शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

राज्यातील 99 गावांमध्ये खाणी सुरू होणे अशक्य, पर्यावरणीय संवेदनक्षम क्षेत्रे जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2018 21:37 IST

कस्तुरीरंगन अहवालानुसार राज्यातील 99 गावे ही पर्यावरणीय संवेदनक्षम ठरतात. त्या गावांमध्ये खनिज खाणी सुरूच करता येणार नाहीत हे स्पष्ट झाले आहे.

पणजी - कस्तुरीरंगन अहवालानुसार राज्यातील 99 गावे ही पर्यावरणीय संवेदनक्षम ठरतात. त्या गावांमध्ये खनिज खाणी सुरूच करता येणार नाहीत हे स्पष्ट झाले आहे. केंद्र सरकारने जरी खनिज कायदे दुरुस्त करणारा वटहुकूम जारी केला तरी, हरित लवादाच्या नव्या आदेशांनुसार 99 गावे ही पर्यावरणीय संवेदनक्षम भागात येतात व त्यामुळे तिथे खाणी सुरू करता येणार नाहीत.

कस्तुरीरंगन अहवालाचे निष्कर्ष गोवा सरकारने यापूर्वी दाबून ठेवले होते. 99 ऐवजी 19 गावेच गोव्यात पर्यावरणीय संवेदनक्षम आहेत अशी भूमिका गोवा सरकारने घेतली होती. मात्र केरळमधील पुरानंतर देशभरातच जी स्थिती निर्माण झालेली आहे व राष्ट्रीय हरित लवादानेही नुकताच जो निवाडा दिला आहे, त्या पार्श्वभूमीवर कस्तुरीरंगन अहवालात कोणताच बदल करता येणार नाही. त्या अहवालानुसार 99 गावे इकोलॉजीकली सेनसीटीव क्षेत्रमध्ये येतात. 

सांगे तालुक्यात एकूण 37 महसुली गावे आहेत, त्यापैकी 25 गावे पर्यावरणीय संवेदनक्षम (ईआयए) क्षेत्रत येतात, असे कस्तुरीरंगन अहवालात म्हटले आहे. म्हणजेच सांगे तालुक्याचा एक तृतीयांश भाग हा पर्यावरणीय संवेदनक्ष आहे. तिथे खनिज खाणी सुरू करता येत नाहीत. धारबांदोडा तालुक्यातील सोळा पैकी बारा गावे ही पर्यावरणीय संवेदनक्षम क्षेत्रत येतात. अशा गावांमध्ये खाणी सुरू करणोच नव्हे तर वखारी देखील चालविता येत नाहीत. झाडे कापता येत नाहीत.

गोव्यात 1 हजार 424.46 चौरस किलोमीटर क्षेत्र हे वन क्षेत्र आहे. 200 चौरस किलोमीटर खासगी वन क्षेत्र आहे. फक्त 61.52 टक्के जमीन ही बिगर वनक्षेत्र ठरते. एकूण 755 चौरस किलोमीटर क्षेत्र म्हणजे 20 टक्के गोवा हा वन्यप्राणी संरक्षण क्षेत्रत येतो. कस्तुरीरंगन अहवालानुसार 1461 चौरस किलोमीटरचे गोव्याच क्षेत्र हे पर्यावरणीय संवेदनक्षम क्षेत्र ठरते. गोव्याचे क्षेत्रफळ एकूण 3 हजार 702 चौरस किलोमीटरचे असून यापैकी 1 हजार 25क् चौरस किलोमीटर क्षेत्र हे संरक्षित, राखीव व खासगी वन क्षेत्रत येते. तिथे काहीच करता येत नाही हे कस्तुरीरंगन अहवालात म्हटले आहे. राज्याची 4क् टक्के जागा ही कृषी क्षेत्रत येते. फक्त 5.32 टक्के म्हणजे 196.8क् चौरस किलोमीटर जागा ही कोणत्याच अडथळ्य़ांवीना आहे. म्हणजे ही जागा सीआरङोडमध्ये येत नाही किंवा नदीचे प्रवाहही तिथे नाहीत. 

सत्तरी तालुक्यातील 56 गावे ही पर्यावरणीय संवेदनक्षम क्षेत्रत येतात. या गावांमध्ये अंजुणो, गुळ्ळे, डोंगरवाडा-पणसुली, करंजोळ, देरोडे, पेंड्राल, साट्रे, वायंगिणी, शेळपे-बुद्रुक, कडवळ, शिंगणो या गावांमधील 10 टक्के भाग हा पर्यावरणीय संवेदनक्षम क्षेत्रत येतो, असे कस्तुरीरंगन अहवालात म्हटले आहे.

टॅग्स :goaगोवाnewsबातम्या