शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

पक्ष गेला उडत; जीत आरोलकर नाराज, मुख्यमंत्र्यांशी जवळीक वाढली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2024 12:36 IST

आरोलकर व मुख्यमंत्री सावंत यांचे सूर आता बऱ्यापैकी जुळले आहेत.

म. गो. पक्षाचे आमदार जीत आरोलकर हे पक्ष नेतृत्वावर खूपच नाराज आहेत याची कल्पना आता सर्वांनाच आली असेल. माझ्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे सर्वात आधी आहेत आणि त्यानंतर म. गो. पक्ष असे विधान आरोलकर यांनी केले, मुख्यमंत्री सावंत हे भाजपचे नेते आहेत. मात्र आरोलकर व मुख्यमंत्री सावंत यांचे सूर आता बऱ्यापैकी जुळले आहेत. मगो पक्षाचे नेते सुदिन ढवळीकर हे मंत्रिपदी आहेत. मात्र ढवळीकर यांच्याशी आरोलकर यांचे पूर्वीसारखे आता पटत नाही. अर्थात ते पटणारही नाही, जीत आरोलकर यांना गृहनिर्माण मंडळाचे चेअरमनपद सरकारने दिले आहे. ढवळीकर हे गृहनिर्माण मंत्री आहेत. मात्र मंत्री या नात्याने ढवळीकर यांच्याकडून जीत आरोलकर यांना हवे तसे सहकार्य मिळत नाही, अशी अधिकारी वर्गात चर्चा आहे. उलट मुख्यमंत्री सावंत यांच्याकडून सहकार्य मिळते, पाठिंबा मिळतो. यामुळे जीत मगो पक्षाच्या नेतृत्वावर संतापलेले आहेत. या संतापाचा उद्रेक अधूनमधून सध्या होत असतो.

दीड महिन्यांपूर्वीही एका वृत्त वाहिनीला मुलाखत देताना जीत आरोलकर यांनी शाब्दिक बॉम्ब टाकला होता. पुढील विधानसभा निवडणूक आपण कोणत्या पक्षाच्या तिकीटावर लढवावी ते लोक व कार्यकर्ते ठरवतील, असे आरोलकर म्हणाले होते. मांद्रे हा जीतचा मतदारसंघ, तिथे मगो पक्ष जिंकला तोच मुळी आरोलकर यांच्यामुळेच. आरोलकर यांना निवडणुकीवेळी मगो पक्षाने निधी दिला नव्हता, त्यांनी स्वतःच्या बळावर पैसा खर्च करून निवडणूक लढवली, आरोलकर मांद्रेत जिंकतील, असे कदाचित ढवळीकर यांनाही निवडणुकीवेळी वाटले नसावे. मात्र जीत जिंकले. डिचोलीत नरेश सावळ व फोंड्यात केतन भाटीकर हरलेच. शिवाय प्रियोळमध्ये मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर हेही पराभूत झाले. आता सुदिन व जीत या दोघांमुळेच विधानसभेत मगो पक्षाचे अस्तित्व आहे.

नरेश सावळ यांनी नुकताच मगो पक्ष सोडला. सावळ यांनी कार्यकर्त्याना सोबत घेऊन मगोच्या नेतृत्वावर सडकून टीकाही केली. वीज खात्यात नोकर भरती करताना आपल्या कार्यकत्यांना पदे दिली गेली नाहीत याचा राग सावळ यांनी काढला. जीत आरोलकर यांचा मुद्दा थोडा वेगळा आहे. आरोलकर यापूर्वी म्हणाले होते की, आपल्याला खूश ठेवावे, आनंदी ठेवावे म्हणून मगो पक्षाने काही केले नाही. जीत आरोलकर यांच्या मनातील खदखद खूप पूर्वी भाजपने व मुख्यमंत्री सावंत यांनी ओळखलेली आहे. जीत यांना गोंजारण्याचे काम मुख्यमंत्री करतात. आता लोकसभा निवडणुकीपुरती भाजपला ढवळीकर यांची गरज आहे. त्यानंतर मोठीशी गरज नसेल याचीही कल्पना लोकांना येतेच, समजा मोदी सरकार पुन्हा प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकसभेच्या जागा जिंकून सत्तेवर आले तर एकूण देशाचेच राजकारण बदलणार आहे. काही धडाकेबाज निर्णय होतील. 

गोव्यातील राजकारणातही हलचल होऊ शकते. विरोधी काँग्रेस शिल्लक राहिल काय हा जसा प्रश्न आहे, तसाच मगो पक्षाच्या अस्तित्वाचाही प्रश्न आहेच. मगो पक्षाची बोट सध्याच हेलकावे खात आहे. पूर्वी बाबू आजगावकर व दीपक प्रभू पाऊसकर यांनी मगो पक्षाची साथ सोडली होती. ते दोघेही भाजपमध्ये गेले होतेच. कदाचित २०२७ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी जीत यांनाही भाजपकडून पक्ष प्रवेशाची ऑफर येऊ शकते. मगोपचे अस्तित्व वेगळे आणि शिल्लक ठेवावे की नाही असा प्रश्न लोकसभा निवडणूक निकालानंतर येणारच आहे.जीत यांना वाऱ्याची दिशा कळालेली आहे.

जीत म्हणतात की, आमदार म्हणून मुख्यमंत्र्यांकडे आपला वारंवार संवाद होत असतो. त्यांच्याशीच सातत्याने संपर्क येत असतो. त्यामुळे त्यांचा शब्द माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. माझा मगो पक्ष हा निवडणुकीपुरता माझ्यासाठी असतो. जीत यांच्या या विधानांतून बरेच काही कळून येते. भाजपला येत्या निवडणुकीवेळी मांद्रेतून तेरा हजार मते मिळवून देण्याची ग्वाही जीत यांनी पूर्वीच दिलेली आहे. मांद्रे मतदारसंघात मुख्यमंत्री सावंत यांच्या कृपेने जीत हे विविध विकास कामे पुढे नेत आहेत, असे सांगितले जाते. तिथे नवे पोलिस स्थानकही झाले, यापुढे जॉगर्स पार्कही होणार आहे. कला संस्कृती मंत्री गोविंद गावडे हेही जीत यांचे मित्र आहेत. गोविंद गावडे हे तर ढवळीकर यांचे राजकीय वैरीच आहेत, जीत यांनी मुख्यमंत्री सावंत यांचे घेतलेले शिष्यत्व गोविंद गावडे यांनाही निश्चितच आवडत असेल.

 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाPoliticsराजकारण