शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
2
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
3
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
4
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
5
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
6
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
7
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
8
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
9
कुजबुज: मोहित कंबोज यांचा खरंच संन्यास की प्रसिद्धीसाठी स्टंट? ‘उँचे लोग, उँची पसंद’, पण...
10
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
11
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
12
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
13
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
14
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
15
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
16
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
17
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
18
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
19
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
20
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात

धरणांच्या पातळीत वाढ

By admin | Updated: July 21, 2016 02:17 IST

पणजी : राज्यात शनिवारपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे राज्यातील धरणांची पातळी वाढली आहे. साळावलीचे

पणजी : राज्यात शनिवारपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे राज्यातील धरणांची पातळी वाढली आहे. साळावलीचे धरण भरण्यास केवळ ५0 ते ६0 सेंटीमीटर बाकी आहे. पाऊस अखंड चालू राहिल्यास आज, गुरुवारी हे धरण भरून पाणी ओसंडून वाहू शकते. मात्र, त्याचा विसर्ग आपोआप होत असल्याने धरण भरले तरी त्यापासून परिसरास धोका नाही, असे जलस्रोत अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. केवळ अंजुणे धरणाच्या बाबतीत पाण्याची पातळी वाढली की दरवाजे मात्र उघडावे लागतात. जलस्रोत खात्याचे मुख्य अभियंता संदीप नाडकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, अंजुणे धरण वगळता इतर धरणांच्या बाबतीत ती भरली की पाण्याचा विसर्ग आपोआप होतो त्यामुळे कोणताही धोका नाही. अंजुणे धरण भरण्यासाठी अजून साडेआठ मीटर पातळी बाकी आहे. असाच पाऊस सलग १५ ते २0 दिवस कोसळत राहिला तरच ही स्थिती उद्भवेल. बुधवारी दुपारी साळावली धरणातील पाण्याची पातळी ४0.३५ मीटर होती. साधारणपणे ४१.१५ मीटरपर्यंत ती पोहोचली की धरण भरून पाणी बाहेर वाहू लागते. गेल्या वर्षी याच दिवशी म्हणजे २0 जुलै रोजी साळावलीतील पाण्याची पातळी ३९.८५ मीटर होती. आमठाणे धरणाच्या बाबतीत तेथील क निष्ठ अभियंता के. पी. नाईक म्हणाले की, या धरणाची क्षमता ५0 मीटर पातळीची आहे. बुधवारी पाण्याची पातळी ४८.६५ मीटर होती. हे धरण भरण्यास १.३५ मीटर बाकी आहे; परंतु ते एवढ्यात भरणे शक्य नाही; कारण धरणाच्या वरच्या भागात व्याप्ती मोठी असते. आठ ते दहा दिवस अव्याहत पाऊस कोसळला तर ते पाणी ओसंडून वाहू लागेल. मात्र, पाण्याचा विसर्ग आपोआप होत असल्याने या धरणापासूनही धोका नाही. (प्रतिनिधी)