शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

तुमची गाडी ८ वर्षे जुनी आहे? फिटनेस टेस्ट बंधनकारक; सर्वच वाहनांचा समावेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2023 13:47 IST

वाहनाची खरेदी केल्यानंतर पहिल्या ८ वर्षांत प्रत्येक दोन वर्षांच्या अंतराने ही फिटनेस टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा: खासगी वाहनांच्या तुलनेत व्यावसायिक वाहनांचा वापर जास्त प्रमाणावर होत असतो. त्यामुळे अशा वाहनांचा वापर करणाऱ्या प्रवाशांना चांगल्या पद्धतीने प्रवास मिळावा तसेच वाहनातून होणारे प्रदूषण कमी व्हावे या उद्देशाने अशा वाहनांना फिटनेस टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे. 

वाहनाची खरेदी केल्यानंतर पहिल्या ८ वर्षांत प्रत्येक दोन वर्षांच्या अंतराने ही फिटनेस टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे. त्यानंतर दरवर्षी ही टेस्ट करवून घेणे गरजेचे करण्यात आले आहे. वाहनधारकांमध्येही जागरुकता आली असून बार्देश तालुक्यात दररोज सरासरी १५ वाहनांची फिटनेस चाचणी केली जात असल्याचे दिसून येते.

दररोज होते टेस्ट

बार्देश तालुक्यासाठी म्हापशात असलेल्या वाहतूक खात्याच्या उपविभागीय कार्यालयात दर दिवशी सरासरीवर १५ वाहनांची फिटनेस चाचणी घेतली जाते. यात सर्व प्रकारच्या वाहनांचा समावेश आहे.

व्यावसायिक वापरासाठी सक्ती

वाहनाची खरेदी केल्यानंतर वाहनाचा वापर व्यावसायिक कारणास्तव केला जात असल्यास पहिल्या ८ वर्षांत दर दोन वर्षांनी फिटनेस टेस्ट गरजेची आहे. तशी सक्ती वाहनचालकांना करण्यात आली आहे. त्यानंतर प्रत्येकवर्षी ही चाचणी करवून घेणे गरजेचे आहे.

वाहनचालकाला मिळतो दाखला

वाहनाला दोन वर्षे पूर्ण होण्यापूर्वी मान्यताप्राप्त गॅरेजमधून ही चाचणी करणे गरजेचे आहे. त्यानंतर मुदतीपूर्व वाहतूक कार्यालयात योग्य शुल्क जमा केल्यानंतर फिटनेस करावी लागते. चाचणी तेथील निरीक्षकामार्फत केल्यानंतरवाहनचालकाला दाखला दिला जातो.

तर अर्ज नामंजूर

बऱ्याचवेळा वाहनांची योग्य पद्धतीने दुरुस्ती केली जात नाही. अशावेळी फिटनेससाठी केलेला अर्ज नामंजूर होण्याची शक्यता असते. अर्ज नामंजूर झाल्यास दुरुस्ती पुन्हा करवून पुन्हा फिटनेससाठी अर्ज करावा लागतो.

सर्वच वाहनांचा समावेश 

- यामध्ये चाकी वाहन, रिक्षा, चारचाकी, बस ट्रकसारख्या वाहनांचा समावेश होतो. ही टेस्ट मान्यताप्राप्त गॅरेजमध्ये करणे गरजेचे आहे.

- केलेल्या टेस्टनंतर वाहतूक कार्यालयात योग्य प्रमाणावर शुल्क जमा करून नंतर फिटनेस चाचणी करणे गरजेचे आहे.

दरवर्षी चाचणी करावी लागते

८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर दरवर्षी चाचणी करावी लागते. केलेल्या अर्जानंतर कार्यालयातील निरीक्षक वाहनाची तपासणी केल्यावर योग्य तो निर्णय घेतात. - मिनेष तार, उपसंचालक, बार्देश

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :goaगोवा