शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

गोव्यात विद्यालयांऐवजी मद्यालयांना प्राधान्य, सोशल मीडियावर टीकेचा सूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2018 19:27 IST

गोव्यात कोंकणी व मराठी माध्यमाच्या नव्या प्राथमिक शाळा तसेच काही हायस्कुले व उच्च माध्यमिक विद्यालये सुरू करण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी अर्ज केले व या अर्जाना मंजुरी द्यावी असा आग्रह धरलेला असला तरी, शिक्षण खाते व एकूणच सरकार त्याविषयी काहीच निर्णय घेत नाही.

पणजी : गोव्यात कोंकणी व मराठी माध्यमाच्या नव्या प्राथमिक शाळा तसेच काही हायस्कुले व उच्च माध्यमिक विद्यालये सुरू करण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी अर्ज केले व या अर्जाना मंजुरी द्यावी असा आग्रह धरलेला असला तरी, शिक्षण खाते व एकूणच सरकार त्याविषयी काहीच निर्णय घेत नाही. मात्र दुस-या बाजूने बंद पडलेली 1021 मद्यालये प्राधान्याने सुरू करावीत असा निर्णय सरकारने घेतला. याबाबत सोशल मीडियावरून नेटीझन्सनी टीकेचा सूर लावला आहे. सरकारचे प्राधान्य विद्यालयांऐवजी मद्यालयांना आहे, अशी टीका होऊ लागली आहे.

गोव्यात कोंकणी व मराठीची मिळून 38 प्राथमिक विद्यालये सुरू करता यावीत म्हणून लोकांनी अर्ज केले आहेत. मराठी व कोंकणीतील शाळांकडे काही भागातील विद्यार्थी वळू पाहत आहेत व त्यामुळेच त्या माध्यमाची विद्यालये राज्यातील शैक्षणिक संस्था सुरू करू पाहत आहेत. गेल्यावर्षी देशी भाषांतील एकाही शाळेला सरकारने परवानगी दिली नाही. यामुळे भारतीय भाषा सुरक्षा मंचने सरकारवर जोरदार टीका केली होती. इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे अर्ज सरकारला फेटाळावेच लागतात. कारण तसे धोरणच आहे. मात्र मातृभाषेतील नव्या शाळा सरकार शैक्षणिक संस्थांना सुरू करू देत नसल्याने देशी भाषाप्रेमी व भारतीय भाषा सुरक्षा मंच वगैरे संताप व्यक्त करत आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडे शिक्षण खाते आहे. नव्या कोंकणी- मराठी माध्यमाच्या शाळा सुरू करण्यासाठी आलेले अर्ज मंजुर करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी अजूनही शिक्षण खात्याला केलेली नाही. नवे शैक्षणिक वर्ष जूनमध्ये सुरू होईल. तत्पूर्वी आम्हाला परवानगी मिळाली तर तयारी तरी करता येईल, असे अजर्दार संस्थांचे म्हणणो आहे. सरकार मुद्दाम कोंकणी-मराठीतील शाळा सुरू करण्याच्या अर्जाना मान्यता देण्याबाबत टाळाटाळ करत असल्याची लोकांची भावना बनली आहे. काही भागांत तर अर्ज करणा-या संस्था ह्या भाजप समर्थक की काँग्रेस समर्थक की मगो पक्ष समर्थक आहेत ते देखील शिक्षण खाते पाहते, असे सुत्रांनी सांगितले.

दरम्यान, भाषा सुरक्षा मंचचे निमंत्रक सुभाष वेलिंगकर यांनी शिक्षण खाते मुद्दाम मराठी व कोंकणीतील नव्या विद्यालयांना मान्यता देत नसल्याची टीका येथे पत्रकारांशी बोलताना केली व आंदोलनाचा इशारा दिला आहे. गोव्यातील सुमारे 1 हजार 400 मद्यालये गेले काही महिने बंद होती. ही मद्यालये सुरू करता यावीत म्हणून सरकारने तातडीने तीन मंत्र्यांची समिती नेमली. या तीन मंत्र्यांच्या समितीने केवळ दोनच बैठकांमध्ये एकूण 1 हजार 21 मद्यालये नव्याने सुरू करण्याचा निर्णय घेतला. एवढय़ा मोठय़ा संख्येने मद्यालयांच्या परवान्यांचे नूतनीकरण करण्याचा निर्णय सरकार तातडीने घेते पण नवी विद्यालये मात्र सुरू करण्यासाठी सरकार टाळाटाळ करते, अशी टीका फेसबुकवरून सुरू झाली आहे. अनेकांनी सरकारला या विषयावरून लक्ष्य बनविले आहे. 

टॅग्स :goaगोवा