शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

देशाला अर्थव्यवस्था वाढवायची असेल तर, अधिक बचत करणे आवश्यक - निखिल गुप्ता

By समीर नाईक | Updated: February 23, 2024 14:25 IST

सरकारने स्वतःचे कर्ज कमी केले पाहिजे, असे गुप्ता यांनी यावेळी सांगितले.

पणजी : भारताला आपली अर्थव्यवस्था ८ टक्के दराने वाढवायची असेल तर पुढील दोन दशकांमध्ये अधिक बचत करणे आवश्यक आहे.अर्थव्यवस्थेत घरगुती (घरे आणि छोटे व्यवसाय), कॉर्पोरेट क्षेत्र, सरकार आणि विदेशी व्यापार हे चार प्रमुख घटक असल्याचे सांगितले. हे घटक कोणतीही अर्थव्यवस्था बनवतात किंवा बिघडतात, असे मत अर्थतज्ज्ञ निखिल गुप्ता यांनी व्यक्त केले.

पणजीत शुक्रवारी सकाळी इंटरनॅशनल सेंटर गोवा (आयसीजी) येथे त्यांच्या “द एट पर्सेंट सोल्युशन” या पुस्तकावर आयोजित व्याख्यानात गुप्ता बोलत होते. यावेळी वाणिज्य आणि अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांसह इतर मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण देशाला बचत करायची असेल आणि वाढीचा दर स्थिर ठेवायचा असेल तर राज्य आणि केंद्र सरकारांनी त्यांचे कर्ज कमी करणे आवश्यक आहे. आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी सरकारने घरगुती क्षेत्रात बचतीला प्रोत्साहन दिले पाहिजे. खाजगी क्षेत्राला पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये अधिक गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित करून सरकारने स्वतःचे कर्ज कमी केले पाहिजे, असे गुप्ता यांनी यावेळी सांगितले.

सरकारने स्वतःचे कर्ज कमी करण्यासाठी संरक्षण, रेल्वे आणि रस्ते बांधणी यासारख्या क्षेत्रांचे खाजगीकरण केले पाहिजे. बचत हा गुंतवणुकीसाठी प्राथमिक स्त्रोत आहे. गुंतवणूक कोणत्याही देशात सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) वाढीस मदत करते. केवळ साधा उपभोग अर्थव्यवस्थेच्या वाढीस मदत करू शकत नाही, असे गुप्ता यांनी अधिक माहिती देताना सांगितले. 

अमेरिकेत आर्थिक संकट येण्याची शक्यता 

कोणत्याही उदयोन्मुख अर्थव्यवस्थेसाठी अमेरिका हा चांगला आदर्श नाही. आज ते मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी कर्ज माफ करत आहेत. याचे परीणाम लवकरच दिसू लागतील आणि ४ ते ५ वर्षांत यूएसएला मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागेल, असे अमेरिकेच्या कर्जाभिमुख अर्थव्यवस्थेवर बोलताना गुप्ता यांनी सांगितले.

टॅग्स :goaगोवाEconomyअर्थव्यवस्था