शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

'इंडिया' आघाडीत फूट? 'विजय संवाद' ठरला वादाचा मुद्दा; काँग्रेसमध्ये मतभेद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2024 08:48 IST

पुढील तीन वर्षे सर्व मतदारसंघ पालथे घालणार

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी :गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांची 'विजय संवाद' मोहीम इंडिया आघाडीमध्ये वादाचा विषय ठरली. खुद्द काँग्रेसमध्येच या मुद्द्यावरून दोन गट पडले.

सरदेसाई यांनी राज्यातील सर्व चाळीसही विधानसभा मतदारसंघांमध्ये लोकांशी संवाद साधण्यासाठी मोहीम उघडली आहे. काल, रविवारी कुडचडे येथे सरदेसाई यांनी 'संडे डायलॉग' हा जनसंवादाचा कार्यक्रम आयोजित केला होता. परंतु, त्यावरून वाद निर्माण झाला. कॉग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. विजय यांच्या 'संडे डायलॉग' यामागे राजकारण असल्याचा आरोप काँग्रेसचे सरचिटणीस मरिना रिबेलो यांनी केला. तर दुसरीकडे मात्र विजय हे हृदयाने कॉग्रेसजनच असल्याचे व त्याचा फायदा 'इंडिया' आघाडीला निश्चितच होणार असल्याचे पक्षाचे उपाध्यक्ष सुनील कवठणकर यांनी म्हटले आहे. पक्षाचे सरचिटणीस रिबेलो यांचे असे म्हणणे आहे की, 'सरदेसाई यांनी कुडचडे येथील संडे डायलॉगबद्दल कोणतीही माहिती प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांना दिली नाही. कॉग्रेसचे राज्यातील सर्व ४० ही मतदारसंघांमध्ये अस्तित्व आहे.' त्यांच्या या विधानामुळे गोव्यातील इंडिया अलायन्समध्ये फूट पडली का?, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

कवठणकर यांचे असे म्हणणे आहे की, 'विरोधी आमदारापैकी सरदेसाई हे सर्वात अनुभवी, तसेच वरिष्ठ आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशानात त्यांनी चांगली कामगिरी बजावली आहे. तसेच, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात त्यांची कामगिरी उत्तम होती. सरदेसाई यांच्या 'संडे डायलॉग' मुळे उलट इंडिया आघाडीला भ्रष्ट भाजपचा पराभव करण्यासाठी मजबुती मिळेल.'

पुढील तीन वर्षे सर्व मतदारसंघ पालथे घालणार

विजय सरदेसाई यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी 'माझ्या संडे डायलॉगवर प्रश्न उपस्थित करणारे मोरेना कोण?' असा उलट सवाल केला. ते म्हणाले की, विजय म्हणाले की, मी आमदार आणि एका राजकीय पक्षाचा अध्यक्षदेखील आहे. राज्यभरातील जनतेपर्यंत जाऊन त्यांच्याशी संवाद साधावा असे मला वाटले तर त्यात काही गैर नाही आणि कोणीही वाईट वाटून घेण्याचे कारणही नाही. जनता दरबार घ्या, अशी विनंती कुडचडेंतील लोकांकडूनच आली होती.

लोकसभा निवडणुकीवेळी आम्ही फिरायचो, तेव्हा लोक समस्या मांडायचे. मलाही लोकांना भेटण्याची इच्छा आहे. पुढील तीन वर्षे मी प्रत्येक मतदारसंघात फिरणार आहे. मये किंवा अन्य काही मोठ्या मतदारसंघांमध्ये एकापेक्षा जास्त संडे डायलॉग घ्यावे लागतील, तेदेखील घेईन. कुडचडेला लोक आग्रहास्तव जनसंवादाचा कार्यक्रम मी आयोजित केला. हा पक्षाचा कार्यक्रम नव्हे. खुद्द काँग्रेस नगरसेवकानेही बोलावले होते.

 

टॅग्स :goaगोवाINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीPoliticsराजकारण