शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

खाण लिज नूतनीकरण कायद्याच्या कचाट्यात

By admin | Updated: October 14, 2014 01:45 IST

पणजी : राज्यातील खनिज खाणींच्या लिजांचे नूतनीकरण आॅक्टोबरमध्ये सुरू होईल, असे सरकारने यापूर्वी जाहीर केले असले, तरी नूतनीकरणाची ही प्रक्रिया कायद्याच्या कचाट्यात अडकली आहे.

पणजी : राज्यातील खनिज खाणींच्या लिजांचे नूतनीकरण आॅक्टोबरमध्ये सुरू होईल, असे सरकारने यापूर्वी जाहीर केले असले, तरी नूतनीकरणाची ही प्रक्रिया कायद्याच्या कचाट्यात अडकली आहे. सर्वोच्च न्यायालयात जोपर्यंत निवाडा होत नाही, तोपर्यंत लिजांचे नूतनीकरण करता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाचे खंडपीठ बदलल्याने सोमवारी गोवा फाउंडेशनच्या याचिकेवर सुनावणी होऊ शकली नाही. स्टॅम्प ड्युटी भरलेल्या २८ खनिज कंपन्यांना लिजांचे नूतनीकरण करून देण्यास गोवा फाउंडेशन संस्थेचा विरोध आहे. गेल्या आॅगस्टमध्ये हायकोर्टाने निवाडा देताना या कंपन्यांना लिज नूतनीकरण करून द्यावे, असे म्हटले आहे. त्या निवाड्यास गोवा फाउंडेशनने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. २८ लिजांसाठी दावे केलेल्या सर्व खाण कंपन्यांना फाउंडेशनने प्रतिवादी केले आहे. सर्वोच्च न्यायालयात सोमवारी ही याचिका सुनावणी येणार होती. त्यामुळे अ‍ॅडव्होकेट जनरल आत्माराम नाडकर्णी व खाण संचालक प्रसन्ना आचार्य हे रविवारीच सायंकाळी दिल्लीत दाखल झाले होते. या प्रतिनिधीने सोमवारी नाडकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता, न्यायालयाचे खंडपीठ बदलल्याने सुनावणी होऊ शकली नाही, असे त्यांनी सांगितले. नवे खंडपीठ आता मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालीच नेमले गेले आहे. या खंडपीठासमोर यापुढे गोवा फाउंडेशनच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. मात्र, सुनावणीची तारीख निश्चित झालेली नाही. येत्या शुक्रवारी सुनावणी होईल, असा अंदाज असला तरी तो दिवस निश्चित झालेला नाही. जोपर्यंत सर्वोच्च न्यायालय निवाडा देत नाही, तोपर्यंत राज्य सरकार लिज नूतनीकरणाची प्रक्रिया पुढे नेऊ शकणार नाही. सरकारने अजून खाण लिज मंजुरी धोरण अधिसूचितही केलेले नाही. सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा कधी येईल, हे निश्चित नसल्याने राज्यातील खाण व्यावसायिकही कंटाळले आहेत. (खास प्रतिनिधी)