शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

नोकऱ्यांची निर्मिती ठप्प

By admin | Updated: January 25, 2015 01:42 IST

शासकीय, खासगी क्षेत्रात ‘मंदी’ : शासकीय तिजोरीला मर्यादा; उद्योगही रोडावले

पणजी : गेली तीन वर्षे शासकीय तिजोरीला मोठी आर्थिक झळ बसल्यामुळे प्रशासनात नव्या नोकऱ्या तयार होण्याची प्रक्रिया बरीच मंदावली आहे. उद्योगही संख्येने खूप कमी येत असल्याने खासगी क्षेत्रातही नव्या नोकऱ्या तयार होण्याचे प्रमाण अत्यल्प बनले आहे. एकंदरीत शासकीय व खासगी क्षेत्रात नोकऱ्यांची निर्मिती जवळजवळ थांबली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या सध्या ५५ हजार आहे. दर महिन्याला १०० कोटींपेक्षा जास्त रक्कम सरकारला कर्मचाऱ्यांच्या वेतनावर खर्च करावी लागत आहे. आर्थिक स्थिती ठीक नसल्याने सरकारने नवी पदे निर्माण करण्यावर व रद्द झालेली पदे पुनरुज्जीवित करण्यावरही निर्बंध लागू केले आहेत. गेल्या तीन वर्षांतही जास्त शासकीय नोकऱ्या निर्माण झाल्या नाहीत. पोलीस खात्यात थोडीफार भरती झाली. मात्र, पीएसआय भरती वादग्रस्त ठरली. आता पुढील दोन वर्षांत शासकीय क्षेत्रात जास्त नोकऱ्या निर्माण होणार नाहीत. मोठे उद्योग गोव्यात येतात व त्यामुळे खासगी क्षेत्रात नोकऱ्या निर्माण होतात, असेही दिसून येत नाही. गोव्यात अस्तित्वात असलेल्याच थोड्या उद्योगांचा विस्तार होत आहे. सरकारने गुंतवणूक धोरण तयार केले व गुंतवणूक मंडळ बनविले, तरीही एकदेखील मोठा उद्योग गोव्यात आलेला नाही. पुढील दोन वर्षांत खासगी क्षेत्रात किती रोजगार संधी निर्माण होतील, हेही सरकार नीटपणे सांगू शकत नाही. सत्तेवर आल्यानंतर पाच वर्षांत ५० हजार नोकऱ्या निर्माण करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते; पण उद्योगमंत्री महादेव नाईक यांनी हे लक्ष्य २०१७ पर्यंत गाठता येणार नाही, हे अलीकडेच स्पष्ट केले आहे. (खास प्रतिनिधी)