शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

जनमत कौलाला होता जनसंघाचा विरोध! माणिकराव ठाकरे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2024 08:50 IST

नेहरूंनी गोव्याचे वेगळेपण जपले; ओपिनियन पोलदिनी काँग्रेसचे मडगाव येथे शक्तिप्रदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : कॉंग्रेस पक्ष हा लोकशाही मानणारा पक्ष आहे. भाजपने आतापर्यंत धर्माच्या नावाने लोकांना आपसात लढवायचे व सत्ता मिळवायची हाच उद्योग केला आहे. गोव्याचे वेगळे अस्तित्व कायम रहावे यासाठी पंडित नेहरु व अन्य काँग्रेस नेत्यांनी प्रयत्न केले. मात्र, त्याचवेळी लोकसभेत गोव्यातील नियोजित जनमत कौलाला जनसंघाच्या खासदाराने विरोध केला होता, अशीसा दावा काँग्रेसचेगोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी केला.

कॉंग्रेसतर्फे काल, मंगळवारी येथील लोहिया मैदानावर अस्मिताय दिनानिमित्त सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ठाकरे यांनी भाजपवर टीका करताना आश्वासने देणे व त्याकडे पाठ वळविणे हेच त्या पक्षाचे काम असल्याचे सांगितले. 

काँग्रेस पक्ष सोडून अनेकजण गेले मात्र जनता आमच्याबरोबर आहे. १९५२ मध्ये देशात पहिली लोकसभा निवडणूक झाली. त्यावेळी अनेक पक्षांनी उमेदवार उभे केले होते. काँग्रेस सर्वांना सोबत घेऊन जाणारा पक्ष त्यावेळीही होता व आजही आहे. पंडित नेहरु यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने त्यावेळी लोकसभेच्या ८० टक्के जागा जिंकल्या होत्या, याची आठवणही त्यांनी करुन दिली.

खासदार फ्रान्सिस सार्दीन यांनी आजच हा दिवस महत्वाचा असल्याचे सांगितले. भाजप धर्मामध्ये फूट घालते, फोडा व सत्ता करा, हेच त्यांचे धोरण आहे. त्यामुळेच आपले गोंयकारपण धोक्यात आले आहे. यावेळी आमदार कार्लस फेरेरा, आमदार एल्टन डिकॉस्टा, उपाध्यक्ष एम. के. शेख, माजी आमदार राधाराव ग्राशियस, एलिना साल्ढाना, कायत सिल्वा, अॅड, रमाकांत खलप व इतर नेते उपस्थित होते.

गोव्यातील जमीन, नैसर्गिक स्रोत जतन करुन ठेवणे, तामानारसह म्हादईचे संरक्षण करणे, युवकांना रोजगाराची हमी तसेच भाजप सरकारच्या कॅश फॉर जॉबचा पदार्फश करणे, ज्या गोवेकरांचा जन्म १९६१ पूर्वी झाला आहे व त्याचे वारसदारांना दुहेरी नागरिकत्व मिळवून देणे, दाबोळी विमानतळ बंद न करणे, अनुसूचित जमातीना गोवा राज्य विधानसभा निवडणुकीत राजकीय आरक्षणाबाबत लढा देणे आदी उराय घेण्यात आले.

सत्ताधारी संघाच्या इशाऱ्यावर

प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर म्हणाले, गोव्याची ओळख अबाधित रहावी यासाठी पंडित नेहरू व कॉग्रेसने नेहमी प्रवल केले आहेत. मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे संघाच्या इशाऱ्यावर नाचत असून राज्यात द्वेष परसवण्याला त्यांचा पाठींबा असल्याचा आरोपही त्यांनी केला.

सरकारने राज्याला कर्जबाजारी केलेय

विरोधी पक्षनेते ग्ररी आलेमाव यांनी जनमत कॉल ही गोवेकरांना देवाने दिलेली भेट आहे. हा मार्ग कॉंग्रेस व नेहरु यांनी दिला. आम्ही आजचा हा दिवस संपूर्ण राज्य साजरा करण्याची मागणी केली होती, मात्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. गोव्याची सध्या प्रत्येक ठिकाणी पिछेहाट होत आहे. या राज्यावर ३५ हजार कोटींचे कर्ज आहे. सरकार नोकऱ्या विकतो. केवळ सोहळे करण्यातच त्यांना रुची असल्याची टीकाही त्यांनी केली.

 

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेसManikrao Thackreyमाणिकराव ठाकरेManikrao Thakareमाणिकराव ठाकरे