शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

राज्यात सलोखा ठेवा; धार्मिक तणाव करू नका: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2024 10:59 IST

स्वयंपूर्ण गोव्यासाठी एकत्र यावे

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : धर्माच्या नावाने विनाकारण पोलिस स्थानकात जाऊन कोणीही तणाव निर्माण करू नये. एकमेकांच्या धर्माच्या बाजूने विषय काढून वाद करणे थांबवा. राज्यात सामाजिक सलोखा राखण्यासाठी धार्मिक तणाव निर्माण न करता संयम बाळगा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे.

महात्मा गांधी जयंतीनिमित्त सकाळी जुने गोवे येथील गांधीजींच्या पुतळ्यास मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. काही दिवसांपूर्वी जुलूसवरून निर्माण झालेला वाद पोलिस स्थानकांपर्यंत पोहोचला होता. त्यावेळी दोन धर्मामध्ये तणावही निर्माण झाला होता. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी सर्वधर्मीयांना जातीय सलोखा राखण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमास कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई, उत्तर गोवा जिल्हा पंचायत सदस्य सिद्धेश नाईक, स्थानिक सरपंच, पंच सदस्य व अन्य मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, की भारत महासत्ता बनावा हे प्रत्येकाचे स्वप्न आहे. त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत विकसित भारताचे ध्येय समोर ठेवले आहे. त्यामुळे विकसित भारत व विकसित गोवा बनण्यासाठी प्रत्येकाने हातभार लावण्याची गरज आहे. सत्य व अहिंसेच्या वाटेवर जावे, असे आवाहनही त्यांनी केले.

वोकल फॉर लोकल, मेक इन इंडिया म्हणजेच स्थानिकांकडून तयार केल्या जाणाऱ्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. यामुळे सरकारच्या महसुलातही भर पडत आहे. देशातून भ्रष्टाचार नष्ट करणे, लोकांना सुशासन मिळाले, गावागावांमध्ये असलेल्या महिला स्वयंसाहाय्य गटांना प्रोत्साहन देऊन त्यांना स्वयंपूर्ण करणे, तरुणांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देतानाच रोजगार उपलब्ध करणे, यावरही भर दिला जात असल्याचे त्यांनी म्हटले.

विकासासाठी एक व्हा...

महात्मा गांधी यांनी स्वतः हातात झाडू घेऊन देशवासीयांना स्वच्छतेचा संदेश दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही स्वच्छतेवर भर देण्याचे ठरवले आहे. स्वच्छतेप्रमाणेच देशातील प्रत्येक घटकापर्यंत, धर्मापर्यंत, तळागाळातील लोकांपर्यंत रस्ते, वीज, पाणी, विमा योजना, तसेच अन्य सरकारी योजना पोचाव्यात, यासाठीही सरकार प्रयत्नशील आहे. आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवाअंतर्गत सरकार काम करीत आहे. दिव्यांगांबरोबरच अंत्योदय तत्त्वावर समाजातील प्रत्येक घटकाला योजनांचा लाभ मिळावा यासाठीही प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

'डीएनए'ची मागणी जुनीच, उगाच धार्मिक रंग देऊ नका

फ्रान्सिस झेवियर यांच्या शवाच्या डीएनएची मागणी जुनीच आहे. यासंदर्भात श्रीलंकेत एक चळवळ सुरू असून ते शव झेवियर यांचे नसून बौद्धभिक्षू राहुल थेरा यांचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. याबाबत २०१४ मध्ये पंतप्रधान मोदी व महिंद्र राजपक्षे यांना निवेदनही दिले आहे. श्रीलंकेच्या लोकांनी जी मागणी भारत व श्रीलंकेच्या राष्ट्रप्रमुखांकडे केली आहे. तीच मागणी हिंदू रक्षा महाआघाडीच्या वतीने संशयाच्या वादावर कायमचा पडदा पडावा म्हणून आम्ही केली आहे. याचा विपर्यास करून त्याला धार्मिक रंग देणे चुकीचे आहे. - प्रा. सुभाष वेलिंगकर.

काही लोक राज्यातील धार्मिक सलोखा बिघडवत आहेत. मात्र त्यांनी राज्याची एकता बिघडवू नये, तसेच राज्यातील पुरातन वास्तू व इतर धार्मिक गोष्टींची बदनामी तातडीने थांबवावी. - सदानंद तानावडे, खासदार.

समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांचे गोव्याबाहेर पुनर्वसन करा. सेंट फ्रान्सिस झेव्हियर यांच्याविषयी वेलिंगकरांनी वापरलेले शब्द हे राज्यातील भू-बळकाव, डोंगरफोड अशा महत्त्वाच्या मुद्द्यांपासून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी आहे. - वेंझी व्हिएगश, आमदार.

देव-देवतांचा, संतांचा अपमान करीत असाल तर त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. कोणी धर्माविषयी चुकीचे विधान केल्यास आपण त्याविरोधात आवाज उठवू. राज्यातील धार्मिक सलोखा बिघडवणाऱ्यांवर मुख्यमंत्र्यांनी कठोर करवाई करणे गरजेचे आहे. एल्टन डिकॉस्टा, आमदार.

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतMahatma Gandhiमहात्मा गांधीMahatma Gandhiमहात्मा गांधी