शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीन दिवसांत माफी मागा नाहीतर..."; मुख्यमंत्री शिंदेंनी थेट संजय राऊतांना धाडली नोटीस
2
"डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला"; जितेंद्र आव्हाडांना अटक करण्याची राष्ट्रवादीची मागणी
3
Netherlands vs Sri Lanka : वर्ल्ड कपच्या सुरुवातीलाच मोठा उलटफेर; नेदरलँड्सने श्रीलंकेचा उडवला धुव्वा
4
Fact Check : बीबीसीचा 'हा' व्हिडीओ २०२४ च्या निवडणुकीतील नाही; जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य
5
"काँग्रेससोबत प्रेमविवाह किंवा अरेंज मॅरेज नाही, ४ जूननंतर..." युतीबाबत सीएम केजरीवाल यांचं मोठं विधान
6
जितेंद्र आव्हाडांनी फाडला बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो; चूक लक्षात येताच मागितली माफी
7
'त्या' घटनेनंतर पुन्हा एक अब्जाधीश टायटॅनिकचे अवशेष पाहायला जाणार; जाणून घ्या कोण आहेत?
8
"...अन्यथा मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना कृष्णेच्या पाण्याची आंघोळ घालणार"
9
लोकसभा निवडणुकीत भाजप जिंकल्यास रॉकेट बनतील 'हे' 'Modi Stocks', होऊ शकते बंपर वाढ
10
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी घसरण, हिंदाल्को-पॉवरग्रिडमध्ये तेजी; IT-बँकिंग शेअर्स घसरले
11
तलावाच्या खोदकामात JCB च्या खोऱ्यात अडकलं पोतं; उघडून पाहताच पैशाचं घबाड
12
Fact Check : कंगना राणौतसोबतच्या फोटोत गँगस्टर अबू सालेम नाही; जाणून घ्या, 'सत्य'
13
"तुम्हाला जमत नसेल तर गृहखातं माझ्याकडे द्या’’, सुषमा अंधारे यांचा देवेंद्र फडणवीस यांना टोला 
14
अंजली दमानियांचा बोलविता धनी कोण?; फोन रेकॉर्ड तपासा; अजित पवार गटाचा पलटवार
15
T20 World Cup 2024 : ...म्हणून यंदाही भारताचाच दबदबा; IND vs PAK मध्ये टीम इंडिया ठरू शकते वरचढ
16
“डॉ. तावरेंनी बिनधास्त दोषींची नावे घ्यावी, गरज पडल्यास आम्ही २४ तास संरक्षण देऊ”: वसंत मोरे
17
"नरेंद्र मोदी आपले निवृत्त जीवन...", पंतप्रधानांच्या दौऱ्यावर जयराम रमेश यांची खोचक टीका
18
३०० शब्दांचा निबंध लिहायला सांगणाऱ्यांची होणार चौकशी; पुणे अपघात प्रकरणात सरकारचा निर्णय
19
राज्यातील १०४७ पोलिसांना मतदान करण्याची परवानगी द्या, खासदाराची निवडणूक आयोगाला विनंती
20
'या' आलिशान क्रूझवर होतेय अनंत-राधिका यांची प्री वेडिंग सेरेमनी; किंमत, खासियत पाहून व्हाल अवाक्

उष्णतेत वीजेचा होतोय लपंडाव, सर्वसामान्य लोक हैराण 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2024 4:32 PM

या आठवड्यात तापमान आणखी वाढणार असून ते ३६ अंशावर जाण्याची शक्यता हवामान वर्तविली आहे.

 - नारायण गावस

पणजी : राज्यात एकाबाजूने दिवसेंदिवस उष्णता वाढत आहे तर दुसऱ्या बाजूने लोकांना वीजेच्या लपंडावला सामोरे जावे लागत आहे. पावसाळी पूर्व कामे वीज खात्याने हाती घेतल्याने  अनेकवेळा वीज बंद ठेवली जात आहे. याचा फटका घरातील लोकांप्रमाणे कार्यालयीन कर्मचाऱ्यांना बसत आहे. वीज बंद असल्याने पंखे तसेच एसीचा वापर करायला मिळत नसल्याने लोक हैराण झाले आहे.

शहरापासून खेड्यागावांपर्यंत सर्वत्र सध्या लोक उष्णतेने हैराण आहेत. वीज खात्याचे कर्मचारी नवीन केबल घालण्यासाठी तसेच   वीज तारांना लागलेल्या  झाडांच्या फांद्या कापण्यासाठी तासनतास वीज बंद ठेऊन काम करत आहेत. त्यामुळे दिवसभर घरात राहणाऱ्या लोकांना पंखा तसेच एसीचा वापर करता येत नाही. त्यामुळे लोकांना मोठ्या  प्रमाणात उष्णतेचा त्रास सहन करावा लागत आहे. या उष्णतेमुळे  लहान मुलांना  तसेच ज्येष्ठ नागरिकांना खूपच त्रास होत आहे.

तापमानात आणखी वाढया आठवड्यात तापमान आणखी वाढणार असून ते ३६ अंशावर जाण्याची शक्यता हवामान वर्तविली आहे. पुढील आठ दिवस तापमान असेच चढेच राहणार आहे. हे तापमान सरासरी तापमानापेक्षा १ ते २ अंशाने वाढणार आहे. राज्यात सध्या सरासरी तापमान हे ३३.५ ते ३४.५ अंश असते ते आता वाढून ३५ ते ३६ पर्यंत जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना या तापमानाचा आणखी त्रास सहन करावा लागणार आहे. त्यातच वीजेचा लपंडाव असल्याने याचा नागरिकांना फटका  बसणार.  राज्यात मार्च महिना सुरु झाल्यापासून तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सियस पर्यंत गेले आहे. 

उष्णतेचा आरोग्यावर परिणामया वाढत्या उष्णतेमुळे लोकांच्या आरोग्यावर अनेक परिणाम दिसून येत आहे. लोकांना चक्कर येणे उलटी मळमळ या सरखे आजार जडले आहे. त्यामुळे भरपूर पाणी प्यावे तसेच भर उन्हात बाहेर न जाण्याचे आवाहन आरोग्य खात्याने लोकांना केले आहे.

टॅग्स :electricityवीजgoaगोवा