शहरं
Join us  
Trending Stories
1
Pope Francis: पोप फ्रान्सिस यांचं निधन, दीर्घ आजारपणानंतर व्हॅटिकन सिटी येथे घेतला अखेरचा श्वास
2
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
3
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
4
हद्दच झाली...! मित्रांनी नवरा-नवरीला निळा ड्रम गिफ्ट केला; दहशतीत असलेले सगळे वऱ्हाडी पाहू लागले
5
कितीही उत्पन्न असलं तरी श्रीमंती येणार नाही; जोपर्यंत बचतीचे 'हे' सूत्र वापरणार नाही
6
"मी लॉरेन्स बिश्नोईचा माणूस, तुला गोळी घालेन", रुबीना दिलेकच्या नवऱ्याला जीवे मारण्याची धमकी
7
व्यापारयुद्ध, चीन...भारतासाठी जेडी व्हेन्स यांचा दौरा महत्वाचा; पीएम मोदी कोणते मु्द्दे मांडणार?
8
Vastu Tips: घरात मनी प्लांट आहे पण आर्थिक लाभ होत नाही? नक्कीच होत आहेत 'या' चुका!
9
साईचरणी ७५ लाखांचा सुवर्ण मुकुट अर्पण; कुटुंबाकडून ओळख गुप्त ठेवण्याची विनंती
10
गायीच्या शेणात असं काय खास आहे? जे खरेदी करण्यासाठी अरब देशांनी लावल्या रांगा
11
Karnataka Murder: 'आई आणि बहीण रोज वडिलांशी भांडायची, जीवे मारण्याची दिलेली धमकी'; मुलाचा मोठा दावा
12
Rishabh Pant चं नशीब फळफळलं!! आधी २७ कोटींची बोली, आता BCCIच्या करारतही मिळाली बढती
13
Vastu Tips: आपल्या वास्तूची दृष्ट कधी व कशाने काढावी? त्यामागे शास्त्र काय? जाणून घ्या!
14
Pope Francis: किती श्रीमंत होते पोप फ्रान्सिस, आपल्या मागे किती सोडली त्यांनी संपत्ती?
15
पोलिसांनी काठी मारली, दुचाकीवरील महिला तोल जावून डंपरखाली सापडली, जागीच मृत्यू   
16
बीसीसीआयनं केंद्रीय करारातून लॉर्ड शार्दुल ठाकूरचं नाव वगळलं!
17
"एका रात्रीत सर्व उद्ध्वस्त, आमच्याकडे ना दुकान आहे ना जमीन; सरकारला विनंती करतो की..."
18
ब्राह्मण असून २ लग्न का केली? अभिनेत्याचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाला- "रामाच्या वडिलांच्या ३ बायका होत्या..."
19
बाजारात ५०० रुपयांच्या बनावट नोटांचा सुळसुळाट, थोडीशी नजरचूक पडू शकते महागात, सरकारने दिला अलर्ट 
20
Ajit Pawar: 'रिक्षात पुरुषाला बसवलं तर त्याचा फोटो काढा', अजितदादांच्या महिलांना सूचना

भारत हे देशाचे समृद्ध नाव; नाहक वाद नको: व्यंकय्या नायडू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 08:34 IST

दोनापावला येथील राजभवन येथील दरबार हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: भारत हे देशाचे समृद्ध असे नाव आहे. मात्र काही जण त्याला विनाकारण आक्षेप घेत आहेत. त्यामुळे कुणीही त्यावरून वाद निर्माण करू नये, असे मत माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले.

दोनापावला येथील राजभवन येथील दरबार हॉलमध्ये आयोजित आठ राज्ये व दोन केंद्रशासित प्रदेशांच्या स्थापना दिवसानिमित आयोजित एक भारत, श्रेष्ठ भारत या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. यावेळी गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, आयएएस अधिकारी मिहीर वर्धन तसेच या राज्यांचे प्रतिनिधी व्यासपीठावर उपस्थित होते.

माजी उपराष्ट्रपती नायडू म्हणाले की, आमचा देश वेगवेगळ्या संस्कृती आणि परंपरेने नटलेला आहे. हा आमचा अभिमान आहे. विविधता व एकतेचा याव्दारे संदेश दिला जात आहे. आमच्या देशात वेगवेगळ्या भाषा असून सर्व धर्म, जातींचे लोक एकत्र राहत आहेत. कारण, आम्ही सर्वप्रथम भारतीय आहोत. इंडिया ऐवजी आता भारत असे संबोधले जात आहे. भारत हे नाव समृद्ध आहे. त्यामुळे त्यावर आक्षेप घेण्याचा विषयच नाही. मात्र काहीजणांना त्यावर आक्षेप आहे. त्यांचा हा विनाकारण आहे. तर काहीजण असेही असतात, जे आक्षेपही नोंदवत नाहीत व त्यावर कुठलीही प्रतिक्रियाही देत नाहीत. भारत या नावावरून वाद नको असे त्यांनी सांगितले.

काही राज्यांमध्ये सीमा तसेच भाषेवरून वाद आहेत. या राज्यांनी आपापसात सामंजस्याने एकमेकांशी चर्चा करून वाद मिटवावा. त्यासाठी केंद्राचीही मदत घ्यावी. प्रत्येक राज्यांमध्ये स्वत:ची मातृभाषा आहे. मातृभाषेला प्रोत्साहन देण्यासाठी काम व्हावे, असेही नायडू यांनी नमूद केले.

 

टॅग्स :goaगोवाVenkaiah Naiduव्यंकय्या नायडू