शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटक, महाराष्ट्राने पळवले गोव्याचे पाणी: राजेंद्र केरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2025 12:58 IST

येत्या काळात भीषण पाणीटंचाई

लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : कळसा-भांडुरा प्रकल्पाद्वारे कर्नाटकाने तसेच विर्डी, सासोली, मणेरी व इतर जलप्रकल्पाद्वारे महाराष्ट्राने गोव्याचे पाणी पळविण्यासाठी षडयंत्र आखले आहे. अशातच तिळारीच्या पाण्याच्या भरोशावर अवलंबून असलेल्या गोव्याला सातत्याने पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहे. डिचोली, वाळवंटी व इतर नद्यांची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे भविष्यात योग्य नियोजन केले नाही तर गोव्यावर मोठे पाणीसंकट ओढवले जाणार आहे, अशी भीती पर्यावरण अभ्यासक राजेंद्र केरकर यांनी व्यक्त केली आहे.

डिचोली येथे शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना केरकर यांनी तिळारी कालवा वारंवार फुटत असल्याने डिचोलीला सिंचनासाठी तसेच बार्देश, पर्वरी भागात पाण्याची टंचाई भासते. साळ येथे पंपिंग स्टेशन तसेच आमठाणे येथे पाणी साठवून अस्नोडा जलसाठ्चात पुरवण्याच्या सरकारने अनेक योजना आहेत. मात्र, त्यासंदर्भात गांभीर्याने ज्या गोष्टी करणे गरजेचे आहे, त्याबाबत योग्य ती दखल सरकारने घ्यावी.

डिचोली जीवनदायिनी असलेल्या नदीला गटाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. सांडपाणी सोडणे, कचरा टाकणे, पूरप्रवण क्षेत्रात बांधकामांचे अतिक्रमण यामुळे डिचोली, वाळवंटी नदीवरही आक्रमणे व अनेक कारणास्तव संकट उद्भवले असून, त्यामुळे पडोशे जलशुद्धीकरण प्रकल्प, साखळी जलशुद्धीकरण प्रकल्प संकटात येण्याची भीती आहे.

सावध व्हावे...

म्हादईप्रश्नी सातत्याने सुनावणी पुढे ढकलण्यात येत आहे. त्यामुळे यासंदर्भात अद्याप ठोस निर्णय होऊ शकलेला नाही. म्हादईचे पाणी कर्नाटकाने यापूर्वीच पळवले आहे. तर महाराष्ट्राने सासोली, मणेरी येथे पाणी अडवून ते वेगवेगळ्या ठिकाणी नेण्यासाठी महाराष्ट्राने चंग बांधलेला आहे.

 

टॅग्स :goaगोवाWaterपाणी