शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
2
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
4
इस्रायलने ग्रेटा थनबर्गसह पाकिस्तानच्या माजी खासदाराला पकडले; गाझाकडे जात असताना समुद्रात अनेक जहाजं रोखली
5
हायप्रोफाईल चोर! विमानानं दिल्लीला जायचे अन् कार चोरायचे; ५ आलिशान कारसह ८३ लाखांचा माल जप्त
6
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
7
Video - "माझ्यासाठी सरकारी नोकरी विष, मी खूप थकलीय"; सायकोलॉजिस्ट ढसाढसा रडली
8
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
9
Delhi Encounter: कॉमेडियन मुनव्वर फारुकीच्या हत्येचा कट, दिल्लीत धुमश्चक्री; गोल्डी बरार गँगच्या दोन शूटर्संना बेड्या
10
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
11
जगातल्या अब्जाधीश कलाकारांमध्ये शाहरुख खानचा दबदबा कायम; श्रीमंत अभिनेत्रींमध्ये जुही चावलाचा समावेश
12
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
13
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
14
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
15
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
16
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
17
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
18
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
19
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
20
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...

सर्जिकल स्ट्राईकद्वारे मी गोव्यावरील देशाच्या कर्जाची परतफेड केली - पर्रीकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2018 15:40 IST

गोव्याने देशाला कर्जाची परतफेड करण्याची गरज होतीच. सर्जिकल स्ट्राईकद्वारे ती केली गेली

पणजी : 19 डिसेंबर 1961 रोजी भारतीय लष्कराने गोव्यावर हल्ला करून पोर्तुगीजांच्या राजवटीतून गोव्याला मुक्त केले होते. भारत देशाचे अशा प्रकारे गोव्यावर कर्ज होते. मी त्या कर्जाची परतफेड संरक्षण मंत्रीपदी असताना सर्जिकल स्ट्राईकद्वारे केली असे मी समजतो, असे देशाचे माजी संरक्षण मंत्री व विद्यमान मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शनिवारी (15 जुलै ) सांगितले.

सर्जिकल स्ट्राईक हा शेवटी लष्करानेच केला होता पण राजकीय निर्णयाची गरज होती व त्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी नियोजनाची गरज होती. माझी भूमिका त्यासाठी कामी आली. गोव्याने देशाला कर्जाची परतफेड करण्याची गरज होतीच. सर्जिकल स्ट्राईकद्वारे ती केली गेली, असे मुख्यमंत्री म्हणाले. दिल्लीत मी ठराविक कालावधीसाठीच केंद्र सरकारला हवा होतो. मला दिल्लीत जाण्याची इच्छा नव्हती. केंद्राने बोलावल्यानंतर मी तिथे गेलो व संरक्षण मंत्री म्हणून मी समाधानकारक काम केले. मी स्वत: त्याविषयी समाधानी आहे, असे पर्रीकर यांनी नमूद केले. मी कुठेही असलो तरी शेवटी मला गोव्यातच राहणे आवडते. माझे हृदय गोव्यातच आहे, असेही पर्रीकर म्हणाले.

भारतीय हवाई दलाला तेजस विमाने माझ्यामुळे मिळाली. माझ्या कारकिर्दीत अशा अनेक गोष्टी घडल्या ज्या पूर्वी होत नव्हत्या. मेक इन इंडिया संरक्षण दलासाठी उत्कृष्ट ठरले. तेजस लढाऊ विमाने ही माझ्यामुळे आली, असे पर्रीकर म्हणाले. लढाऊ हेलिकॉप्टरचे रुप माझ्यामुळे विकसित झाले, असे पर्रीकर यांनी नमूद केले. सर्जिकल स्ट्राईक हा माझ्या संरक्षण मंत्रिपदाच्या कारकिर्दीतील मोठा टप्पा ठरला. सर्जिकल स्ट्राईकसाठी मोठे नियोजन लागते. त्याकामी मी योगदान दिले असे पर्रीकर म्हणाले.

गोवा सरकारने माहिती तंत्रज्ञान दिवसाचे शनिवार व रविवारी आयोजन केले आहे. शनिवारी आयटी दिवस उद्घाटन सोहळ्यात पर्रीकर बोलत होते. इनफोसिसचे माजी संचालक मोहनदास पै व माहिती व तंत्रज्ञान खात्याचे मंत्री रोहन खंवटे हे यावेळी उपस्थित होते. गोव्याला आयटीचे हब बनवायचे आहे. गोव्यात संगीत, कला, साहित्य, शिक्षण आदी सर्व क्षेत्रांमध्ये गुणी लोक आहेत. आयटी क्षेत्रातील बुद्धिवान गोमंतकीय युवा- युवती बंगळुरू, पुणे आदी ठिकाणी जाऊन काम करतात. मला गोव्यातच आयटीच्या संधी निर्माण करायच्या आहेत. परप्रांतांमध्ये जाणाऱ्यांनी येथेच रहावे व जे गेलेत त्यांनी गोव्याच्या आयटी क्षेत्रात परतून यावे अशा संधी येथे निर्माण करायच्या आहेत. गोव्यात एकेकाळी संधी नव्हत्या म्हणून संगीत क्षेत्रात करिअर घडविण्यासाठी मंगेशकर कुटुंबियांनाही गोवा सोडावा लागला होता, असे पर्रीकर म्हणाले.

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवा