शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

पक्ष गेला उडत; जीत आरोलकर नाराज, मुख्यमंत्र्यांशी जवळीक वाढली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2024 12:36 IST

आरोलकर व मुख्यमंत्री सावंत यांचे सूर आता बऱ्यापैकी जुळले आहेत.

म. गो. पक्षाचे आमदार जीत आरोलकर हे पक्ष नेतृत्वावर खूपच नाराज आहेत याची कल्पना आता सर्वांनाच आली असेल. माझ्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे सर्वात आधी आहेत आणि त्यानंतर म. गो. पक्ष असे विधान आरोलकर यांनी केले, मुख्यमंत्री सावंत हे भाजपचे नेते आहेत. मात्र आरोलकर व मुख्यमंत्री सावंत यांचे सूर आता बऱ्यापैकी जुळले आहेत. मगो पक्षाचे नेते सुदिन ढवळीकर हे मंत्रिपदी आहेत. मात्र ढवळीकर यांच्याशी आरोलकर यांचे पूर्वीसारखे आता पटत नाही. अर्थात ते पटणारही नाही, जीत आरोलकर यांना गृहनिर्माण मंडळाचे चेअरमनपद सरकारने दिले आहे. ढवळीकर हे गृहनिर्माण मंत्री आहेत. मात्र मंत्री या नात्याने ढवळीकर यांच्याकडून जीत आरोलकर यांना हवे तसे सहकार्य मिळत नाही, अशी अधिकारी वर्गात चर्चा आहे. उलट मुख्यमंत्री सावंत यांच्याकडून सहकार्य मिळते, पाठिंबा मिळतो. यामुळे जीत मगो पक्षाच्या नेतृत्वावर संतापलेले आहेत. या संतापाचा उद्रेक अधूनमधून सध्या होत असतो.

दीड महिन्यांपूर्वीही एका वृत्त वाहिनीला मुलाखत देताना जीत आरोलकर यांनी शाब्दिक बॉम्ब टाकला होता. पुढील विधानसभा निवडणूक आपण कोणत्या पक्षाच्या तिकीटावर लढवावी ते लोक व कार्यकर्ते ठरवतील, असे आरोलकर म्हणाले होते. मांद्रे हा जीतचा मतदारसंघ, तिथे मगो पक्ष जिंकला तोच मुळी आरोलकर यांच्यामुळेच. आरोलकर यांना निवडणुकीवेळी मगो पक्षाने निधी दिला नव्हता, त्यांनी स्वतःच्या बळावर पैसा खर्च करून निवडणूक लढवली, आरोलकर मांद्रेत जिंकतील, असे कदाचित ढवळीकर यांनाही निवडणुकीवेळी वाटले नसावे. मात्र जीत जिंकले. डिचोलीत नरेश सावळ व फोंड्यात केतन भाटीकर हरलेच. शिवाय प्रियोळमध्ये मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर हेही पराभूत झाले. आता सुदिन व जीत या दोघांमुळेच विधानसभेत मगो पक्षाचे अस्तित्व आहे.

नरेश सावळ यांनी नुकताच मगो पक्ष सोडला. सावळ यांनी कार्यकर्त्याना सोबत घेऊन मगोच्या नेतृत्वावर सडकून टीकाही केली. वीज खात्यात नोकर भरती करताना आपल्या कार्यकत्यांना पदे दिली गेली नाहीत याचा राग सावळ यांनी काढला. जीत आरोलकर यांचा मुद्दा थोडा वेगळा आहे. आरोलकर यापूर्वी म्हणाले होते की, आपल्याला खूश ठेवावे, आनंदी ठेवावे म्हणून मगो पक्षाने काही केले नाही. जीत आरोलकर यांच्या मनातील खदखद खूप पूर्वी भाजपने व मुख्यमंत्री सावंत यांनी ओळखलेली आहे. जीत यांना गोंजारण्याचे काम मुख्यमंत्री करतात. आता लोकसभा निवडणुकीपुरती भाजपला ढवळीकर यांची गरज आहे. त्यानंतर मोठीशी गरज नसेल याचीही कल्पना लोकांना येतेच, समजा मोदी सरकार पुन्हा प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकसभेच्या जागा जिंकून सत्तेवर आले तर एकूण देशाचेच राजकारण बदलणार आहे. काही धडाकेबाज निर्णय होतील. 

गोव्यातील राजकारणातही हलचल होऊ शकते. विरोधी काँग्रेस शिल्लक राहिल काय हा जसा प्रश्न आहे, तसाच मगो पक्षाच्या अस्तित्वाचाही प्रश्न आहेच. मगो पक्षाची बोट सध्याच हेलकावे खात आहे. पूर्वी बाबू आजगावकर व दीपक प्रभू पाऊसकर यांनी मगो पक्षाची साथ सोडली होती. ते दोघेही भाजपमध्ये गेले होतेच. कदाचित २०२७ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी जीत यांनाही भाजपकडून पक्ष प्रवेशाची ऑफर येऊ शकते. मगोपचे अस्तित्व वेगळे आणि शिल्लक ठेवावे की नाही असा प्रश्न लोकसभा निवडणूक निकालानंतर येणारच आहे.जीत यांना वाऱ्याची दिशा कळालेली आहे.

जीत म्हणतात की, आमदार म्हणून मुख्यमंत्र्यांकडे आपला वारंवार संवाद होत असतो. त्यांच्याशीच सातत्याने संपर्क येत असतो. त्यामुळे त्यांचा शब्द माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. माझा मगो पक्ष हा निवडणुकीपुरता माझ्यासाठी असतो. जीत यांच्या या विधानांतून बरेच काही कळून येते. भाजपला येत्या निवडणुकीवेळी मांद्रेतून तेरा हजार मते मिळवून देण्याची ग्वाही जीत यांनी पूर्वीच दिलेली आहे. मांद्रे मतदारसंघात मुख्यमंत्री सावंत यांच्या कृपेने जीत हे विविध विकास कामे पुढे नेत आहेत, असे सांगितले जाते. तिथे नवे पोलिस स्थानकही झाले, यापुढे जॉगर्स पार्कही होणार आहे. कला संस्कृती मंत्री गोविंद गावडे हेही जीत यांचे मित्र आहेत. गोविंद गावडे हे तर ढवळीकर यांचे राजकीय वैरीच आहेत, जीत यांनी मुख्यमंत्री सावंत यांचे घेतलेले शिष्यत्व गोविंद गावडे यांनाही निश्चितच आवडत असेल.

 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाPoliticsराजकारण