शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

पक्ष गेला उडत; जीत आरोलकर नाराज, मुख्यमंत्र्यांशी जवळीक वाढली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2024 12:36 IST

आरोलकर व मुख्यमंत्री सावंत यांचे सूर आता बऱ्यापैकी जुळले आहेत.

म. गो. पक्षाचे आमदार जीत आरोलकर हे पक्ष नेतृत्वावर खूपच नाराज आहेत याची कल्पना आता सर्वांनाच आली असेल. माझ्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे सर्वात आधी आहेत आणि त्यानंतर म. गो. पक्ष असे विधान आरोलकर यांनी केले, मुख्यमंत्री सावंत हे भाजपचे नेते आहेत. मात्र आरोलकर व मुख्यमंत्री सावंत यांचे सूर आता बऱ्यापैकी जुळले आहेत. मगो पक्षाचे नेते सुदिन ढवळीकर हे मंत्रिपदी आहेत. मात्र ढवळीकर यांच्याशी आरोलकर यांचे पूर्वीसारखे आता पटत नाही. अर्थात ते पटणारही नाही, जीत आरोलकर यांना गृहनिर्माण मंडळाचे चेअरमनपद सरकारने दिले आहे. ढवळीकर हे गृहनिर्माण मंत्री आहेत. मात्र मंत्री या नात्याने ढवळीकर यांच्याकडून जीत आरोलकर यांना हवे तसे सहकार्य मिळत नाही, अशी अधिकारी वर्गात चर्चा आहे. उलट मुख्यमंत्री सावंत यांच्याकडून सहकार्य मिळते, पाठिंबा मिळतो. यामुळे जीत मगो पक्षाच्या नेतृत्वावर संतापलेले आहेत. या संतापाचा उद्रेक अधूनमधून सध्या होत असतो.

दीड महिन्यांपूर्वीही एका वृत्त वाहिनीला मुलाखत देताना जीत आरोलकर यांनी शाब्दिक बॉम्ब टाकला होता. पुढील विधानसभा निवडणूक आपण कोणत्या पक्षाच्या तिकीटावर लढवावी ते लोक व कार्यकर्ते ठरवतील, असे आरोलकर म्हणाले होते. मांद्रे हा जीतचा मतदारसंघ, तिथे मगो पक्ष जिंकला तोच मुळी आरोलकर यांच्यामुळेच. आरोलकर यांना निवडणुकीवेळी मगो पक्षाने निधी दिला नव्हता, त्यांनी स्वतःच्या बळावर पैसा खर्च करून निवडणूक लढवली, आरोलकर मांद्रेत जिंकतील, असे कदाचित ढवळीकर यांनाही निवडणुकीवेळी वाटले नसावे. मात्र जीत जिंकले. डिचोलीत नरेश सावळ व फोंड्यात केतन भाटीकर हरलेच. शिवाय प्रियोळमध्ये मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर हेही पराभूत झाले. आता सुदिन व जीत या दोघांमुळेच विधानसभेत मगो पक्षाचे अस्तित्व आहे.

नरेश सावळ यांनी नुकताच मगो पक्ष सोडला. सावळ यांनी कार्यकर्त्याना सोबत घेऊन मगोच्या नेतृत्वावर सडकून टीकाही केली. वीज खात्यात नोकर भरती करताना आपल्या कार्यकत्यांना पदे दिली गेली नाहीत याचा राग सावळ यांनी काढला. जीत आरोलकर यांचा मुद्दा थोडा वेगळा आहे. आरोलकर यापूर्वी म्हणाले होते की, आपल्याला खूश ठेवावे, आनंदी ठेवावे म्हणून मगो पक्षाने काही केले नाही. जीत आरोलकर यांच्या मनातील खदखद खूप पूर्वी भाजपने व मुख्यमंत्री सावंत यांनी ओळखलेली आहे. जीत यांना गोंजारण्याचे काम मुख्यमंत्री करतात. आता लोकसभा निवडणुकीपुरती भाजपला ढवळीकर यांची गरज आहे. त्यानंतर मोठीशी गरज नसेल याचीही कल्पना लोकांना येतेच, समजा मोदी सरकार पुन्हा प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकसभेच्या जागा जिंकून सत्तेवर आले तर एकूण देशाचेच राजकारण बदलणार आहे. काही धडाकेबाज निर्णय होतील. 

गोव्यातील राजकारणातही हलचल होऊ शकते. विरोधी काँग्रेस शिल्लक राहिल काय हा जसा प्रश्न आहे, तसाच मगो पक्षाच्या अस्तित्वाचाही प्रश्न आहेच. मगो पक्षाची बोट सध्याच हेलकावे खात आहे. पूर्वी बाबू आजगावकर व दीपक प्रभू पाऊसकर यांनी मगो पक्षाची साथ सोडली होती. ते दोघेही भाजपमध्ये गेले होतेच. कदाचित २०२७ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी जीत यांनाही भाजपकडून पक्ष प्रवेशाची ऑफर येऊ शकते. मगोपचे अस्तित्व वेगळे आणि शिल्लक ठेवावे की नाही असा प्रश्न लोकसभा निवडणूक निकालानंतर येणारच आहे.जीत यांना वाऱ्याची दिशा कळालेली आहे.

जीत म्हणतात की, आमदार म्हणून मुख्यमंत्र्यांकडे आपला वारंवार संवाद होत असतो. त्यांच्याशीच सातत्याने संपर्क येत असतो. त्यामुळे त्यांचा शब्द माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. माझा मगो पक्ष हा निवडणुकीपुरता माझ्यासाठी असतो. जीत यांच्या या विधानांतून बरेच काही कळून येते. भाजपला येत्या निवडणुकीवेळी मांद्रेतून तेरा हजार मते मिळवून देण्याची ग्वाही जीत यांनी पूर्वीच दिलेली आहे. मांद्रे मतदारसंघात मुख्यमंत्री सावंत यांच्या कृपेने जीत हे विविध विकास कामे पुढे नेत आहेत, असे सांगितले जाते. तिथे नवे पोलिस स्थानकही झाले, यापुढे जॉगर्स पार्कही होणार आहे. कला संस्कृती मंत्री गोविंद गावडे हेही जीत यांचे मित्र आहेत. गोविंद गावडे हे तर ढवळीकर यांचे राजकीय वैरीच आहेत, जीत यांनी मुख्यमंत्री सावंत यांचे घेतलेले शिष्यत्व गोविंद गावडे यांनाही निश्चितच आवडत असेल.

 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाPoliticsराजकारण