शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

"साळ नदीचा गाळ न उपसल्यास...", आमदार चर्चिल आलेमाव यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2020 15:00 IST

या प्रकल्पा अंतर्गत बाणावली भागात जो पूल बांधला जात आहे. त्याची माती नदीत पडल्याने दोन दिवसांपूर्वी आलेल्या पावसात नदीचे पाणी जवळच्या शेतात घुसले होते. यासंबंधी स्थानिकांनी चिंता व्यक्त केली होती.

मडगाव: साळ नदीचा गाळ न उपसल्यास वेस्टर्न बायपास जवळील जमीन पाण्याखाली जाण्याची भीती बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी व्यक्त केली आहे. तसेच, जर हे काम सुरू न केल्यास बायपासचे काम बंद पाडू असा इशाराही त्यांनी दिला आहे.

या प्रकल्पा अंतर्गत बाणावली भागात जो पूल बांधला जात आहे. त्याची माती नदीत पडल्याने दोन दिवसांपूर्वी आलेल्या पावसात नदीचे पाणी जवळच्या शेतात घुसले होते. यासंबंधी स्थानिकांनी चिंता व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर आलेमाव यांनी सार्वजनिक बांधकाम खाते आणि पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांबरोबर या जागेची संयुक्त पाहणी केली. 

सध्या नदीत पडलेली माती जेसीबीने दूर करून पाण्याला वाट करून दिली आहे. या प्रकल्पाच्या सर्व्हिस रस्त्यांचे काम पूर्ण झाल्यावर साल नदीच्या बांधाची दुरुस्ती हाती घेण्यात येणार असल्याचे यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंते उमेश कुलकर्णी यांनी सांगितले.

साळ नदीच्या पाणवठ्याच्या जागेतून हा रस्ता जात आहे. त्यामुळे हा रस्ता मातीचा भराव घालून बांधण्याऐवजी सिमेंटच्या खांबावर पूल बांधून पूर्ण करावा अशी मागणी स्थानिकांनी केली होती. अन्यथा या भागात पूर येण्याची शक्यता व्यक्त केली होती. मात्र हा पर्याय खर्चीक असल्याने सरकारने तो नाकारला होता. त्यावेळी स्थानिक आमदार आलेमाव यांनी साळ नदीतील गाळ उपसण्याचा पर्याय पुढे आणला होता.

पाटबंधारे खात्याचे अभियंते साईनाथ जामखंडी  यांनी यावेळी साळ नदीचा गाळ उपसण्याची निविदा खुली केली असून ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले. 

टॅग्स :goaगोवा