शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
4
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
5
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
6
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
7
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
8
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
9
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
10
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
11
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
12
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
13
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
14
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
15
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
16
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
17
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
18
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
19
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
20
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई

'कामधेनू'च्या गाई रस्त्यावर दिसल्यास अनुदान परत घेऊ! मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2024 13:13 IST

तशा सूचना पशुसंवर्धन खात्याच्या अधिकाऱ्यांना दिल्याचेही त्यांनी सांगितले. 

लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : पशुसंवर्धन खात्यातर्फे शेतकऱ्यांना कामधेनू योजनेच्या अंतर्गत एका गायीसाठी ६० हजार रुपये खर्च केले जातात. या योजने अंतर्गत घेतलेल्या गायी दूध काढल्यानंतर रस्त्यावर सोडलेल्या दिसल्यास संबंधितांसाठी कामधेनू योजना कायमची बंद करून दिलेले अनुदान परत घेतली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला आहे. तशा सूचना पशुसंवर्धन खात्याच्या अधिकाऱ्यांना दिल्याचेही त्यांनी सांगितले. 

शहरातील भटक्या गुरांची समस्या सोडवण्यासाठी पालिकेतर्फे व पिपल फॉर अॅनिमल यांच्या सहकार्याने निरंकार येथे गोशाळा उभारण्यात आली आहे. या गोशाळेचे उद्घाटन व गुरांचे पूजन मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास कृषिमंत्री रवी नाईक, सहकारमंत्री सुभाष शिरोडकर, पशुसंवर्धन मंत्री नीळकंठ हळर्णकर, खात्याचे संचालक डॉ. नितीन नाईक, नगराध्यक्ष रितेश नाईक, उपनगराध्यक्ष दीपा कोलवेकर, जिल्हा पंचायत सदस्य दीपक नाईक बोरकर, बेतोडाचे सरपंच मधू खांडेपारकर, पंच सदस्य गीता गावडे, जमिनीचे मालक भवानी प्रसाद पाटील, योगीराज गोसावी व विशांत नाईक, माजी नगरसेवक शांताराम कोळवेकर, मुख्याधिकारी योगीराज गोसावी, पंच सदस्य वैशाली सालेलकर, नंद नाईक, रूपक देसाई आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, निरंकाल येथे युवकांनी ज्या प्रकारे भटक्या गुरांची जबाबदारी घेण्यासाठी गोशाळा उभारली, त्याच प्रकारे सर्व बाराही तालुक्यांमध्ये गोशाळा झाल्या तर राज्यातील भटक्या गुरांची समस्या नक्कीच सुटेल. राज्यात होणाऱ्या अपघातामधील २५ टक्के अपघात हे केवळ भटक्या गुरांमुळे होतात. त्यामुळे कामधेनू योजनेच्या अंतर्गत घेण्यात आलेल्या गायी रस्त्यावर फिरताना दिसल्या तर ते खपवून घेणार नाही. प्रत्येक गोष्ट सरकार करेल, याची लोकांना सवय झाली आहे. लोक आपली जबाबदारी विसरत चालले आहेत, असे ते म्हणाले.

यावेळी हळर्णकर म्हणाले, भटक्या गुरांची समस्या जटील बनली आहे. या गुरांमुळे अनेक अपघात होतात. ते टाळण्यासाठी सर्वांनी एकजूट होऊन काम करण्याची आवश्यकता आहे. गोशाळांनी पुढाकार घेऊन या भटक्या गुरांची सोय करावी, त्यासाठी लागत असलेला निधी पुरवण्यासाठी आमचे खाते समर्थ आहे.

ज्या प्रकारे भटक्या गुरांची समस्या सोडवण्यात आली आहे, त्याच प्रकारे शहरातील भटक्या तसेच जखमी कुत्र्यांवर उपचार करण्यासाठी शेल्टर उभे करण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशीही मागणी नगराध्यक्ष नाईक यांनी पशुसंवर्धन खात्याकडे केली आहे. यावेळी संतोष सतरकर, सुनील राठोड, संकेत तेंडुलकर, दिलीप नाईक, देवेंद्र ढवळीकर व जागेचे मालक भवानी पाटील यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन नितीन कोलवेकर यांनी केले, तर स्वागत योगीराज गोसावी यांनी केले. आभार विशांत नाईक यांनी मानले.

व्यावसायिक दृष्टिकोन ठेवा

गोशाळांकडे केवळ सामाजिक कार्य म्हणून न पाहता त्याकडे व्यावसायिक दृष्टीने पाहिले पाहिजे. आज बाजारात गोमूत्र, गोवऱ्या यांना मोठी मागणी आहे. गोसेवा करताना व्यवसाय करण्याची संधी आहे. यासाठी सरकार महिलांना व युवकांना पाठबळ द्यायला तयार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

कपिला गायीसाठी प्रतिदिन ८० रुपये

कपिला गायीचे दूध अत्यंत पौष्टिक व औषधी आहे. या गाईचे दूध एक लिटरवरून आठ लिटरपर्यंत नेण्याचे संशोधन आयसीआरने सुरू केले आहे. कपिला गाय कमी दूध देत असल्यामुळे अनेकांनी तिला सोडून दिले आहे. जर्सी गाय जास्त दूध देत असल्यामुळे तिचे पालन केले जात आहे. कपिला गायीचे संवर्धन करण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत. शेतकऱ्यांना कपिला गाय पालन करण्यासाठी प्रतिदिन ८० रुपये पशुसंवर्धन खात्यातर्फे दिले जातील. 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत