शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

मी काही वाईट सिनेमाही लिहिले!

By admin | Updated: November 25, 2014 01:23 IST

पणजी : मी चांगले सिनेमा केले आहेत; पण मी काही वाईट सिनेमा लिहिले आहेत, असे ‘गँग्स आॅफ वासेपुर’ सिनेमाचे दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी सांगितले.

पणजी : मी चांगले सिनेमा केले आहेत; पण मी काही वाईट सिनेमा लिहिले आहेत, असे ‘गँग्स आॅफ वासेपुर’ सिनेमाचे दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी सांगितले. मी जे काही वाईट सिनेमा लिहिले, त्यांची मी नावे घेत नाही; कारण ते अन्य काही निर्र्मात्यांचे चित्रपट आहेत, असे कश्यप समूह मुलाखतीच्या कार्यक्रमावेळी म्हणाले. मला प्रत्येक वर्षी सिनेमा काढायचा आहे. जर माझे आदल्या वर्षीचे काम यशस्वी ठरले, तर मला दुसऱ्या वर्षी नवे काही करण्यास प्रेरणा मिळते. प्रत्येक सिनेमा तुम्हाला जास्त काही तरी करण्याचे स्वातंत्र्य देतो, असे कश्यप म्हणाले. कश्यप यांनी दिग्दर्शित केलेला ‘बॉम्बे वेल्वेट’ हा सिनेमा येत्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. सिनेमांच्या प्रदर्र्शनासाठी आम्हाला जास्त जागा हवी आहे व केंद्र सरकारने ती उपलब्ध करावी, असेही कश्यप म्हणाले. प्रादेशिक भाषांमध्ये काही खूप चांगले सिनेमा तयार होत आहेत. हिंदी चित्रपटांपेक्षाही काही तमिळ व मराठी चित्रपट हे चांगले आहेत, असे मला वाटते. मात्र, वितरणाबाबतच्या समस्यांमुळे ते सिनेमा चांगले असूनही जास्त प्रमाणात लोकांसमोर येत नाहीत, अशी खंत कश्यप यांनी व्यक्त केली. सिने निर्माते एकमेकास प्रोत्साहन देत नाहीत. जर एखादा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला नाही, तर लोक इंटरनेटवरून तो डाउनलोड करतात, असेही कश्यप म्हणाले. भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा गंभीरपणे घेण्याची गरज आहे. ती स्पर्धा नव्हे तर ते प्रदर्शन आहे, असेही त्यांनी नमूद केले. (खास प्रतिनिधी)