शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

'खाणी 15 डिसेंबरपर्यंत सुरू न झाल्यास मगोपचे आमदार अंतिम पाऊल उचलतील'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 13:55 IST

सत्ताधारी भाजपाप्रणीत आघाडीचा घटक असलेल्या मगो पक्षाने खनिज खाणींच्या विषयावरून बुधवारी आपला दबाव सरकारवर वाढवला आहे. जर येत्या 15 डिसेंबरपर्यंत  खनिज खाणी सुरू झाल्या नाही तर मगोपचे तिन्ही आमदार अंतिम पाऊल उचलतील.

पणजी - सत्ताधारी भाजपाप्रणीत आघाडीचा घटक असलेल्या मगो पक्षाने खनिज खाणींच्या विषयावरून बुधवारी आपला दबाव सरकारवर वाढवला आहे. जर येत्या 15 डिसेंबरपर्यंत  खनिज खाणी सुरू झाल्या नाही तर मगोपचे तिन्ही आमदार अंतिम पाऊल उचलतील. तिन्ही आमदारांच्या सहमतीने मगो पक्ष सरकारमध्ये रहावे की राहू नये याविषयी अंतिम निर्णय घेतील, असे मगोपचे अध्यक्ष दिपक ढवळीकर यांनी जाहीर केले.

राज्यातील खनिज खाण अवलंबित आक्रमक झालेले आहेत. केंद्र सरकार गोव्यातील खाणी लवकर सुरू करण्यासाठी एमएमडीआर कायदा दुरुस्त करण्याच्या हेतूने अध्यादेश जारी करू पाहत नाही हे स्पष्ट झाले आहे. यामुळे खाण अवलंबितांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शेकडो खाण अवलंबित जाऊन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांना फोंडय़ातील त्यांच्या निवासस्थानी भेटले. कोणत्याही प्रकारे खाणी सुरू व्हायला हव्या असा आग्रह अवलंबितांनी धरला. खाणी पुढील पंधरा दिवसांत सुरू होतील, असे आश्वासन तेंडुलकर यांनी दिले. मात्र त्या पंधरा दिवसांत कशा सुरू होऊ शकतात याचा तपशील तेंडुलकर यांनी स्पष्ट केलेला नाही.

खाण अवलंबितांनी मग आपला मोर्चा मगोपचे अध्यक्ष ढवळीकर यांच्या दिशेने वळवला. ढवळीकर यांचे फोंडा येथे कार्यालय आहे. तिथे खाण अवलंबितांनी आक्रमकपणे आपली भूमिका मांडली. खाणी सुरू होण्यासाठी मगोपने सरकारमधून बाहेर पडावे असेही काही जणांनी सूचविले. त्यावर ढवळीकर यांनी येत्या 15 डिसेंबरपर्यंत जर खाणी सुरू झाल्या नाही तर मगो अंतिम निर्णय घेईलच, असे स्पष्ट केले. गोव्यातील सर्वपक्षीय शिष्टमंडळ दिल्लीला पंतप्रधानांकडे नेले जावे व त्या शिष्टमंडळासोबत खाण आंदोलकांच्या प्रतिनिधींनाही नेले जावे. पंतप्रधानांनी गोव्यातील खाणी कधी सुरू होतील याविषयी अंतिम सत्य काय ते सांगावे असे ढवळीकर म्हणाले. सरकारी महामंडळ स्थापन करा किंवा कायदा दुरुस्त करा पण खाणी सुरू व्हायलाच हव्यात. ज्या 80 लिजांविषयी वाद आहे किंवा प्रश्न आहे, त्या लिजेस बाजूला ठेवून उर्वरित खाणींचा  लिलाव सरकार पुकारू शकते. त्याला कुणाचा आक्षेप नसेल. सरकार त्या खाणींचा लिलाव का पुकारत नाही ते स्पष्ट केले जावे,असे ढवळीकर म्हणाले.

टॅग्स :goaगोवा