शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

न्यायाधीश 'स्मार्ट' काम पाहणार, ३१ मेपर्यंत कामे झालीच पाहिजेत: उच्च न्यायालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2024 07:15 IST

धूळ प्रदूषण प्रकरणाची घेतली गंभीर दखल

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : स्मार्ट सिटीचे काम हे ३१ मेपर्यंत पूर्ण झालेच पाहिजे, असा आदेश न्यायालयाने सरकारला दिला आहे. तसेच प्रकल्पाचे काम आणि शहरातील एकूणच परिस्थितीची सोमवार, दि. १ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता स्वतः न्यायाधीश पाहणी करणार आहेत. यामुळे इमेजीन पणजी स्मार्ट सिटी महामंडळ आणि पालिकेसह सरकारी यंत्रणांची धांदल उडाली आहे.

पणजीतील धूळ प्रदूषण प्रकरण बुधवारी सुनावणीस आले तेव्हा या प्रकरणात सरकारकडून सत्यस्थिती अहवाल सादर केल्याची माहिती अॅडव्होकेट जनरल देवीदास पांगम यांनी दिली. झालेल्या व राहिलेल्या कामाचा अहवालात उल्लेख आहे. स्मार्ट सिटीची एकूण ४७ पैकी ३५ कामे पूर्ण झाली असून केवळ १२ कामे राहिली असून ती कामे ३१ मे पर्यंत पूर्ण करण्याची ग्वाही सरकारने पाळलीच पाहिजे, असे खंडपीठाने सुनावले.

१ एप्रिल रोजी न्यायाधीशांकडून कामाची पाहणी केली जाणार असल्याचेही न्यायाधीशांनी सांगितले. राजधानीत पणजीत स्मार्ट सिटीच्या कामामुळे होणाऱ्या धूळ प्रदूषणामुळे त्रस्त नागरिकांनी खंडपीठात सादर केलेली याचिका मंगळवारी सुनावणीस आली. त्यानंतर न्यायलायानेही याची गंभीर दखल घेतली आहे.

काम फसले

कंत्राटदाराविरोधात आम्ही पणजीचे पोलिस निरीक्षक व पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली होती. मात्र, कारवाई झाली नाही. आता पणजीवासीयांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे तसेच व्यावसायिकही या कामामुळे त्रासले असून प्रकल्पाचे काम फसल्याची टीका समील वळवईकर यांनी केली.

धूळ प्रदूषण डेटा घ्या

शहरातील धूळ प्रदूषणाची तपासणी करण्याची यंत्रणा त्वरित उभारण्यात यावी, असा आदेश खंडपीठाने मंगळवारीच दिला होता. या आदेशाची अंमलबजावणी करणे चालू असल्याची माहिती सरकारतर्फे देण्यात आली. तेव्हा आतापासूनच धूळ प्रदूषणाची मात्रा तपासणारा डेटा गोळा करण्यात यावा, असा आदेश गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला न्यायालयाने दिला.

डिमेलोही न्यायालयात

शहरातील या कामांमुळे एका २१ वर्षीय तरुणाचा अपघाती जीव गेला. त्यामुळे या प्रकल्पाच्या कंत्राटदाराला जबाबदार धरून त्याच्याविरोधात गुन्हा नोंद करण्याचे निर्देश पणजी पोलिसांना द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका तृणमूल काँग्रेसचे नेते ट्रोजन डिमेलो यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात सादर केली आहे.

हा प्रकल्प शाप आहे

धुळ प्रदूषण यामुळे पणजी एखाद्या खाण क्षेत्राप्रमाणे भासत आहे. रस्ते वारंवार खोदले जात आहेत. ३१ मेपर्यंत काम संपविण्यासाठी दर्जाकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे या कामांचे ऑडिट व्हावे, अशी मागणी आपण केली आहे. त्यामुळे हा प्रकल्प शहरासाठी वरदान नसून शाप ठरला आहे, अशी टीका माजी महापौर उदय मडकईकर यांनी केली आहे.

 

टॅग्स :goaगोवाSmart Cityस्मार्ट सिटीHigh Courtउच्च न्यायालय