शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
4
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
5
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
6
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
7
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
8
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
9
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
10
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
11
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
12
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
13
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
14
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
15
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
16
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
17
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
18
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
19
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
20
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?

सर्जिकल स्ट्राईकद्वारे मी गोव्यावरील देशाच्या कर्जाची परतफेड केली - पर्रीकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2018 15:40 IST

गोव्याने देशाला कर्जाची परतफेड करण्याची गरज होतीच. सर्जिकल स्ट्राईकद्वारे ती केली गेली

पणजी : 19 डिसेंबर 1961 रोजी भारतीय लष्कराने गोव्यावर हल्ला करून पोर्तुगीजांच्या राजवटीतून गोव्याला मुक्त केले होते. भारत देशाचे अशा प्रकारे गोव्यावर कर्ज होते. मी त्या कर्जाची परतफेड संरक्षण मंत्रीपदी असताना सर्जिकल स्ट्राईकद्वारे केली असे मी समजतो, असे देशाचे माजी संरक्षण मंत्री व विद्यमान मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शनिवारी (15 जुलै ) सांगितले.

सर्जिकल स्ट्राईक हा शेवटी लष्करानेच केला होता पण राजकीय निर्णयाची गरज होती व त्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी नियोजनाची गरज होती. माझी भूमिका त्यासाठी कामी आली. गोव्याने देशाला कर्जाची परतफेड करण्याची गरज होतीच. सर्जिकल स्ट्राईकद्वारे ती केली गेली, असे मुख्यमंत्री म्हणाले. दिल्लीत मी ठराविक कालावधीसाठीच केंद्र सरकारला हवा होतो. मला दिल्लीत जाण्याची इच्छा नव्हती. केंद्राने बोलावल्यानंतर मी तिथे गेलो व संरक्षण मंत्री म्हणून मी समाधानकारक काम केले. मी स्वत: त्याविषयी समाधानी आहे, असे पर्रीकर यांनी नमूद केले. मी कुठेही असलो तरी शेवटी मला गोव्यातच राहणे आवडते. माझे हृदय गोव्यातच आहे, असेही पर्रीकर म्हणाले.

भारतीय हवाई दलाला तेजस विमाने माझ्यामुळे मिळाली. माझ्या कारकिर्दीत अशा अनेक गोष्टी घडल्या ज्या पूर्वी होत नव्हत्या. मेक इन इंडिया संरक्षण दलासाठी उत्कृष्ट ठरले. तेजस लढाऊ विमाने ही माझ्यामुळे आली, असे पर्रीकर म्हणाले. लढाऊ हेलिकॉप्टरचे रुप माझ्यामुळे विकसित झाले, असे पर्रीकर यांनी नमूद केले. सर्जिकल स्ट्राईक हा माझ्या संरक्षण मंत्रिपदाच्या कारकिर्दीतील मोठा टप्पा ठरला. सर्जिकल स्ट्राईकसाठी मोठे नियोजन लागते. त्याकामी मी योगदान दिले असे पर्रीकर म्हणाले.

गोवा सरकारने माहिती तंत्रज्ञान दिवसाचे शनिवार व रविवारी आयोजन केले आहे. शनिवारी आयटी दिवस उद्घाटन सोहळ्यात पर्रीकर बोलत होते. इनफोसिसचे माजी संचालक मोहनदास पै व माहिती व तंत्रज्ञान खात्याचे मंत्री रोहन खंवटे हे यावेळी उपस्थित होते. गोव्याला आयटीचे हब बनवायचे आहे. गोव्यात संगीत, कला, साहित्य, शिक्षण आदी सर्व क्षेत्रांमध्ये गुणी लोक आहेत. आयटी क्षेत्रातील बुद्धिवान गोमंतकीय युवा- युवती बंगळुरू, पुणे आदी ठिकाणी जाऊन काम करतात. मला गोव्यातच आयटीच्या संधी निर्माण करायच्या आहेत. परप्रांतांमध्ये जाणाऱ्यांनी येथेच रहावे व जे गेलेत त्यांनी गोव्याच्या आयटी क्षेत्रात परतून यावे अशा संधी येथे निर्माण करायच्या आहेत. गोव्यात एकेकाळी संधी नव्हत्या म्हणून संगीत क्षेत्रात करिअर घडविण्यासाठी मंगेशकर कुटुंबियांनाही गोवा सोडावा लागला होता, असे पर्रीकर म्हणाले.

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवा