शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

कर्नाटक, महाराष्ट्राने पळवले गोव्याचे पाणी: राजेंद्र केरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2025 12:58 IST

येत्या काळात भीषण पाणीटंचाई

लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : कळसा-भांडुरा प्रकल्पाद्वारे कर्नाटकाने तसेच विर्डी, सासोली, मणेरी व इतर जलप्रकल्पाद्वारे महाराष्ट्राने गोव्याचे पाणी पळविण्यासाठी षडयंत्र आखले आहे. अशातच तिळारीच्या पाण्याच्या भरोशावर अवलंबून असलेल्या गोव्याला सातत्याने पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहे. डिचोली, वाळवंटी व इतर नद्यांची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे भविष्यात योग्य नियोजन केले नाही तर गोव्यावर मोठे पाणीसंकट ओढवले जाणार आहे, अशी भीती पर्यावरण अभ्यासक राजेंद्र केरकर यांनी व्यक्त केली आहे.

डिचोली येथे शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना केरकर यांनी तिळारी कालवा वारंवार फुटत असल्याने डिचोलीला सिंचनासाठी तसेच बार्देश, पर्वरी भागात पाण्याची टंचाई भासते. साळ येथे पंपिंग स्टेशन तसेच आमठाणे येथे पाणी साठवून अस्नोडा जलसाठ्चात पुरवण्याच्या सरकारने अनेक योजना आहेत. मात्र, त्यासंदर्भात गांभीर्याने ज्या गोष्टी करणे गरजेचे आहे, त्याबाबत योग्य ती दखल सरकारने घ्यावी.

डिचोली जीवनदायिनी असलेल्या नदीला गटाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. सांडपाणी सोडणे, कचरा टाकणे, पूरप्रवण क्षेत्रात बांधकामांचे अतिक्रमण यामुळे डिचोली, वाळवंटी नदीवरही आक्रमणे व अनेक कारणास्तव संकट उद्भवले असून, त्यामुळे पडोशे जलशुद्धीकरण प्रकल्प, साखळी जलशुद्धीकरण प्रकल्प संकटात येण्याची भीती आहे.

सावध व्हावे...

म्हादईप्रश्नी सातत्याने सुनावणी पुढे ढकलण्यात येत आहे. त्यामुळे यासंदर्भात अद्याप ठोस निर्णय होऊ शकलेला नाही. म्हादईचे पाणी कर्नाटकाने यापूर्वीच पळवले आहे. तर महाराष्ट्राने सासोली, मणेरी येथे पाणी अडवून ते वेगवेगळ्या ठिकाणी नेण्यासाठी महाराष्ट्राने चंग बांधलेला आहे.

 

टॅग्स :goaगोवाWaterपाणी