शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील 99 गावांमध्ये खाणी सुरू होणे अशक्य, पर्यावरणीय संवेदनक्षम क्षेत्रे जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2018 21:37 IST

कस्तुरीरंगन अहवालानुसार राज्यातील 99 गावे ही पर्यावरणीय संवेदनक्षम ठरतात. त्या गावांमध्ये खनिज खाणी सुरूच करता येणार नाहीत हे स्पष्ट झाले आहे.

पणजी - कस्तुरीरंगन अहवालानुसार राज्यातील 99 गावे ही पर्यावरणीय संवेदनक्षम ठरतात. त्या गावांमध्ये खनिज खाणी सुरूच करता येणार नाहीत हे स्पष्ट झाले आहे. केंद्र सरकारने जरी खनिज कायदे दुरुस्त करणारा वटहुकूम जारी केला तरी, हरित लवादाच्या नव्या आदेशांनुसार 99 गावे ही पर्यावरणीय संवेदनक्षम भागात येतात व त्यामुळे तिथे खाणी सुरू करता येणार नाहीत.

कस्तुरीरंगन अहवालाचे निष्कर्ष गोवा सरकारने यापूर्वी दाबून ठेवले होते. 99 ऐवजी 19 गावेच गोव्यात पर्यावरणीय संवेदनक्षम आहेत अशी भूमिका गोवा सरकारने घेतली होती. मात्र केरळमधील पुरानंतर देशभरातच जी स्थिती निर्माण झालेली आहे व राष्ट्रीय हरित लवादानेही नुकताच जो निवाडा दिला आहे, त्या पार्श्वभूमीवर कस्तुरीरंगन अहवालात कोणताच बदल करता येणार नाही. त्या अहवालानुसार 99 गावे इकोलॉजीकली सेनसीटीव क्षेत्रमध्ये येतात. 

सांगे तालुक्यात एकूण 37 महसुली गावे आहेत, त्यापैकी 25 गावे पर्यावरणीय संवेदनक्षम (ईआयए) क्षेत्रत येतात, असे कस्तुरीरंगन अहवालात म्हटले आहे. म्हणजेच सांगे तालुक्याचा एक तृतीयांश भाग हा पर्यावरणीय संवेदनक्ष आहे. तिथे खनिज खाणी सुरू करता येत नाहीत. धारबांदोडा तालुक्यातील सोळा पैकी बारा गावे ही पर्यावरणीय संवेदनक्षम क्षेत्रत येतात. अशा गावांमध्ये खाणी सुरू करणोच नव्हे तर वखारी देखील चालविता येत नाहीत. झाडे कापता येत नाहीत.

गोव्यात 1 हजार 424.46 चौरस किलोमीटर क्षेत्र हे वन क्षेत्र आहे. 200 चौरस किलोमीटर खासगी वन क्षेत्र आहे. फक्त 61.52 टक्के जमीन ही बिगर वनक्षेत्र ठरते. एकूण 755 चौरस किलोमीटर क्षेत्र म्हणजे 20 टक्के गोवा हा वन्यप्राणी संरक्षण क्षेत्रत येतो. कस्तुरीरंगन अहवालानुसार 1461 चौरस किलोमीटरचे गोव्याच क्षेत्र हे पर्यावरणीय संवेदनक्षम क्षेत्र ठरते. गोव्याचे क्षेत्रफळ एकूण 3 हजार 702 चौरस किलोमीटरचे असून यापैकी 1 हजार 25क् चौरस किलोमीटर क्षेत्र हे संरक्षित, राखीव व खासगी वन क्षेत्रत येते. तिथे काहीच करता येत नाही हे कस्तुरीरंगन अहवालात म्हटले आहे. राज्याची 4क् टक्के जागा ही कृषी क्षेत्रत येते. फक्त 5.32 टक्के म्हणजे 196.8क् चौरस किलोमीटर जागा ही कोणत्याच अडथळ्य़ांवीना आहे. म्हणजे ही जागा सीआरङोडमध्ये येत नाही किंवा नदीचे प्रवाहही तिथे नाहीत. 

सत्तरी तालुक्यातील 56 गावे ही पर्यावरणीय संवेदनक्षम क्षेत्रत येतात. या गावांमध्ये अंजुणो, गुळ्ळे, डोंगरवाडा-पणसुली, करंजोळ, देरोडे, पेंड्राल, साट्रे, वायंगिणी, शेळपे-बुद्रुक, कडवळ, शिंगणो या गावांमधील 10 टक्के भाग हा पर्यावरणीय संवेदनक्षम क्षेत्रत येतो, असे कस्तुरीरंगन अहवालात म्हटले आहे.

टॅग्स :goaगोवाnewsबातम्या