शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

"साळ नदीचा गाळ न उपसल्यास...", आमदार चर्चिल आलेमाव यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2020 15:00 IST

या प्रकल्पा अंतर्गत बाणावली भागात जो पूल बांधला जात आहे. त्याची माती नदीत पडल्याने दोन दिवसांपूर्वी आलेल्या पावसात नदीचे पाणी जवळच्या शेतात घुसले होते. यासंबंधी स्थानिकांनी चिंता व्यक्त केली होती.

मडगाव: साळ नदीचा गाळ न उपसल्यास वेस्टर्न बायपास जवळील जमीन पाण्याखाली जाण्याची भीती बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी व्यक्त केली आहे. तसेच, जर हे काम सुरू न केल्यास बायपासचे काम बंद पाडू असा इशाराही त्यांनी दिला आहे.

या प्रकल्पा अंतर्गत बाणावली भागात जो पूल बांधला जात आहे. त्याची माती नदीत पडल्याने दोन दिवसांपूर्वी आलेल्या पावसात नदीचे पाणी जवळच्या शेतात घुसले होते. यासंबंधी स्थानिकांनी चिंता व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर आलेमाव यांनी सार्वजनिक बांधकाम खाते आणि पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांबरोबर या जागेची संयुक्त पाहणी केली. 

सध्या नदीत पडलेली माती जेसीबीने दूर करून पाण्याला वाट करून दिली आहे. या प्रकल्पाच्या सर्व्हिस रस्त्यांचे काम पूर्ण झाल्यावर साल नदीच्या बांधाची दुरुस्ती हाती घेण्यात येणार असल्याचे यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंते उमेश कुलकर्णी यांनी सांगितले.

साळ नदीच्या पाणवठ्याच्या जागेतून हा रस्ता जात आहे. त्यामुळे हा रस्ता मातीचा भराव घालून बांधण्याऐवजी सिमेंटच्या खांबावर पूल बांधून पूर्ण करावा अशी मागणी स्थानिकांनी केली होती. अन्यथा या भागात पूर येण्याची शक्यता व्यक्त केली होती. मात्र हा पर्याय खर्चीक असल्याने सरकारने तो नाकारला होता. त्यावेळी स्थानिक आमदार आलेमाव यांनी साळ नदीतील गाळ उपसण्याचा पर्याय पुढे आणला होता.

पाटबंधारे खात्याचे अभियंते साईनाथ जामखंडी  यांनी यावेळी साळ नदीचा गाळ उपसण्याची निविदा खुली केली असून ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले. 

टॅग्स :goaगोवा