शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
2
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
3
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
4
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
5
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
6
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
7
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
8
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
9
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
10
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
11
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
12
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
13
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
14
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
15
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
16
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
17
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
18
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
19
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
20
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा

जास्त बोलाल, तर उद्रेक होईल! मगोपचा आरजीला कडक इशारा; मनोज परब यांचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2024 10:49 IST

मगोप नेतृत्त्वाबाबत तसेच पक्ष संपवण्याबद्दल काही बोलल्यास उद्रेक होईल, मगोप कार्यकर्ते स्वस्थ बसणार नाहीत.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : मगो पक्ष चुकीच्या माणसांच्या हातात आहे, असा आरोप करत ढवळीकरबंधूची राजकीय कारकिर्द आम्ही संपवू, असा इशारा आरजीचे प्रमुख मनोज परब यांनी दिल्यानंतर काही तासातच मगोपच्या केंद्रीय समितीची बैठक झाली. परब यांनी यापुढे अशी भाषा केल्यास उद्रेक होईल, असा इशाराच मगोपच्या नेत्यांनी दिला आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना मगोपचे उपाध्यक्ष नारायण सावंत यांनी परब यांच्या विधानाचा तीव्र निषेध केला. परब यांनी आपली पातळी पाहून बोलावे. मगोप नेतृत्त्वाबाबत तसेच पक्ष संपवण्याबद्दल काही बोलल्यास उद्रेक होईल, मगोप कार्यकर्ते स्वस्थ बसणार नाहीत.

पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणिचे सदस्य राघोबा गावडे म्हणाले की, आरजीने मगोप संपवण्याच्या गोष्टी विसराव्यात. आरजी हा कालचा पक्ष आहे. मनोज परब यांनी हिटलरसारखे वागू नये. लोकांकडे पैशांसाठी हात पसरुन कोणी निवडणूक लढवू नये, अशी दादागीरीची भाषा करुन मते मिळणार नाहीत.

दरम्यान, भाजपने दक्षिण गोव्यात महिला उमेदवार देण्याचा जो निर्णय घेतला आहे त्याचे मगोपने स्वागत केले आहे. नारायण सावंत म्हणाले की, मगोपनेच गोव्याला पहिला महिला मुख्यमंत्री दिला. १९८० साली संयोगिता राणे खासदार झाल्या.

मगोपचे विलिनीकरण नाहीच : दीपक ढवळीकर

पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर म्हणाले की, मगो पक्षाचे विलिनीकरण कधीच शक्य नाही. पक्षाची घटनाच अशी आहे की, सर्वजण पक्ष सोडून गेले तरी एक कार्यकर्तादखील पक्ष पुढे नेऊ शकतो. पक्ष संपवण्याचा प्रयत्न काँग्रेस, भाजपनेही केला परंतु कोणालाही ते शक्य झाले नाही. आठवेळा आम्ही कोर्टात गेलो. घटनेप्रमाणे कोणी पक्ष विलीनही करु शकत नाही. मगोपकडे १३ टक्के मते आहेत हे आरजीने हे ध्यानात ठेवावे. अरे तुरेची भाषा करु नये. बहुजन समाजाच्या हितासाठी आम्ही पक्षाच्या माध्यमातून काम करत आहोत. भाजपने दक्षिण गोव्यात महिला उमेदवार देण्याचा जो निर्णय घेतला आहे त्याचे ढवळीकर यांनी स्वागत केले आहे.

ढवळीकरांची राजकीय कारकीर्द संपवू : मनोज परब

भाऊसाहेब बांदोडकर यांचा मगो पक्ष सध्या चुकीच्या हातात आहे. ढवळीकरबंधूनी मगोपला ढवळीकर ट्रस्ट बनवले आहे. बहुजन समाजाला आधुनिक गुलामगिरीत टाकण्याचे काम त्यांनी केले असून लवकरच आम्ही ढवळीकरबंधूचा हा राजकीय व्यवसाय व त्यांची राजकीय कारकीर्द संपवू, असा थेट इशारा रिव्होल्युशनरी गोवन्सचे प्रमुख मनोज परब यांनी काल दिला. भाऊसाहेबांनी बहुजन समाजाला ताकद देण्यासाठी मगोपची स्थापन केली. कालांतराने ढवळीकर बंधूनी या पक्षाला आपला राजकीय व्यवसाय बनविला आहे. पण हा त्यांचा व्यवसाय आम्ही जास्त काळ टिकू देणार नाही, ज्याप्रकारे आम्ही सत्तरीमध्ये काम केले तसेच काम आता मडकई मतदारसंघातही करणार आहोत. जोपर्यंत ढवळीकरबंधूची कारर्कीद संपवणार नाही तोपर्यंत आम्ही शांत होणार नाही, असे परब यांनी यावेळी सांगितले.

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण