शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
4
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
5
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
6
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
7
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
8
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
9
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
10
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
11
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
12
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
13
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
14
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
15
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
16
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
17
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
18
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
19
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
20
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?

भारत हे देशाचे समृद्ध नाव; नाहक वाद नको: व्यंकय्या नायडू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 08:34 IST

दोनापावला येथील राजभवन येथील दरबार हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: भारत हे देशाचे समृद्ध असे नाव आहे. मात्र काही जण त्याला विनाकारण आक्षेप घेत आहेत. त्यामुळे कुणीही त्यावरून वाद निर्माण करू नये, असे मत माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले.

दोनापावला येथील राजभवन येथील दरबार हॉलमध्ये आयोजित आठ राज्ये व दोन केंद्रशासित प्रदेशांच्या स्थापना दिवसानिमित आयोजित एक भारत, श्रेष्ठ भारत या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. यावेळी गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, आयएएस अधिकारी मिहीर वर्धन तसेच या राज्यांचे प्रतिनिधी व्यासपीठावर उपस्थित होते.

माजी उपराष्ट्रपती नायडू म्हणाले की, आमचा देश वेगवेगळ्या संस्कृती आणि परंपरेने नटलेला आहे. हा आमचा अभिमान आहे. विविधता व एकतेचा याव्दारे संदेश दिला जात आहे. आमच्या देशात वेगवेगळ्या भाषा असून सर्व धर्म, जातींचे लोक एकत्र राहत आहेत. कारण, आम्ही सर्वप्रथम भारतीय आहोत. इंडिया ऐवजी आता भारत असे संबोधले जात आहे. भारत हे नाव समृद्ध आहे. त्यामुळे त्यावर आक्षेप घेण्याचा विषयच नाही. मात्र काहीजणांना त्यावर आक्षेप आहे. त्यांचा हा विनाकारण आहे. तर काहीजण असेही असतात, जे आक्षेपही नोंदवत नाहीत व त्यावर कुठलीही प्रतिक्रियाही देत नाहीत. भारत या नावावरून वाद नको असे त्यांनी सांगितले.

काही राज्यांमध्ये सीमा तसेच भाषेवरून वाद आहेत. या राज्यांनी आपापसात सामंजस्याने एकमेकांशी चर्चा करून वाद मिटवावा. त्यासाठी केंद्राचीही मदत घ्यावी. प्रत्येक राज्यांमध्ये स्वत:ची मातृभाषा आहे. मातृभाषेला प्रोत्साहन देण्यासाठी काम व्हावे, असेही नायडू यांनी नमूद केले.

 

टॅग्स :goaगोवाVenkaiah Naiduव्यंकय्या नायडू