शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

भारत तिसरी आर्थिक शक्ती बनणार: केंद्रीयमंत्री राजीव चंद्रशेखर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2023 08:48 IST

फोंडा भाजप मंडळाने आयोजित केलेल्या व्यापारी संमेलनात ते बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्क फोंडा: काँग्रेसने चुकीची धोरणे लावल्याने एकेकाळी भारताची - आर्थिक स्थिती फारच कमकुवत होती. आज भारत आर्थिक बाबतीत झपाट्याने प्रगती करत असून, फक्त नऊ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला पाचव्या क्रमांकाच्या आर्थिक स्थितीवर आणले आहे. आगामी तीन वर्षांत भारताला तिसऱ्या क्रमांकावर आणण्याचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिले असून त्यासाठी नागरिकांनी त्यांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन केंद्रीय मंत्री डॉ. राजीव चंद्रशेखर यांनी केले.

फोंडा भाजप मंडळाने आयोजित केलेल्या व्यापारी संमेलनात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कृषिमंत्री रवी नाईक, माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर, जिल्हा पंचायत अध्यक्ष सुवर्णा तेंडुलकर, एन.आर.आय. आयुक्त नरेंद्र सावईकर, मंडळ अध्यक्ष विश्वनाथ दळवी आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना राजीव चंद्रशेखर पुढे म्हणाले, 'एक काळ असा होता की तंत्रज्ञानाच्या बाबतीत आम्ही खूप मागे होतो. प्रत्येक बाबतीत आम्हाला दुसऱ्या देशावर अवलंबून राहावे लागायचे. साध्या स्मार्टफोन बाबतीत आम्ही ८२ टक्के आयात करत होतो. आज आम्ही शंभर टक्के उत्पादन येथे घेत आहोत. तर दुसऱ्या देशाला आम्ही मोबाईल पुरवत आहोत. हा फरक नरेंद्र मोदींनी घडवून आणला.

२०१४ मध्ये भाजपने ज्यावेळी सरकार स्थापन केले, त्यावेळी एक कमकुवत देश काँग्रेसने भाजपकडे सोपवला होता. भारत कधी विकासाभिमुख देश होईल हे त्यावेळेस कुणाच्या स्वप्नात सुद्धा नव्हते; परंतु नरेंद्र मोदी यांनी ते साध्य करून दाखवले आहे, असेही ते म्हणाले.

प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यावेळी म्हणाले की, ज्या दिवसापासून केंद्रात भाजपचे सरकार आले त्या दिवसापासून गोव्याला निधीची कमतरता कधी भासलीच नाही. म्हणून आज एक वेगळा आधुनिक गोवा लोकांना दिसत आहे. जागतिक दर्जाचे विमानतळ आम्ही लोकांना दिले आहे. त्यावेळी दाबोळी बंद होईल, असा काही लोकांनी गैरसमज करून घेतला होता; परंतु आज दोन्ही विमानतळावर तेवढ्याच संख्येने प्रवासी येत आहेत. नरेंद्र सावईकर यांनी कार्यक्रमाचे स्वागत केले. तर जिल्हा पंचायत सदस्य दीपक नाईक बोरकर यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

 

टॅग्स :goaगोवा