शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

बेकायदेशीर की अनियमित ? बांधकामांमधील फरक पाहू; हायकोर्टाच्या आदेशाबाबत मुख्यमंत्र्यांची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 10:31 IST

जनतेला थोडा दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : किनारी भागातील बांधकामाच्या संदर्भात उच्च न्यायालयाच्यागोवा खंडपीठाच्या आदेशानंतर पंचायत संचालनालयाने हाती घेतलेल्या मोहिमेसंदर्भात गोमंतकीय जनतेने घाबरून जाण्याचे कारण नाही. बेकायदेशीर बांधकामे आणि अनियमित बांधकामे यांच्यातील फरक सरकार पाहणार आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत लोकांना दिलासा दिला आहे.

किनारी भागातील बांधकामांसंदर्भात उपस्थित झालेल्या प्रश्नामुळे सद्यस्थितीत जनतेमध्ये भीतीचे वातावरण आहे. आपल्या बांधकामांवर कारवाई होऊ शकते अशी भीती लोकांना वाटते. याप्रश्नी सरकारने दिलासा देण्याची मागणी विरोधी पक्षनेत्यांसह आमदारांनी केली होती.

सरकार लोकांच्या बाजूनेच आहे...

याविषयी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच बुधवारी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सभागृहात निवेदन केले. खंडपीठाच्या आदेशाचा अभ्यास चालू आहे. यातून काहीतरी मार्ग काढला जाईल. बेकायदेशीर बांधकामे आणि अनियमित बांधकामे यांत फरक करावा लागणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. सरकार लोकांच्या बाजूने असून नेहमीच कायद्याचे पालन करीत आलेल्या गोमंतकीयांनी भिऊन जाऊ नये, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

खंडपीठाने ६ मार्च रोजी आदेश जारी करून काणकोणमधील आगोंद समुद्र किनाऱ्यावरील ६७ आस्थापने पाडण्याचा आदेश दिला होता. त्याची अंमलबजावणीही हाती घेतली. खंडपीठाच्या सूचनेनुसार पंचायत संचालनालयाने किनाऱ्यावरील बांधकामांची पाहणी सुरू केली आहे. नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत. यामुळे लोक घाबरल्याचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार एल्टन डिकॉस्टा यांनी विधानसभेत सांगितले होते. सरकारने हस्तक्षेप करण्याची मागणी त्यांनी केली होती. 

टॅग्स :goaगोवाHigh Courtउच्च न्यायालयPramod Sawantप्रमोद सावंत