शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
2
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
3
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
4
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
5
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
6
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
7
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
8
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
9
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
10
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
12
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
13
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
14
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
15
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
16
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
17
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
18
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
19
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
20
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न

गोव्यातील बाल संगोपन केंद्रातील कारभाराची चौकशी करा: खंडपीठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2018 22:29 IST

बाल संगोपन केंद्रात ठेवण्यात आलेली २५०० हून अधिक मुले ही कोणत्याही बाल कल्याण समितीच्या शिफारशीशिवाय ठेवण्यात आली असल्याची माहिती मुख्य सचिवांनी न्यायालयात सादर केलेल्या अहवालातून उघड झाले आहे.

पणजी: बाल संगोपन केंद्रात ठेवण्यात आलेली २५०० हून अधिक मुले ही कोणत्याही बाल कल्याण समितीच्या शिफारशीशिवाय ठेवण्यात आली असल्याची माहिती मुख्य सचिवांनी न्यायालयात सादर केलेल्या अहवालातून उघड झाले आहे. याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त करताना चौकशी करण्याचा आदेश दिला आहे.राज्यातील विविध ठिकाणी असलेल्या बाल संगोपन केंद्रात कोणीही मुले आणून ठेवावी आणि तिथे भरती करून घेतली जावी अशी परिस्थिती असून कसल्याच प्रकारचे ताळतंत्र नसल्याचे मुख्य सचिवांच्या अहवालावरून स्पष्ट झाले अहे. वास्तविक मुलांना संगोपन केंद्रात ठेवून घेण्यासाठी बाल कल्याण समितींची शिफारस हवी असते. गोव्यातील विविध बाल संगोपन केंद्रात मिळून अडीच हजाराहून अधिकमुलांना बाल कल्याण समितीच्या शिफारशीशिवाय ठेवण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. खंडपीठाने या प्रकरणात मुख्य सचिवांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे.या अहवालामुळे सरकारचे बालसंगोपन केंद्रांकडे लक्ष्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. खंडपीठाने या प्रकरणात दखल घेतल्यामुळे अनेक बालसंगोपन केंद्रांमधील वस्तुस्थिती समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे सावध होऊन एकूण ७८ पैकी १२ केंद्रांकडून नोंदणी रद्द करण्यासाठी बाल कल्याम समितीला पत्रे लिहिली आहेत. ७८ पैकी अवघ्या ५ ते ६ केंद्रांना सरकारकडून अनुदान दिले जाते. त्यामुळे इतर केंद्रे चालतात तरी कशी असा प्रश्नही खंडपीठाने उपस्थित केला आहे.त्या मुलींचे काय झाले?बालसंगोपन केंद्रातून बाहेर पडलेल्या मुलींविषयी माहिती देण्याची सूचना खंडपीठाने सरकारला केली आहे. १८ वर्षे वयापर्यंतच या केंद्रात राहायला मिळते. त्यानंतर या मुले कुठे जातात काय करतात याची माहितीही देणे आवश्यक आहे. आतापर्यंत ज्या मुलींना आतापर्यंत बालसंगोपन केद्रामध्ये ठेवण्यात आलेल्या व १८ वर्षे वय पूर्ण झाल्याने त्या अपनाघरमधून बाहेर पडल्या त्या आता कुठे आहेत त्याची माहिती देण्यात यावी असे खंडपीठाने आपल्या आदेशात म्हटले आहे.

टॅग्स :goaगोवा