर्देश शिक्षण खात्याकडून जातील. मुख्यमंत्री म्हणाले की, आम्हाला विद्यार्थी संपूर्ण, शिक्षक समर्थ आणि प्रशासन सशक्त झालेले हवे आहे. २१ व्या शतकात ही काळाची गरज आहे. शाळांमधील पायाभूत सुविधा तसेच मनुष्यबळ या गोष्टीही हे केंद्र देखरेख करून नोंद करणार आहे. विद्यार्थी  शिक्षणात मागे पडत असेल तर त्यांच्यासाठी रेमेडीयल वर्ग पुन्हा सुरू केले जातील. हे वर्ग सुरू करण्यामागे शिक्षकांना त्रास देण्यचा नव्हे तर विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण मिळावे तसेच त्यांचे करियर घडावे हा हेतू आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, केजी ते बारावीपर्यंत सुमारे दोन लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दहावी, बारावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही त्यांचे करिअर घडवण्यात शिक्षकांनी मदत करायला हवी. विद्या समीक्षा केंद्राच्या माध्यमातून गोव्यात शैक्षणिक क्रांती होणार आहे.'

मुख्यमंत्री म्हणाले की, या केंद्रासाठी  अर्थसंकल्पात तरतूद केली तेव्हा टीका झाली होती.  शिक्षण क्षेत्रात आवश्यक ते बदल नाविन्य आणि तंत्रज्ञान आणून पुढील २५ वर्षात शैक्षणिक क्रांती घडवण्याचा मोदीजींचे ध्येय आहे व ते आम्ही पूर्ण करू'. शिक्षक, विद्यार्थ्यांच्या कार्याचा आढावा घेऊन दर पंधरा दिवसांनी किंवा महिन्याने आवश्यक त्या सुधारणा सुचवल्या जातील व त्या अनुषंगाने शिक्षकांनी त्या सुधारणा घडवून आणाव्या लागतील. ते म्हणाले की,' सरकारी शाळांमध्ये सुद्धा विद्यार्थी मोठ्या प्रमाणात येऊ शकतात. त्यासाठी शिक्षकांनी चांगले काम केले पाहिजे. कारापूरच्या ग्रीन स्कूलमध्ये साडेतीनशे विद्यार्थी प्रतीक्षा यादीत आहेत. हे शक्य होऊ शकते तर इतर शाळांमध्ये का नाही?, असा सवाल त्यांनी केला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये,  शिक्षण खात्याचे सचिव प्रसाद लोलयेंकर. एससीईआरटीचे संचालक शंभू घाडी व इतर अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Pramod Sawantप्रमोद सावंत