शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

काश्मिरमधील नरसंहाराकडे दुर्लक्ष केल्यामुळे भारतात ‘काश्मीर पॅटर्न’- राहुल कौल

By आप्पा बुवा | Updated: June 19, 2023 16:51 IST

‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त ‘काश्मिरी पंडितांचा नरसंहार नाकारल्याने देशावर होणारा परिणाम’ या विषयावर बोलत होते.

फोंडा- काश्मिरी पंडितांचा नरसंहार कोणतेही सरकार मान्य करायला सिद्ध नाही. त्याचा परिणाम म्हणून बंगालसह भारतात जेथे जेथे मुसलमानबहुल भाग आहे, तेथे तेथे ‘काश्मीर पॅटर्न’ राबवला जात आहे. त्यामुळे आज भारतात अनेक ठिकाणांवरून हिंदू पलायन करत आहेत, असे स्पष्ट प्रतिपादन ‘यूथ फॉर पनून काश्मीर’चे अध्यक्ष राहुल कौल यांनी केले. ते ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त ‘काश्मिरी पंडितांचा नरसंहार नाकारल्याने देशावर होणारा परिणाम’ या विषयावर बोलत होते. या वेळी व्यासपिठावर कर्नाटक राज्यातील चित्रपट निर्माते प्रशांत संबरगी, ‘संयुक्त भारतीय धर्मसंसदे’चे राष्ट्रीय अध्यक्ष आचार्य राजेश्वर आणि ‘राष्ट्र धर्म संघटने’चे अध्यक्ष संतोष केंचम्बा उपस्थित होते. 

कौल पुढे म्हणाले की, जोपर्यंत काश्मिरमधील हिंदूंवरील अत्याचारांना नरसंहार मानले जात नाही, तोपर्यंत काश्मीर हिंदूंचे पूनर्वसन शक्य नाही. हा केवळ काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनाचा विषय नाही, तर देशातील 60 हून अधिक ठिकाणी ‘काश्मिरी पॅटर्न’ वापरून इस्लामिक जिहादी डोके वर काढत आहेत, तेथील हिंदूंच्या रक्षणाचा विषय आहे. ज्या काश्मीरने भारताला भरतमुनी दिले, तो काश्मीर आज हिंदूविहीन झाला आहे.

काश्मिरी पंडितांवर आक्रमण हे भारताची संस्कृती नष्ट करण्यासाठीचे षड्यंत्र आहे.आज येथील 370 कलम हटवण्यात येऊनही अद्यापही काश्मिर हिंदूंसाठी सुरक्षित नाही, ही वस्तुस्थिती आहे. काश्मिरी पंडितांचा नरसंहार मान्य केला नाही, तर त्याचे प्रतिबिंब संपूर्ण भारतात दिसेल, असा इशाराही कौल यांनी या वेळी दिला.