शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

बेकायदा बांधकामांना वीज, पाणी जोडण्या कशा? हायकोर्टाचा सवाल, सरकारला कार्यवाही करायचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2024 07:38 IST

पंचायतींवर ठेवला ठपका, हायकोर्टाने राज्यातील सर्वच बेकायदा बांधकामांची तसेच अतिक्रमणांची चौकशी करण्याचा आदेश दिला होता.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यातील बेकायदा बांधकामे आणि अतिक्रमणांच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्यागोवा खंडपीठाने घेतलेल्या स्वेच्छा याचिकेवर मंगळवारी सुनावणी सुरू झाली आहे. या बेकायदा बांधकामांना वीज जोडण्या आणि पाणी जोडण्या कशा काय मिळतात, असा प्रश्न न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक आणि न्यायमूर्ती वाल्मीकी मिनेझिस यांच्या न्यायपीठाने केला.

मंगळवारी या प्रकरणात सुनावणी सुरू झाली, तेव्हा न्यायालयाने अशा बेकायदा वास्तूंना पाणीपुरवठा आणि वीजजोडण्या देण्याच्या बाबतीत माहिती विचारली. बेकायदेशीर इमारतींना वीजजोडण्या आणि पाणीपुरवठा कोणत्या आधारे दिल्या जातात. यामुळेच बेकायदेशीर बांधकामांना प्रोत्साहन मिळत असल्याचेही निरीक्षण नोंदविले. तसेच पंचायतराज कायद्यातील तरतुदींवरही चर्चा झाली आणि स्थानिक पंचायतींकडून पंचायतराज कायद्याचे पालन करून घेण्यास अपयश आल्याचेही निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. सरकारकडून याची दखल घेण्याची ही वेळ असून खबरदारीच्या उपाययोजना केल्या जाव्यात, असेही सुनावले. मागील आठवड्यात बार्देशातील काही बेकायदा बांधकामे पाडली होती.

सर्व बेकायदा अतिक्रमणांची चौकशी करण्याचा आदेश

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती भारत देशपांडे यांच्या न्यायपीठाने १८ ऑक्टोबर रोजी चिखली येथील बेकायदा बांधकामे आणि अतिक्रमणांविषयी याचिकेवर सुनावणी घेत असताना राज्यातील सर्वच बेकायदा बांधकामांची तसेच अतिक्रमणांची चौकशी करण्याचा आदेश दिला होता. या प्रकरणात स्वेच्छा याचिका दाखल करून घेतली जात असल्याचे जाहीर केले होते. अॅड. विठ्ठल नाईक हे य या प्रकरणात अॅमिकस क्युरी म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत.

 

टॅग्स :goaगोवाHigh Courtउच्च न्यायालय