शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना व्याजमुक्त कर्ज!

By admin | Updated: August 20, 2014 02:34 IST

पणजी : पिकांच्या नुकसान भरपाईसाठी दिल्या जाणाऱ्या शेतकरी आधार निधीची रक्कम प्रति हेक्टर १५ हजार रुपयांवरून २५ हजार रुपये केली जाईल.

पणजी : पिकांच्या नुकसान भरपाईसाठी दिल्या जाणाऱ्या शेतकरी आधार निधीची रक्कम प्रति हेक्टर १५ हजार रुपयांवरून २५ हजार रुपये केली जाईल. येत्या १ जानेवारीपासून किसान कार्डावर शेतकऱ्याला बँकेतून कमाल ५० हजार रुपयांपर्यंत व्याजमुक्त कर्ज काढता येईल, अशा घोषणा कृषिमंत्री या नात्याने मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विधानसभेत केल्या. खात्याच्या अनुदान मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. किसान कार्डधारकांना हेक्टरमागे २० हजार रुपये व कमाल अडीच हेक्टरपर्यंत ५० हजार रुपये व्याजमुक्त कर्ज उपलब्ध केले जाईल. पर्रीकर म्हणाले, की सबसिडीच्या रूपाने गोव्यात प्रत्येक शेतकऱ्याला किमान २० हजार रुपये मिळतात. अन्य राज्यांच्या तुलनेत ती कितीतरी जास्त आहे. थिवी स्टेडियमची जागा ‘फलोत्पादन’ला थिवी येथे क्रिकेट स्टेडियमसाठी घेतलेली जमीन फलोत्पादन महामंडळाला दिली जाईल. तेथे काही भाज्यांचे पीकही घेतले जाईल. महामंडळ पूर्वी स्थानिक भाजी विक्रेत्यांकडून २३ टन भाजी खरेदी करत होते. आज हा आकडा १ हजार टनांवर पोचला आहे. स्वयंसाहाय्य गटांना भाज्या, फळांच्या उत्पादनात आणले जाईल. कंत्राटी शेतीचा प्रयोग केला जाईल. शेतकरी आधार निधीची १०४७ प्रकरणे या वर्षी निकालात काढली व ६८ लाख ७२ हजार रुपये वितरित केले. तीन वर्षांत कृषी लागवडीखालील क्षेत्र ३ टक्क्यांनी घटले. मात्र, भात उत्पादन १५ टक्क्यांनी वाढले. ३८७२ किलो प्रति हेक्टरवरून ४५०० किलोंवर पोचले आहे, ते हेक्टरी ६००० किलोंवर पोचवायचे आहे, असे पर्रीकर म्हणाले. खाजण जमिनी सोडून दिलेल्या आहेत आणि तेथे खारफुटी वाढताहेत याकडे विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. खारफुटी वाढल्यास नंतर तेथे काहीच करता येणार नाही. आमदार रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी खत तपासण्यासाठी प्रयोगशाळा हव्यात, अशी मागणी केली. लागवडीखालील जमीन दिवसेंदिवस घटत आहे. दक्षिण गोव्यात ३ हजार हेक्टरनी भात लागवडीची जमीन कमी झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. खाणबंदीनंतर कृषी लागवड वाढली काय? असेल तर किती, हे सरकारने स्पष्ट करावे. दक्षिण गोव्यात कृषी खात्याचे विभागीय कार्यालय हवे. आंब्याच्या काही जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. तसे होऊ नये यासाठी सरकारने काळजी घेण्याची गरज आहे, असे रेजिनाल्ड म्हणाले. १९ डिसेंबर २०१५ पर्यंत गोवा कचरामुक्त विज्ञान तंत्रज्ञान खात्याच्या अनुदान मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना पर्रीकर यांनी १९ डिसेंबर २०१५ पूर्वी गोवा कचरामुक्त होईल, अशी घोषणा केली. पंचायतींना इतर गोष्टींमध्ये स्वारस्य आहे. कचरा विल्हेवाटीबाबत नाही, अशी टीका करून पर्रीकरांनी आॅक्टोबरपर्यंत कृती योजना तयार होणार असून सरपंचांना बडतर्फ करण्याची तरतूद केली जाईल, असे स्पष्ट केले. प्लास्टिक कचरा उपक्रमात केवळ ४९ पंचायतींनी योगदान दिले. इतरांनी स्वारस्य दाखवले नाही. कळंगुट व काकोडा कचरा प्रकल्पासाठी आॅक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत काम सुरू होईल. कळंगुटच्या प्रकल्पासाठी ‘नीरी’ या संस्थेला पर्यावरणीय परिणाम अभ्यास करायला सांगितले आहे. (प्रतिनिधी)