शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

वास्को: बुडणाऱ्या जहाजातील १९ जणांना तटरक्षक दलाने दिले जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2022 00:02 IST

जहाज बुडून त्याच्यावरील १९ सदस्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो अशी माहीती तटरक्षक दलाच्या जवानांना मिळाली. 

लोकमत न्यूज नेटवर्क

वास्को: रत्नागीरी येथील खोल समुद्रात ‘एमटी पार्थ’ जहाज बुडायला लागल्याने त्याच्यावरील १९ सदस्यांचा जीव धोक्यात असल्याची माहीती मिळताच भारतीय तटरक्षक दलाच्या जवानांनी जहाजासहीत त्वरित तेथे पोचून त्यांना आपल्या जहाजात घेऊन त्यांचा जीव वाचविला. तटरक्षक दलाने बुडणाऱ्या जहाजावरील वाचवलेल्या १९ सदस्यांना घेऊन ते शनिवारी (दि.१७) सकाळी ते गोव्याच्या मुरगाव बंदरात पोचणार असल्याची माहीती प्राप्त झाली.

मुरगाव बंदरापासून काही दूर समुद्रात गस्तीवर असलेल्या तटरक्षक दलाच्या ‘आयसीजीएस सुजीत’ जहाजावरील जवानांना शुक्रवारी (दि.१६) सकाळी १०.४५ वाजता त्याबाबत माहीती मिळाली. रत्नागीरी, महाराष्ट्रा येथील समुद्रात ‘एमटी पार्थ’ नामक जहाजाला (मरचंट नेवी वेसल) गळती लागून जहाजाच्या आत मोठ्या प्रमाणात पाणी शिरायला लागले. यामुळे जहाज बुडून त्याच्यावरील १९ सदस्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो अशी माहीती तटरक्षक दलाच्या जवानांना मिळाली. 

ते जहाज मुरगाव बंदरापासून ८० नोटीकल मैल खोल समुद्रात असल्याचे तटरक्षक दलाच्या जवानांना कळताच त्यांनी त्वरित दलाच्या ‘आयसीजीएस सुजित’ जहाजासहीत रत्नागीरी येथे त्या १९ जणांच्या बचावासाठी कुच केली. ‘आयसीजीएस सुजित’ जहाजात १९ जणांना वाचवण्यासाठी गेलेल्या दलाच्या जवानांना ह्या कार्यात सहकार्यासाठी तटरक्षक दलाने त्यांच्याबरोबर ‘आयसीजीएस अपूर्व’ जहाज आणि ‘सीजी ध्रुव’ हेलिकॉप्टर पाठवले. खराब हवामानामुळे खवाळलेल्या समुद्राची आणि भयंकर वाऱ्याची परवा न करता तटरक्षक दलाचे जवान त्या १९ जणांच्या बचावासाठी निघाल्यानंतर अखेरीस रत्नागीरी येथील खोल समुद्रात धोक्यात असलेल्या त्या जहाजाच्या जवळ जाऊन पोचले. समुद्राचे पाणी शिरून बुडण्याच्या धोक्यात असलेल्या जहाजावरील त्या १९ सदस्यांनी ‘लाईफराफ्ट’ च्या मदतीने बुडण्याच्या धोक्यात असलेले जहाज सोडल्याचे तटरक्षक दलाच्या जवानांना दिसून आले. 

तटरक्षक दलाच्या जवानांनी त्वरित पावले उचलून ‘एमटी पार्थ’ जहाजावरील १९ सदस्यांना आपल्या जहाजात घेऊन त्यांचा जीव सुरक्षित असल्याची खात्री करून घेतली. बचाव कार्यासाठी गेलेले तटरक्षक दलाचे ते जहाज शनिवारी सकाळी वाचवलेल्या त्या १९ सदस्यांना घेऊन मुरगाव बंदरात दाखल होणार अशी माहीती प्राप्त झाली. त्या सर्व सदस्यांचा जीव सुरक्षित असून तटरक्षक दलाचे ते जहाज त्यांना घेऊन मुरगाव बंदरात दाखल झाल्यानंतर त्यांना वैद्यकीय तपासणी, इत्यादीसाठी कोस्टल पोलिसांच्या ताब्यात देईल अशी माहीती तटरक्षक दलाच्या सूत्रांनी दिली. 

टॅग्स :goaगोवा