शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबाला नोकऱ्या: मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 11:23 IST

पत्रादेवीत हुतात्म्यांना आदरांजली, प्रकल्पांद्वारे पेडणेवासीयांचा विकास

लोकमत न्यूज नेटवर्क, पेडणेः स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानातून देश स्वतंत्र झाला. १९५७ साली गोवा मुक्तीसाठी देशातील वेगवेगळ्या प्रांतांमधून स्वातंत्र्यसैनिकांची आणि त्यांची एक तुकडी पत्रादेवी या ठिकाणी आली आणि त्यांनी गोवामुक्तीसाठी बलिदान दिले. त्यांचे स्मरण करणे आणि गोवामुक्तीसाठी ज्या स्वातंत्र्यसैनिकांनी लढ्यात सहभाग घेतला, आपले बलिदान दिले त्यांतील काही हयात आहेत, काही नाहीत. त्यांच्या कुटुंबीयांना, त्यांच्या सदस्यांना येणाऱ्या वर्षभरात शंभर टक्के शासकीय नोकऱ्या देऊन गौरव केला जाईल, असे उद्गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले.

पत्रादेवी येथील हुतात्मा स्मारकाजवळ पुष्पांजली आणि ध्वजारोहण केल्यानंतर स्वातंत्र्यदिनाच्या राष्ट्रीय उत्सवात प्रमुख पाहणे या नात्याने ते बोलत होते. यावेळी पेडणे मतदारसंघाचे आमदार प्रवीण आर्लेकर, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार सदानंद तानावडे, स्वातंत्र्यसैनिक संजय प्रभुदेसाई, सरपंच प्रार्थना मोटे, पेडणेचे नगराध्यक्ष सिद्धेश पेडणेकर, उपजिल्हाधिकारी दीपक वायंगणकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. 

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, हुतात्मा स्मारकाचे सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. मागच्या काही काळात तांत्रिक समस्यांमुळे या कामात अडचणी आल्या. मात्र, दि. १९ डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण करून त्याच दिवशी लोकार्पण करण्यात येईल, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले. माहिती अधिकारी श्याम गावकर यांनी सूत्रसंचालन केले. बाल भवन केंद्राच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत व देशगीत सादर करून देशभक्तिपर वातावरण निर्मिती केली. यावेळी आमदार प्रवीण आर्लेकर यांचे भाषण झाले.

नवभारत, स्वयंपूर्ण गोव्यासाठी सर्वांनी झटूया

विमानतळ, आयुष्य इस्पितळ असे अनेक प्रकल्प भूमिपुत्रांसाठी कार्यरत आहेत. त्यांचाही लाभ घ्यावा. मुख्यमंत्री या नात्याने गोव्याचा विकास आपण सातत्याने करत असल्याचेही ते म्हणाले. नवभारत, नवीन विकास, स्वयंपूर्ण गोवा होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. गोवा विकसित करण्यासाठी तमाम गोमंतकीय प्रशासकीय अधिकारी, सरपंच, पंच. नागरिकांनी सरकारच्या कार्यासाठी पाठिंबा देऊन नवभारत, नवगोवा निर्मितीसाठी योगदान द्यावे, असे त्यांनी आवाहन केले. गोवा स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न करुया. गोवा हिरवागार ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहूया आणि सोनेरी किरणांनी व्यापलेला गोवा आणि देशप्रेम जागृत करून प्रत्येकाने यात सहभागी होऊन काम करूया, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

हिरवे गुरुजींचे स्मारक लवकरच पूर्णत्वास

हिरवे गुरुजींच्या स्मारकाचे काम सुरु करण्यात येईल. त्याचेही अनावरण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. स्वातंत्र्यसैनिकांनी बलिदान दिल्यामुळे आम्हांला स्वातंत्र्य मिळाले आहे. ते ठेवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया, असे आवाहन मुख्यमंत्री सावंत यांनी यावेळी केले.

बलशाली भारत बनवूया : श्रीपाद नाईक

भारत देश २०४७ मध्ये पूर्णपणे विकसित होऊन जगात नंबर एकचा असेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केला. युवापिढीने देशाविषयीचे प्रेम जागृत करावे. भारत देश बलशाली बनवण्यासाठी संघटित होऊया, असे आवाहन केले.

२०४७ पर्यंत भारत जगात नंबर एक बनेल

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करूया. देश विकसित करण्यासाठी त्यांनी पाऊल टाकलेले आहे. देशाचा विकास केंद्र सरकार, राज्य सरकार झपाट्याने करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. २०४७ मध्ये भारत देश पूर्णपणे विकसित होऊन जगात नंबर वन असेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री नाईक यांनी व्यक्त केला.

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत