शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

धरणांच्या पातळीत वाढ

By admin | Updated: July 21, 2016 02:17 IST

पणजी : राज्यात शनिवारपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे राज्यातील धरणांची पातळी वाढली आहे. साळावलीचे

पणजी : राज्यात शनिवारपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे राज्यातील धरणांची पातळी वाढली आहे. साळावलीचे धरण भरण्यास केवळ ५0 ते ६0 सेंटीमीटर बाकी आहे. पाऊस अखंड चालू राहिल्यास आज, गुरुवारी हे धरण भरून पाणी ओसंडून वाहू शकते. मात्र, त्याचा विसर्ग आपोआप होत असल्याने धरण भरले तरी त्यापासून परिसरास धोका नाही, असे जलस्रोत अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. केवळ अंजुणे धरणाच्या बाबतीत पाण्याची पातळी वाढली की दरवाजे मात्र उघडावे लागतात. जलस्रोत खात्याचे मुख्य अभियंता संदीप नाडकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, अंजुणे धरण वगळता इतर धरणांच्या बाबतीत ती भरली की पाण्याचा विसर्ग आपोआप होतो त्यामुळे कोणताही धोका नाही. अंजुणे धरण भरण्यासाठी अजून साडेआठ मीटर पातळी बाकी आहे. असाच पाऊस सलग १५ ते २0 दिवस कोसळत राहिला तरच ही स्थिती उद्भवेल. बुधवारी दुपारी साळावली धरणातील पाण्याची पातळी ४0.३५ मीटर होती. साधारणपणे ४१.१५ मीटरपर्यंत ती पोहोचली की धरण भरून पाणी बाहेर वाहू लागते. गेल्या वर्षी याच दिवशी म्हणजे २0 जुलै रोजी साळावलीतील पाण्याची पातळी ३९.८५ मीटर होती. आमठाणे धरणाच्या बाबतीत तेथील क निष्ठ अभियंता के. पी. नाईक म्हणाले की, या धरणाची क्षमता ५0 मीटर पातळीची आहे. बुधवारी पाण्याची पातळी ४८.६५ मीटर होती. हे धरण भरण्यास १.३५ मीटर बाकी आहे; परंतु ते एवढ्यात भरणे शक्य नाही; कारण धरणाच्या वरच्या भागात व्याप्ती मोठी असते. आठ ते दहा दिवस अव्याहत पाऊस कोसळला तर ते पाणी ओसंडून वाहू लागेल. मात्र, पाण्याचा विसर्ग आपोआप होत असल्याने या धरणापासूनही धोका नाही. (प्रतिनिधी)