शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
6
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
7
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
8
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
9
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
10
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
11
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
12
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
13
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
14
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
15
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
16
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
17
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
18
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
19
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
20
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू

आरजीवर पूर्वीसारखा विश्वास राहिलाय काय? मतदारांचे कामगिरीकडे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2024 10:12 IST

आर.जी. वर पूर्वीसारखा लोकांचा विश्वास अजून राहिला आहे काय, या प्रश्नाचे उत्तर लोकसभा निवडणुकीच्या निकालातूनच मिळू शकेल.

प्रसाद म्हांबरे, लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा : विधानसभा निवडणुकीत लक्षवेधी कामगिरी केल्यानंतर गोव्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा पहिल्यांदाच लढवण्यास सज्ज झालेल्या रिव्होल्युशनरी गोवन्स (आरजी) च्या लोकसभेच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे. लोकसभेच्या जागेसाठी तिरंगी लढत अपेक्षित असून रिंगणातील इतर पक्षांच्या तुलनेत आर.जी. ने सर्वात प्रथम आपले दोन्ही उमेदवार जाहीर केले; पण आर.जी. वर पूर्वीसारखा लोकांचा विश्वास अजून राहिला आहे काय, या प्रश्नाचे उत्तर लोकसभा निवडणुकीच्या निकालातूनच मिळू शकेल.

विधानसभा निवडणुकीपासून आर.जी. लक्षवेधी कामगिरीतून चर्चेत आला होता. पूर्ण गोव्यातून त्यांनी ३९ जागा लढवल्या होत्या; तर उत्तर गोव्यातून हळदोणा मतदारसंघ वगळता इतर १९ मतदारसंघांतून आपले उमेद्वार रिंगणात उतरवले होते. त्यांना या मतदार संघातून ४८,७२७ मते प्राप्त झाली होती. काही मतदारसंघांत तर त्यांचे उमेदवार मातब्बर उमेदवारांच्या पराभवाचे कारण बनले होते. काही मतदारसंघातून झालेल्या मतविभागणीचा लाभही विजयी ठरलेल्या उमेदवाराला झाला होता. बऱ्याच मतदारसंघांतून लक्षवेधी कामगिरी करीत धक्कादायक निकाल आर.जी.च्या उमेदवारामुळे काही मतदारसंघांतून लागले होते. विधानसभेवेळी प्राप्त मते टिकवून ठेवून त्याहून सरस लक्षवेधी कामगिरी कशी करणार याकडे लक्ष लागले आहे.

विधानसभेदरम्यान थिवी मतदारसंघातून आर.जी.चे तत्कालीन उमेदवार मनोज परब यांना ४९५९ मते प्राप्त झालेली. त्यांना मिळालेल्या मतामुळे तृणमूलच्या उमेदवाराचा पराभव होण्यास ते कारण बनले होते. म्हापशातून आर.जी.ला १४७६ मते मिळाली होती. शिवोली मतदारसंघात ३१३४ मते साळगावांत मते, मये मतदारसंघात ३९३३ मते, साखळी मतदारसंघात ७४० मते मिळवून केलेल्या कामगिरीतून स्वतःकडे लक्ष वेधून घेतले होते. 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारणgoa lok sabha election 2024गोवा लोकसभा निवडणूक निकाल २०२४