शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

देशाला अर्थव्यवस्था वाढवायची असेल तर, अधिक बचत करणे आवश्यक - निखिल गुप्ता

By समीर नाईक | Updated: February 23, 2024 14:25 IST

सरकारने स्वतःचे कर्ज कमी केले पाहिजे, असे गुप्ता यांनी यावेळी सांगितले.

पणजी : भारताला आपली अर्थव्यवस्था ८ टक्के दराने वाढवायची असेल तर पुढील दोन दशकांमध्ये अधिक बचत करणे आवश्यक आहे.अर्थव्यवस्थेत घरगुती (घरे आणि छोटे व्यवसाय), कॉर्पोरेट क्षेत्र, सरकार आणि विदेशी व्यापार हे चार प्रमुख घटक असल्याचे सांगितले. हे घटक कोणतीही अर्थव्यवस्था बनवतात किंवा बिघडतात, असे मत अर्थतज्ज्ञ निखिल गुप्ता यांनी व्यक्त केले.

पणजीत शुक्रवारी सकाळी इंटरनॅशनल सेंटर गोवा (आयसीजी) येथे त्यांच्या “द एट पर्सेंट सोल्युशन” या पुस्तकावर आयोजित व्याख्यानात गुप्ता बोलत होते. यावेळी वाणिज्य आणि अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांसह इतर मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण देशाला बचत करायची असेल आणि वाढीचा दर स्थिर ठेवायचा असेल तर राज्य आणि केंद्र सरकारांनी त्यांचे कर्ज कमी करणे आवश्यक आहे. आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी सरकारने घरगुती क्षेत्रात बचतीला प्रोत्साहन दिले पाहिजे. खाजगी क्षेत्राला पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये अधिक गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित करून सरकारने स्वतःचे कर्ज कमी केले पाहिजे, असे गुप्ता यांनी यावेळी सांगितले.

सरकारने स्वतःचे कर्ज कमी करण्यासाठी संरक्षण, रेल्वे आणि रस्ते बांधणी यासारख्या क्षेत्रांचे खाजगीकरण केले पाहिजे. बचत हा गुंतवणुकीसाठी प्राथमिक स्त्रोत आहे. गुंतवणूक कोणत्याही देशात सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) वाढीस मदत करते. केवळ साधा उपभोग अर्थव्यवस्थेच्या वाढीस मदत करू शकत नाही, असे गुप्ता यांनी अधिक माहिती देताना सांगितले. 

अमेरिकेत आर्थिक संकट येण्याची शक्यता 

कोणत्याही उदयोन्मुख अर्थव्यवस्थेसाठी अमेरिका हा चांगला आदर्श नाही. आज ते मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी कर्ज माफ करत आहेत. याचे परीणाम लवकरच दिसू लागतील आणि ४ ते ५ वर्षांत यूएसएला मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागेल, असे अमेरिकेच्या कर्जाभिमुख अर्थव्यवस्थेवर बोलताना गुप्ता यांनी सांगितले.

टॅग्स :goaगोवाEconomyअर्थव्यवस्था