शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
3
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
4
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
5
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
6
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
7
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
8
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
9
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
10
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
11
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
12
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
13
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
14
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
15
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
16
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
17
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
18
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
19
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
20
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...

भारत हे देशाचे समृद्ध नाव; नाहक वाद नको: व्यंकय्या नायडू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 08:34 IST

दोनापावला येथील राजभवन येथील दरबार हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: भारत हे देशाचे समृद्ध असे नाव आहे. मात्र काही जण त्याला विनाकारण आक्षेप घेत आहेत. त्यामुळे कुणीही त्यावरून वाद निर्माण करू नये, असे मत माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले.

दोनापावला येथील राजभवन येथील दरबार हॉलमध्ये आयोजित आठ राज्ये व दोन केंद्रशासित प्रदेशांच्या स्थापना दिवसानिमित आयोजित एक भारत, श्रेष्ठ भारत या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. यावेळी गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, आयएएस अधिकारी मिहीर वर्धन तसेच या राज्यांचे प्रतिनिधी व्यासपीठावर उपस्थित होते.

माजी उपराष्ट्रपती नायडू म्हणाले की, आमचा देश वेगवेगळ्या संस्कृती आणि परंपरेने नटलेला आहे. हा आमचा अभिमान आहे. विविधता व एकतेचा याव्दारे संदेश दिला जात आहे. आमच्या देशात वेगवेगळ्या भाषा असून सर्व धर्म, जातींचे लोक एकत्र राहत आहेत. कारण, आम्ही सर्वप्रथम भारतीय आहोत. इंडिया ऐवजी आता भारत असे संबोधले जात आहे. भारत हे नाव समृद्ध आहे. त्यामुळे त्यावर आक्षेप घेण्याचा विषयच नाही. मात्र काहीजणांना त्यावर आक्षेप आहे. त्यांचा हा विनाकारण आहे. तर काहीजण असेही असतात, जे आक्षेपही नोंदवत नाहीत व त्यावर कुठलीही प्रतिक्रियाही देत नाहीत. भारत या नावावरून वाद नको असे त्यांनी सांगितले.

काही राज्यांमध्ये सीमा तसेच भाषेवरून वाद आहेत. या राज्यांनी आपापसात सामंजस्याने एकमेकांशी चर्चा करून वाद मिटवावा. त्यासाठी केंद्राचीही मदत घ्यावी. प्रत्येक राज्यांमध्ये स्वत:ची मातृभाषा आहे. मातृभाषेला प्रोत्साहन देण्यासाठी काम व्हावे, असेही नायडू यांनी नमूद केले.

 

टॅग्स :goaगोवाVenkaiah Naiduव्यंकय्या नायडू