शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
4
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
5
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
6
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
7
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
8
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
9
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
10
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
11
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
12
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
13
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
14
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
15
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
16
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
17
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
18
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
19
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
20
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा

मी कुणाला बियर पिऊ नका म्हटले नाही  - पर्रिकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2018 17:36 IST

तुम्ही बियर पिऊ नका, असे मी कुणाला सांगितले नाही. मी फक्त त्याविषयी चिंता व्यक्त केली, असे निवेदन मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर  यांनी बुधवारी येथे मंत्रलयात पत्रकारांशी बोलताना केले.

पणजी : तुम्ही बियर पिऊ नका, असे मी कुणाला सांगितले नाही. मी फक्त त्याविषयी चिंता व्यक्त केली, असे निवेदन मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर  यांनी बुधवारी येथे मंत्रलयात पत्रकारांशी बोलताना केले.

आता मुली देखील बियर पितात अशा अर्थाचे विधान पर्रिकर  यांनी काही दिवसांपूर्वी जाहिर मुलाखतीमध्ये केल्यानंतर त्याबाबत देशात विविध अर्थानी चर्चा झाली. सोशल मीडियावर तर चर्चेचा महापूर आला. मात्र गेले काही दिवस पर्रिकर  यांनी त्याविषयी कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यानंतर पर्रिकर  यांनी पत्रकार परिषद घेतली व ते पर्यटक, वाढत्या साधनसुविधा, पर्यटकांची वाढती संख्या आणि एका मंत्र्याने पर्यटकांविषयी केलेले विषय यासह आपल्या बियरसंबंधीच्याही विधानाबाबत बोलले. कुठच्याच राजकारण्याने भाषा कठोर वापरू नये. प्रत्येक पर्यटकाचे गोव्यात स्वागत आहे. फक्त रस्त्यावर लघवी करू नये, कुठेही कचरा टाकू नये असे अपेक्षित आहे. केवळ पर्यटकच नव्हे तर स्थानिकांनी देखील रस्त्यावर कचरा टाकू नये, असे अपेक्षित असतेच व आहे, असे पर्रिकर  म्हणाले.राजकारण्यांनी केलेल्या विधानाचे विविध अर्थ लावले जातात, असे नमूद करून पर्रिकर  यांनी मग स्वत:चे उदाहरण दिले. आपण बियर पिऊ नका असे कुणालाच सांगितले नाही. आपण कुणालाच रोखले नाही. फक्त चिंता व्यक्त केली. आपण भीती देखील व्यक्त केली नाही. चिंता व्यक्त करणो हा माझा मूलभूत अधिकार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. काहीजणांनी सोशल मीडियावरून त्या माङया विधानाबाबत अनेक प्रकारचे अर्थ काढले. काही प्रसार माध्यमे मोठय़ा संख्येने कर्मचा-यांना सेवेतून एकदम कमी करतात, त्याविषयी देखील मी चिंता व्यक्त करतो. चिंता व्यक्त केली म्हणून माङो काही चुकत नाही, असे पर्रिकर यांनी नमूद केले.

दीड कोटी पर्यटकांसाठी गोवा 

दरम्यान, मंत्री विजय सरदेसाई यांच्या विधानांच्या अनुषंगाने पत्रकारांनी पत्र विचारताच मुख्यमंत्री म्हणाले की सध्या गोव्यात ज्या साधनसुविधा आहेत, त्या पाहता पन्नास ते साठ लाख पर्यटकांचा भार गोवा पेलू शकतो. मात्र तिसरा मांडवी पुल, नवा जुवारी पुल, पत्रदेवी ते पोळे महामार्ग अशा अनेक साधनसुविधा उभ्या राहिल्यानंतर दीड कोटी पर्यटकांना गोवा सामावून घेऊ शकेल. पर्यटन व्यवसायाचा विस्तार व्हायला हवा. तो अंतर्गत भागांमध्ये विस्तारायला हवा. एका खनिज व्यवसायावर आम्ही अवलंबून राहू शकत नाही आणि केवळ पर्यटनावरच सुद्धा अवलंबून राहू शकत नाही. मी अर्थसंकल्पात पर्यटनाच्या विस्ताराविषयी सविस्तर भाष्य करीन. मंत्र्याला पर्यटकांविषयी जे काही म्हणायचे होते, त्यामागिल हेतू योग्य असावा, फक्त भाषा जास्त कठोर वापरू नये व संबंधित मंत्र्यानेही ते मान्य केले आहे.

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवा