शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
3
'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
4
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
5
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
6
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
7
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
8
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
9
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
10
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
11
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
12
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
13
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
14
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
15
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
16
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
17
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
18
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
19
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
20
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम

'इंडिया' आघाडीत फूट? 'विजय संवाद' ठरला वादाचा मुद्दा; काँग्रेसमध्ये मतभेद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2024 08:48 IST

पुढील तीन वर्षे सर्व मतदारसंघ पालथे घालणार

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी :गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांची 'विजय संवाद' मोहीम इंडिया आघाडीमध्ये वादाचा विषय ठरली. खुद्द काँग्रेसमध्येच या मुद्द्यावरून दोन गट पडले.

सरदेसाई यांनी राज्यातील सर्व चाळीसही विधानसभा मतदारसंघांमध्ये लोकांशी संवाद साधण्यासाठी मोहीम उघडली आहे. काल, रविवारी कुडचडे येथे सरदेसाई यांनी 'संडे डायलॉग' हा जनसंवादाचा कार्यक्रम आयोजित केला होता. परंतु, त्यावरून वाद निर्माण झाला. कॉग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. विजय यांच्या 'संडे डायलॉग' यामागे राजकारण असल्याचा आरोप काँग्रेसचे सरचिटणीस मरिना रिबेलो यांनी केला. तर दुसरीकडे मात्र विजय हे हृदयाने कॉग्रेसजनच असल्याचे व त्याचा फायदा 'इंडिया' आघाडीला निश्चितच होणार असल्याचे पक्षाचे उपाध्यक्ष सुनील कवठणकर यांनी म्हटले आहे. पक्षाचे सरचिटणीस रिबेलो यांचे असे म्हणणे आहे की, 'सरदेसाई यांनी कुडचडे येथील संडे डायलॉगबद्दल कोणतीही माहिती प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांना दिली नाही. कॉग्रेसचे राज्यातील सर्व ४० ही मतदारसंघांमध्ये अस्तित्व आहे.' त्यांच्या या विधानामुळे गोव्यातील इंडिया अलायन्समध्ये फूट पडली का?, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

कवठणकर यांचे असे म्हणणे आहे की, 'विरोधी आमदारापैकी सरदेसाई हे सर्वात अनुभवी, तसेच वरिष्ठ आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशानात त्यांनी चांगली कामगिरी बजावली आहे. तसेच, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात त्यांची कामगिरी उत्तम होती. सरदेसाई यांच्या 'संडे डायलॉग' मुळे उलट इंडिया आघाडीला भ्रष्ट भाजपचा पराभव करण्यासाठी मजबुती मिळेल.'

पुढील तीन वर्षे सर्व मतदारसंघ पालथे घालणार

विजय सरदेसाई यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी 'माझ्या संडे डायलॉगवर प्रश्न उपस्थित करणारे मोरेना कोण?' असा उलट सवाल केला. ते म्हणाले की, विजय म्हणाले की, मी आमदार आणि एका राजकीय पक्षाचा अध्यक्षदेखील आहे. राज्यभरातील जनतेपर्यंत जाऊन त्यांच्याशी संवाद साधावा असे मला वाटले तर त्यात काही गैर नाही आणि कोणीही वाईट वाटून घेण्याचे कारणही नाही. जनता दरबार घ्या, अशी विनंती कुडचडेंतील लोकांकडूनच आली होती.

लोकसभा निवडणुकीवेळी आम्ही फिरायचो, तेव्हा लोक समस्या मांडायचे. मलाही लोकांना भेटण्याची इच्छा आहे. पुढील तीन वर्षे मी प्रत्येक मतदारसंघात फिरणार आहे. मये किंवा अन्य काही मोठ्या मतदारसंघांमध्ये एकापेक्षा जास्त संडे डायलॉग घ्यावे लागतील, तेदेखील घेईन. कुडचडेला लोक आग्रहास्तव जनसंवादाचा कार्यक्रम मी आयोजित केला. हा पक्षाचा कार्यक्रम नव्हे. खुद्द काँग्रेस नगरसेवकानेही बोलावले होते.

 

टॅग्स :goaगोवाINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीPoliticsराजकारण