शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
2
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
3
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
4
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
5
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
6
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
7
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
8
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
9
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
10
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
11
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
12
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
13
Indigo ला साडेसाती भोवली? दोन शत्रू ग्रहांमुळे अशी ‘दशा’ झाली; २०२७ पर्यंत आव्हान कायम अन्…
14
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
15
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
16
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
17
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
18
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
19
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
20
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
Daily Top 2Weekly Top 5

जनमत कौलाला होता जनसंघाचा विरोध! माणिकराव ठाकरे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2024 08:50 IST

नेहरूंनी गोव्याचे वेगळेपण जपले; ओपिनियन पोलदिनी काँग्रेसचे मडगाव येथे शक्तिप्रदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : कॉंग्रेस पक्ष हा लोकशाही मानणारा पक्ष आहे. भाजपने आतापर्यंत धर्माच्या नावाने लोकांना आपसात लढवायचे व सत्ता मिळवायची हाच उद्योग केला आहे. गोव्याचे वेगळे अस्तित्व कायम रहावे यासाठी पंडित नेहरु व अन्य काँग्रेस नेत्यांनी प्रयत्न केले. मात्र, त्याचवेळी लोकसभेत गोव्यातील नियोजित जनमत कौलाला जनसंघाच्या खासदाराने विरोध केला होता, अशीसा दावा काँग्रेसचेगोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी केला.

कॉंग्रेसतर्फे काल, मंगळवारी येथील लोहिया मैदानावर अस्मिताय दिनानिमित्त सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ठाकरे यांनी भाजपवर टीका करताना आश्वासने देणे व त्याकडे पाठ वळविणे हेच त्या पक्षाचे काम असल्याचे सांगितले. 

काँग्रेस पक्ष सोडून अनेकजण गेले मात्र जनता आमच्याबरोबर आहे. १९५२ मध्ये देशात पहिली लोकसभा निवडणूक झाली. त्यावेळी अनेक पक्षांनी उमेदवार उभे केले होते. काँग्रेस सर्वांना सोबत घेऊन जाणारा पक्ष त्यावेळीही होता व आजही आहे. पंडित नेहरु यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने त्यावेळी लोकसभेच्या ८० टक्के जागा जिंकल्या होत्या, याची आठवणही त्यांनी करुन दिली.

खासदार फ्रान्सिस सार्दीन यांनी आजच हा दिवस महत्वाचा असल्याचे सांगितले. भाजप धर्मामध्ये फूट घालते, फोडा व सत्ता करा, हेच त्यांचे धोरण आहे. त्यामुळेच आपले गोंयकारपण धोक्यात आले आहे. यावेळी आमदार कार्लस फेरेरा, आमदार एल्टन डिकॉस्टा, उपाध्यक्ष एम. के. शेख, माजी आमदार राधाराव ग्राशियस, एलिना साल्ढाना, कायत सिल्वा, अॅड, रमाकांत खलप व इतर नेते उपस्थित होते.

गोव्यातील जमीन, नैसर्गिक स्रोत जतन करुन ठेवणे, तामानारसह म्हादईचे संरक्षण करणे, युवकांना रोजगाराची हमी तसेच भाजप सरकारच्या कॅश फॉर जॉबचा पदार्फश करणे, ज्या गोवेकरांचा जन्म १९६१ पूर्वी झाला आहे व त्याचे वारसदारांना दुहेरी नागरिकत्व मिळवून देणे, दाबोळी विमानतळ बंद न करणे, अनुसूचित जमातीना गोवा राज्य विधानसभा निवडणुकीत राजकीय आरक्षणाबाबत लढा देणे आदी उराय घेण्यात आले.

सत्ताधारी संघाच्या इशाऱ्यावर

प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर म्हणाले, गोव्याची ओळख अबाधित रहावी यासाठी पंडित नेहरू व कॉग्रेसने नेहमी प्रवल केले आहेत. मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे संघाच्या इशाऱ्यावर नाचत असून राज्यात द्वेष परसवण्याला त्यांचा पाठींबा असल्याचा आरोपही त्यांनी केला.

सरकारने राज्याला कर्जबाजारी केलेय

विरोधी पक्षनेते ग्ररी आलेमाव यांनी जनमत कॉल ही गोवेकरांना देवाने दिलेली भेट आहे. हा मार्ग कॉंग्रेस व नेहरु यांनी दिला. आम्ही आजचा हा दिवस संपूर्ण राज्य साजरा करण्याची मागणी केली होती, मात्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. गोव्याची सध्या प्रत्येक ठिकाणी पिछेहाट होत आहे. या राज्यावर ३५ हजार कोटींचे कर्ज आहे. सरकार नोकऱ्या विकतो. केवळ सोहळे करण्यातच त्यांना रुची असल्याची टीकाही त्यांनी केली.

 

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेसManikrao Thackreyमाणिकराव ठाकरेManikrao Thakareमाणिकराव ठाकरे