शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
4
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
5
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
6
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
7
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
8
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
9
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
10
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
11
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
12
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
13
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
14
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
15
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
16
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
17
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
18
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
19
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
20
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच

दाभोलकर, पानसरे, गौरी लंकेश आदींच्या हत्यांचा तपास केवळ राजकीय हेतूने - डॉ. अमित थडानी

By आप्पा बुवा | Updated: June 18, 2023 18:52 IST

डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, एम्.एम्. कलबुर्गी आणि गौरी लंकेश या नास्तिकवादी तथा शहरी नक्षलवादाशी संबंधितांच्या हत्यांच्या तपासामध्ये राजकारण चालू आहे

फोंडा : डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, एम्.एम्. कलबुर्गी आणि गौरी लंकेश या नास्तिकवादी तथा शहरी नक्षलवादाशी संबंधितांच्या हत्यांच्या तपासामध्ये राजकारण चालू आहे. ठोस पुरावे नसतांना हिंदुत्वनिष्ठांना आरोपी बनवून तुरुंगात डांबण्यात आले. त्यांच्यावर आरोपपत्रही दाखल करण्यात आले. मात्र नंतर तपास यंत्रणांनीच हत्येमागे अटक केलेल्या आरोपींच्या ऐवजी नवीनच आरोपी असल्याचा दावा केला. एकूणच या सर्व प्रकरणांमध्ये सतत आरोपी बदलणे, शस्त्रे बदलणे, असे बेकायदेशीर प्रकार झाले. 

डॉ. दाभोलकर खटल्यात तुकडे तुकडे करून समुद्रात फेकलेले पिस्तुल शोधून काढल्याचा दावा करण्यात आला.मात्र समुद्रातून ते त्यांना अखंड स्थितीत मिळाले ! मग खोल समुद्रात त्या पिस्तुलाची जोडणी कोणी केली? एकूणच या हत्या कुणी केल्या आणि का केल्या, याचा तपास यंत्रणांनी कधीच प्रामाणिकपणे शोध घेतलाच नाही. केवळ या हत्यांचा राजकीय लाभासाठी कसा उपयोग होईल, हेच पाहिले गेले, असे प्रतिपादन ‘द रॅशनलिस्ट मर्डर्स’ या पुस्तकाचे लेखक डॉ. अमित थडानी यांनी केले. ते ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त ‘द रॅशनलिस्ट मर्डर्स’ पुस्तक प्रकाशनाच्या वेळी बोलत होते. या वेळी व्यासपिठावर हिंदु विधीज्ञ परिषदेचे संस्थापक सदस्य अधिवक्ता  सुरेश कुलकर्णी, हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर आणि अधिवक्ता पी. कृष्णमूर्ती हे उपस्थित होते.

या प्रसंगी अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर म्हणाले, ‘‘नास्तिकतावाद्यांच्या हत्येनंतर हिंदुत्वनिष्ठांना आतंकवादी ठरवले जाते; परंतु साम्यवाद्यांनी किती जणांना मारले ? हा प्रश्न का विचारला जात नाही ? साम्यवाद्यांनी जगभरात 10 कोटी लोकांच्या हत्या केल्या असून, नक्षलवाद्यांनी 14 हजारांहून अधिक हत्या केल्या आहेत. नक्षलवादी हेच साम्यवादी आहेत आणि साम्यवादी हेच नक्षलवादी आहेत; मात्र हे कुणी सांगत नाही. हाच वैचारिक आतंकवाद आहे. त्यामुळे वैचारिक आतंकवादाच्या विरोधात प्रत्येकाने प्रश्न विचारण्याचे धारिष्ट्य दाखवावे .’’  

अधिवक्ता पी. कृष्णमूर्ती म्हणाले, ‘‘मी  ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पी.एफ्.आय.) या जिहादी संघटनेच्या विरोधातील खटला लढत आहे.  त्यामुळे मला धमक्या देण्यात आल्या, इतकेच नाही तर माझ्यावर प्राणघातक आक्रमणही झाले; मात्र श्रीकृष्णाचे स्मरण करत असल्याने त्यातून माझे संरक्षण झाले. त्यामुळे समाजातील हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांनीही जेव्हा वेळ मिळेल, तेव्हा नामस्मरण करावे.’’ या प्रसंगी अधिवक्ता हरिशंकर जैन यांनी धर्मासाठी बलिदान देणार्‍यांचा विसर पडू देऊ नका, असे आवाहन केले.

टॅग्स :goaगोवाNarendra Dabholkarनरेंद्र दाभोलकर