शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

गोव्यातील बाल संगोपन केंद्रातील कारभाराची चौकशी करा: खंडपीठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2018 22:29 IST

बाल संगोपन केंद्रात ठेवण्यात आलेली २५०० हून अधिक मुले ही कोणत्याही बाल कल्याण समितीच्या शिफारशीशिवाय ठेवण्यात आली असल्याची माहिती मुख्य सचिवांनी न्यायालयात सादर केलेल्या अहवालातून उघड झाले आहे.

पणजी: बाल संगोपन केंद्रात ठेवण्यात आलेली २५०० हून अधिक मुले ही कोणत्याही बाल कल्याण समितीच्या शिफारशीशिवाय ठेवण्यात आली असल्याची माहिती मुख्य सचिवांनी न्यायालयात सादर केलेल्या अहवालातून उघड झाले आहे. याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त करताना चौकशी करण्याचा आदेश दिला आहे.राज्यातील विविध ठिकाणी असलेल्या बाल संगोपन केंद्रात कोणीही मुले आणून ठेवावी आणि तिथे भरती करून घेतली जावी अशी परिस्थिती असून कसल्याच प्रकारचे ताळतंत्र नसल्याचे मुख्य सचिवांच्या अहवालावरून स्पष्ट झाले अहे. वास्तविक मुलांना संगोपन केंद्रात ठेवून घेण्यासाठी बाल कल्याण समितींची शिफारस हवी असते. गोव्यातील विविध बाल संगोपन केंद्रात मिळून अडीच हजाराहून अधिकमुलांना बाल कल्याण समितीच्या शिफारशीशिवाय ठेवण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. खंडपीठाने या प्रकरणात मुख्य सचिवांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे.या अहवालामुळे सरकारचे बालसंगोपन केंद्रांकडे लक्ष्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. खंडपीठाने या प्रकरणात दखल घेतल्यामुळे अनेक बालसंगोपन केंद्रांमधील वस्तुस्थिती समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे सावध होऊन एकूण ७८ पैकी १२ केंद्रांकडून नोंदणी रद्द करण्यासाठी बाल कल्याम समितीला पत्रे लिहिली आहेत. ७८ पैकी अवघ्या ५ ते ६ केंद्रांना सरकारकडून अनुदान दिले जाते. त्यामुळे इतर केंद्रे चालतात तरी कशी असा प्रश्नही खंडपीठाने उपस्थित केला आहे.त्या मुलींचे काय झाले?बालसंगोपन केंद्रातून बाहेर पडलेल्या मुलींविषयी माहिती देण्याची सूचना खंडपीठाने सरकारला केली आहे. १८ वर्षे वयापर्यंतच या केंद्रात राहायला मिळते. त्यानंतर या मुले कुठे जातात काय करतात याची माहितीही देणे आवश्यक आहे. आतापर्यंत ज्या मुलींना आतापर्यंत बालसंगोपन केद्रामध्ये ठेवण्यात आलेल्या व १८ वर्षे वय पूर्ण झाल्याने त्या अपनाघरमधून बाहेर पडल्या त्या आता कुठे आहेत त्याची माहिती देण्यात यावी असे खंडपीठाने आपल्या आदेशात म्हटले आहे.

टॅग्स :goaगोवा