शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

गणेश चतुर्थीनंतर जनता दरबार पूर्ववत; मुख्यमंत्र्यांकडे गाऱ्हाणी मांडण्यासाठी लोकांची धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2024 12:41 IST

ख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी शेकडो लोकांची गाऱ्हाणी ऐकून घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : मुख्यमंत्र्यांचा जनता दरबारात राज्याच्या कानाकोपऱ्यांतून लोक आपल्या समस्या, कामे घेऊन येतात. गणेश चतुर्थीनिमित्त काही दिवस बंद असलेला जनता दरबार शनिवारपासून साखळी येथे पुन्हा सुरू झाला असून, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी शेकडो लोकांची गाऱ्हाणी ऐकून घेतली.

या जनता दरबारात वेगवेगळ्या भागातून लोक नोकरी, बदली, सामाजिक आणि कामे वैयक्तिक कामे घेऊन येतात. दरबारात मुख्यमंत्री प्रत्येकाचे म्हणणे ऐकून घेत आपल्या कर्मचाऱ्यांमार्फत प्रत्येक निवेदन अर्जाची तपासणी करून त्याचा पाठपुरावा करतात. त्यामुळे आज जनता दरबार खऱ्या अर्थाने उपयुक्त ठरत असल्याची भावना राज्यातील जनतेकडून व्यक्त केली जात आहे.

सहज उपलब्ध होणारे मुख्यमंत्री अशी ख्याती असलेले डॉ. सावंत यांना गणेश चतुर्थीनिमित्त शेकडो लोक त्यांच्या घरी जाऊन गणेशाचे दर्शन घेऊन संवाद साधून गेले होते. जनता दरबारात लोकांचे प्रश्न सुटतात. त्यामुळेच लोक वेगवेगळ्या भागातून नियमित या ठिकाणी येत असतात. या व्यतिरिक्त मुख्यमंत्री आपल्या साखळीतील निवासस्थानी सकाळी घरातून निघण्यापूर्वी किमान दीडशे ते दोनशे लोकांना आवर्जून भेटतात. त्यांच्या समस्या समजून घेतात. 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत