शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
2
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
3
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
4
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
5
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
6
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
7
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
8
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
9
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
10
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
11
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
12
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
13
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
14
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
15
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
16
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
17
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
18
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
19
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
20
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

कर्नाटक, महाराष्ट्राने पळवले गोव्याचे पाणी: राजेंद्र केरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2025 12:58 IST

येत्या काळात भीषण पाणीटंचाई

लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : कळसा-भांडुरा प्रकल्पाद्वारे कर्नाटकाने तसेच विर्डी, सासोली, मणेरी व इतर जलप्रकल्पाद्वारे महाराष्ट्राने गोव्याचे पाणी पळविण्यासाठी षडयंत्र आखले आहे. अशातच तिळारीच्या पाण्याच्या भरोशावर अवलंबून असलेल्या गोव्याला सातत्याने पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहे. डिचोली, वाळवंटी व इतर नद्यांची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे भविष्यात योग्य नियोजन केले नाही तर गोव्यावर मोठे पाणीसंकट ओढवले जाणार आहे, अशी भीती पर्यावरण अभ्यासक राजेंद्र केरकर यांनी व्यक्त केली आहे.

डिचोली येथे शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना केरकर यांनी तिळारी कालवा वारंवार फुटत असल्याने डिचोलीला सिंचनासाठी तसेच बार्देश, पर्वरी भागात पाण्याची टंचाई भासते. साळ येथे पंपिंग स्टेशन तसेच आमठाणे येथे पाणी साठवून अस्नोडा जलसाठ्चात पुरवण्याच्या सरकारने अनेक योजना आहेत. मात्र, त्यासंदर्भात गांभीर्याने ज्या गोष्टी करणे गरजेचे आहे, त्याबाबत योग्य ती दखल सरकारने घ्यावी.

डिचोली जीवनदायिनी असलेल्या नदीला गटाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. सांडपाणी सोडणे, कचरा टाकणे, पूरप्रवण क्षेत्रात बांधकामांचे अतिक्रमण यामुळे डिचोली, वाळवंटी नदीवरही आक्रमणे व अनेक कारणास्तव संकट उद्भवले असून, त्यामुळे पडोशे जलशुद्धीकरण प्रकल्प, साखळी जलशुद्धीकरण प्रकल्प संकटात येण्याची भीती आहे.

सावध व्हावे...

म्हादईप्रश्नी सातत्याने सुनावणी पुढे ढकलण्यात येत आहे. त्यामुळे यासंदर्भात अद्याप ठोस निर्णय होऊ शकलेला नाही. म्हादईचे पाणी कर्नाटकाने यापूर्वीच पळवले आहे. तर महाराष्ट्राने सासोली, मणेरी येथे पाणी अडवून ते वेगवेगळ्या ठिकाणी नेण्यासाठी महाराष्ट्राने चंग बांधलेला आहे.

 

टॅग्स :goaगोवाWaterपाणी