शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
3
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
4
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
5
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला
6
"त्यांचं रिलेशनशिप टॉक्झिक होतं", कुमार सानू आणि कुनिकाच्या अफेअरबद्दल लेक अयान म्हणाला- "आई आजही..."
7
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
8
Stock Markets Today: सुस्त सुरुवातीनंतर शेअर बाजारात पुन्हा खरेदी, Nifty २५,००० च्या जवळ; Adani Ports, TCS, NTPC टॉप गेनर्स
9
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
10
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
11
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
13
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
14
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
15
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
16
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
17
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
18
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
19
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
20
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?

'कामधेनू'च्या गाई रस्त्यावर दिसल्यास अनुदान परत घेऊ! मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2024 13:13 IST

तशा सूचना पशुसंवर्धन खात्याच्या अधिकाऱ्यांना दिल्याचेही त्यांनी सांगितले. 

लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : पशुसंवर्धन खात्यातर्फे शेतकऱ्यांना कामधेनू योजनेच्या अंतर्गत एका गायीसाठी ६० हजार रुपये खर्च केले जातात. या योजने अंतर्गत घेतलेल्या गायी दूध काढल्यानंतर रस्त्यावर सोडलेल्या दिसल्यास संबंधितांसाठी कामधेनू योजना कायमची बंद करून दिलेले अनुदान परत घेतली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला आहे. तशा सूचना पशुसंवर्धन खात्याच्या अधिकाऱ्यांना दिल्याचेही त्यांनी सांगितले. 

शहरातील भटक्या गुरांची समस्या सोडवण्यासाठी पालिकेतर्फे व पिपल फॉर अॅनिमल यांच्या सहकार्याने निरंकार येथे गोशाळा उभारण्यात आली आहे. या गोशाळेचे उद्घाटन व गुरांचे पूजन मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास कृषिमंत्री रवी नाईक, सहकारमंत्री सुभाष शिरोडकर, पशुसंवर्धन मंत्री नीळकंठ हळर्णकर, खात्याचे संचालक डॉ. नितीन नाईक, नगराध्यक्ष रितेश नाईक, उपनगराध्यक्ष दीपा कोलवेकर, जिल्हा पंचायत सदस्य दीपक नाईक बोरकर, बेतोडाचे सरपंच मधू खांडेपारकर, पंच सदस्य गीता गावडे, जमिनीचे मालक भवानी प्रसाद पाटील, योगीराज गोसावी व विशांत नाईक, माजी नगरसेवक शांताराम कोळवेकर, मुख्याधिकारी योगीराज गोसावी, पंच सदस्य वैशाली सालेलकर, नंद नाईक, रूपक देसाई आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, निरंकाल येथे युवकांनी ज्या प्रकारे भटक्या गुरांची जबाबदारी घेण्यासाठी गोशाळा उभारली, त्याच प्रकारे सर्व बाराही तालुक्यांमध्ये गोशाळा झाल्या तर राज्यातील भटक्या गुरांची समस्या नक्कीच सुटेल. राज्यात होणाऱ्या अपघातामधील २५ टक्के अपघात हे केवळ भटक्या गुरांमुळे होतात. त्यामुळे कामधेनू योजनेच्या अंतर्गत घेण्यात आलेल्या गायी रस्त्यावर फिरताना दिसल्या तर ते खपवून घेणार नाही. प्रत्येक गोष्ट सरकार करेल, याची लोकांना सवय झाली आहे. लोक आपली जबाबदारी विसरत चालले आहेत, असे ते म्हणाले.

यावेळी हळर्णकर म्हणाले, भटक्या गुरांची समस्या जटील बनली आहे. या गुरांमुळे अनेक अपघात होतात. ते टाळण्यासाठी सर्वांनी एकजूट होऊन काम करण्याची आवश्यकता आहे. गोशाळांनी पुढाकार घेऊन या भटक्या गुरांची सोय करावी, त्यासाठी लागत असलेला निधी पुरवण्यासाठी आमचे खाते समर्थ आहे.

ज्या प्रकारे भटक्या गुरांची समस्या सोडवण्यात आली आहे, त्याच प्रकारे शहरातील भटक्या तसेच जखमी कुत्र्यांवर उपचार करण्यासाठी शेल्टर उभे करण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशीही मागणी नगराध्यक्ष नाईक यांनी पशुसंवर्धन खात्याकडे केली आहे. यावेळी संतोष सतरकर, सुनील राठोड, संकेत तेंडुलकर, दिलीप नाईक, देवेंद्र ढवळीकर व जागेचे मालक भवानी पाटील यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन नितीन कोलवेकर यांनी केले, तर स्वागत योगीराज गोसावी यांनी केले. आभार विशांत नाईक यांनी मानले.

व्यावसायिक दृष्टिकोन ठेवा

गोशाळांकडे केवळ सामाजिक कार्य म्हणून न पाहता त्याकडे व्यावसायिक दृष्टीने पाहिले पाहिजे. आज बाजारात गोमूत्र, गोवऱ्या यांना मोठी मागणी आहे. गोसेवा करताना व्यवसाय करण्याची संधी आहे. यासाठी सरकार महिलांना व युवकांना पाठबळ द्यायला तयार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

कपिला गायीसाठी प्रतिदिन ८० रुपये

कपिला गायीचे दूध अत्यंत पौष्टिक व औषधी आहे. या गाईचे दूध एक लिटरवरून आठ लिटरपर्यंत नेण्याचे संशोधन आयसीआरने सुरू केले आहे. कपिला गाय कमी दूध देत असल्यामुळे अनेकांनी तिला सोडून दिले आहे. जर्सी गाय जास्त दूध देत असल्यामुळे तिचे पालन केले जात आहे. कपिला गायीचे संवर्धन करण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत. शेतकऱ्यांना कपिला गाय पालन करण्यासाठी प्रतिदिन ८० रुपये पशुसंवर्धन खात्यातर्फे दिले जातील. 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत