शहरं
Join us  
Trending Stories
1
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
2
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
3
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
4
तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका
5
Nuclear warfare: भविष्य स्फोटक आहे...
6
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
7
अर्धा तास तडफडला! फी न भरल्याने प्राध्यापकाने केला अपमान, विद्यार्थ्याने कॅम्पसमध्ये स्वतःला पेटवले
8
"तुमच्यातले शारीरिक संबंध कसे आहेत?", आंतरधर्मीय लग्न करताना मराठी गायिकेला आईने विचारलेला बोल्ड प्रश्न
9
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
10
मराठी अभिनेत्रीला डेट करतोय सुनील शेट्टीचा लेक अहान; कोण आहे ती सुंदरा?
11
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
12
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
13
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
14
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
15
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
16
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
17
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
18
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
19
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
20
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."

भारत तिसरी आर्थिक शक्ती बनणार: केंद्रीयमंत्री राजीव चंद्रशेखर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2023 08:48 IST

फोंडा भाजप मंडळाने आयोजित केलेल्या व्यापारी संमेलनात ते बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्क फोंडा: काँग्रेसने चुकीची धोरणे लावल्याने एकेकाळी भारताची - आर्थिक स्थिती फारच कमकुवत होती. आज भारत आर्थिक बाबतीत झपाट्याने प्रगती करत असून, फक्त नऊ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला पाचव्या क्रमांकाच्या आर्थिक स्थितीवर आणले आहे. आगामी तीन वर्षांत भारताला तिसऱ्या क्रमांकावर आणण्याचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिले असून त्यासाठी नागरिकांनी त्यांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन केंद्रीय मंत्री डॉ. राजीव चंद्रशेखर यांनी केले.

फोंडा भाजप मंडळाने आयोजित केलेल्या व्यापारी संमेलनात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कृषिमंत्री रवी नाईक, माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर, जिल्हा पंचायत अध्यक्ष सुवर्णा तेंडुलकर, एन.आर.आय. आयुक्त नरेंद्र सावईकर, मंडळ अध्यक्ष विश्वनाथ दळवी आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना राजीव चंद्रशेखर पुढे म्हणाले, 'एक काळ असा होता की तंत्रज्ञानाच्या बाबतीत आम्ही खूप मागे होतो. प्रत्येक बाबतीत आम्हाला दुसऱ्या देशावर अवलंबून राहावे लागायचे. साध्या स्मार्टफोन बाबतीत आम्ही ८२ टक्के आयात करत होतो. आज आम्ही शंभर टक्के उत्पादन येथे घेत आहोत. तर दुसऱ्या देशाला आम्ही मोबाईल पुरवत आहोत. हा फरक नरेंद्र मोदींनी घडवून आणला.

२०१४ मध्ये भाजपने ज्यावेळी सरकार स्थापन केले, त्यावेळी एक कमकुवत देश काँग्रेसने भाजपकडे सोपवला होता. भारत कधी विकासाभिमुख देश होईल हे त्यावेळेस कुणाच्या स्वप्नात सुद्धा नव्हते; परंतु नरेंद्र मोदी यांनी ते साध्य करून दाखवले आहे, असेही ते म्हणाले.

प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यावेळी म्हणाले की, ज्या दिवसापासून केंद्रात भाजपचे सरकार आले त्या दिवसापासून गोव्याला निधीची कमतरता कधी भासलीच नाही. म्हणून आज एक वेगळा आधुनिक गोवा लोकांना दिसत आहे. जागतिक दर्जाचे विमानतळ आम्ही लोकांना दिले आहे. त्यावेळी दाबोळी बंद होईल, असा काही लोकांनी गैरसमज करून घेतला होता; परंतु आज दोन्ही विमानतळावर तेवढ्याच संख्येने प्रवासी येत आहेत. नरेंद्र सावईकर यांनी कार्यक्रमाचे स्वागत केले. तर जिल्हा पंचायत सदस्य दीपक नाईक बोरकर यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

 

टॅग्स :goaगोवा