शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

बाळ्ळी लाॅजिस्टिक पार्कमुळे कोकण-गोव्याच्या निर्यातीस मिळणार चालना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2018 15:51 IST

कोकण रेल्वेच्या बहुचर्चित बाळ्ळी लाॅजिस्टिक पार्कमुळे गोव्याहून महाराष्ट्रातील जेएनपीटी बंदरापर्यंत रेल्वेद्वारे कंटेनर वाहतूक शक्य होणार आहे. यामुळे गोव्यातील निर्यातदारांचा विशेषत: मत्स्य उत्पादक व निर्यातदारांचा मोठा फायदा होणार असून हे पार्क मार्च पर्यंत कार्यान्वित होणार असल्याची माहिती

- नारायण जाधव मडगांव - कोकण रेल्वेच्या बहुचर्चित बाळ्ळी लाॅजिस्टिक पार्कमुळे गोव्याहून महाराष्ट्रातील जेएनपीटी बंदरापर्यंत रेल्वेद्वारे कंटेनर वाहतूक शक्य होणार आहे. यामुळे गोव्यातील निर्यातदारांचा विशेषत: मत्स्य उत्पादक व निर्यातदारांचा मोठा फायदा होणार असून हे पार्क मार्च पर्यंत कार्यान्वित होणार असल्याची माहिती कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी येथे पत्रकारांना दिली. कोकण रेल्वेच्या विविध विकास कामांची पाहणी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.  यावेळी त्यांच्यासोबत कारवार विभागाचे महाव्यवस्थापक मोहम्मद असीफ सुलेमान, मुख्य जनसंपर्क अधिकारी  एल के वर्मा, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी गिरीश करंदीकर उपस्थित होते. सध्या गोव्यातून रोज ५० कंटेनर नवी मुंबईतील जेएनपीटी बंदराकडे जातात. यांत मोठ्या प्रमाणातील मत्स्य उत्पाजनांचा समावेश आहे. मात्र रस्ते वाहतुकीत अनेक धोके आहेत. शिवाय वाहतूक खर्चही जास्त येतो. तसेच मोठा वेळही खर्च होतो. या सर्व बाबी लक्षात घेऊनच हे पार्क विकसित करण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला. कारण सध्या गोव्यात जी बंदरे आहेत. तिथे कार्गो वाहतुकीची सोय नाही. केवळ बल्क जेटी आहेत. त्यामुळे गोव्यातील निर्यातदारांना रस्ते वाहतुकीशिवाय पर्याय नाही. परंतु आता बाळ्ळी लाॅजिस्टिक पार्कमुळे त्यांची गैरसोय दूर होऊन गोव्यातील निर्यातवाढीला मदत होणार आहे. विशेष म्हणजे या पार्कच्या ठिकाणीच कस्टम किलअरन्सची सोय करण्यात येणार असल्याने जेएनपीटीत त्यासाठी होणारी फरफट कायमची दूर होणार असल्याचे गुप्ता म्हणाले. तसेच जेएनपीटी पर्यंतची कंटेनर वाहतूक सोपी व सोयीची व्हावी यासाठी कंटेनर कार्पोर्शन आॅफ इंडिया सोबत कोकण रेल्वेने खास करार केला आहे. यानुसार त्यांनी ४३ कोटींची गुंतवणूक केली आहे. यांत ते देशी व विदेशी कंटेनर वाहतूक करणार आहेत. त्यांच्याकडून भाड्यापोटी कोकण रेल्वेस दरवर्षी कोट्यवधींचे उत्पन्न मिळणार आहे.  विद्युतीकरणामुळे वार्षिक १०० कोटींची बचतकेंद्र सरकारच्या एकात्मिक रेल्वे मार्ग विद्युतीकरण कार्यक्रमा नुसार ७४० किमी लांबीच्या कोकण रेल्वे मार्गावर ९७० किमी लांबीच्या रूळांवर विद्युतीकरण करण्यात येत आहे. यामुळे सध्या डिझेल लोकोवर जो २५० ते ३०० कोटींचा खर्च विद्युतीकरणामुळे तब्बल १०० कोटींनी कमी होणार आहे. या बचतीतून अन्य विकास कामे करणे शक्य होणार असल्याचे संजीव गुप्ता यांनी सांगितले.

टॅग्स :Konkan Railwayकोकण रेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वे