शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

गोव्यात टॅक्सीवाल्यांसमोर सरकार का नमले? नेटीझन्सकडून टीकेचा भडीमार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2018 13:57 IST

सलग तीन दिवस गोव्यातील हजारो टॅक्सी व्यवसायिकांनी संप पुकारून पर्यटकांना आणि स्थानिकांनाही वेठीस धरले.

पणजी- सलग तीन दिवस गोव्यातील हजारो टॅक्सी व्यवसायिकांनी संप पुकारून पर्यटकांना आणि स्थानिकांनाही वेठीस धरले. आपण टॅक्सीव्यवसायिकांसमोर यावेळी झुकणार नाही, अशी भूमिका घेत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी टॅक्सींना स्पीड गवर्नर लावावेच लागतील, असे शनिवारी जाहीर केले आणि रविवारी मात्र नेमकी वेगळी भूमिका घेत सरकार टॅक्सी व्यवसायिकांसमोर पूर्णपणो नमले. सोशल मिडियावरून याबाबत नेटीझन्सनी टीकेची झोड उठविली आहे.

कर्नाटक, महाराष्ट्र, दिल्ली वगैरे सर्वत्र टॅक्सींना स्पीड गवर्नर लावले जातात, मग गोव्यातील टॅक्सी व्यवसायिकांचेच काय बिघडते असा प्रश्न शनिवारी मुख्यमंत्री पर्रीकर यांनी विचारला होता. त्यांनी पत्रकार परिषदेत केंद्र सरकारच्या अधिसूचनाही सादर केल्या होत्या. खरे म्हणजे गेल्या मे महिन्यातच स्पीड गवर्नर लावणे बंधनकारक झाले आहे. पण आम्ही अगोदरच सहा महिन्यांची मुदत टॅक्सी व्यवसायिकांना दिली व सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करण्याचा धोका पत्करला आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले होते व यावेळी स्पीड गवर्नर टॅक्सी व्यवसायिकांना लावावेच लागतील असे सरकारने स्पष्ट केले होते. 

भाजपाचे आमदार तथा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष निलेश काब्राल यांनीही मोठ्या वल्गना चालविल्या होत्या. साडेचार हजार खासगी टॅक्सीवाल्यांनी स्पीड गवर्नर बसवले आहेत, असा दाखलाही सरकार देऊन संपकरी टॅक्सी व्यवसायिकांविरुद्ध युक्तीवाद करत होते. सरकारला गोव्यात समाजाच्या विविध घटकांकडून या प्रश्नावर सहानुभूती मिळत होती व संप करणाऱ्या टॅक्सी व्यवसायिकांविषयी चिड निर्माण होत होती पण चोवीस तासांनंतर लगेच सरकारने भूमिका बदलली. जर वितरक उपलब्ध नसतील व पुरेशा प्रमाणात स्पीड गवर्नर मिळत नसतील तर काही कालावधीसाठी वाहनधारकांना स्पीड गवर्नरबाबत सवलत देण्याचा राज्य सरकारला अधिकार आहे, असे पत्र दि. 21 डिसेंबर 2017 रोजी केंद्रीय रस्ता व महामार्ग वाहतूक मंत्रलयाकडून सर्व राज्यांना पाठविले गेले होते. 

सरकारने रविवारी या पत्राचा आधार घेतला व पळवाट काढत टॅक्सी व्यवसायिकांना जिंकण्यास मदत केली. हे पत्र शनिवारी सरकारला ठाऊक नव्हते का असे प्रश्न फेसबुक व ट्विटरवरून आता नेटीझन्स सरकारला विचारत आहेत. सरकारचे वाहतूक खाते काय करते, वाहतूक खात्याचे संचालक निखिल देसाई यांना या पत्रची कल्पना नव्हती काय असे देखील विचारले जात आहे. आम्ही न्यायालयाचा अवमान करण्याचा धोका यापूर्वी पत्करला आहे, आता आम्ही काहीच करू शकत नाही असे शनिवारी सांगणारे व त्याबाबत लोकांचा पाठींबाही मिळवणारे सरकार रविवारी मात्र आमदार मायकल लोबो व अन्य काहीजणांच्या आग्रहानंतर यु-टर्न घेतं. यावरून टॅक्सी व्यवसायिकांना आपल्या संपासमोर सरकार कसे कमकुवत झाले आहे ते कळून चुकले. यामुळे त्यांनी ठराविक कालावधीनंतर पुन्हा संपावर जाण्याचाही इशारा देऊन ठेवला आहे. सोशल मिडियावर याविषयावरून सरकारची नाचक्की सुरू आहे. बार्देश तालुक्यातील साळगाव, कळंगुट, शिवोली या मतदारसंघात अनेक टॅक्सी व्यवसायिक राहतात. एका व्यवसायिकाकडे दहा टॅक्सी अशी देखील स्थिती आहे. मुरगाव व सासष्टी तालुक्यातही टॅक्सी व्यवसायिक राहतात. उपसभापती लोबो यांच्यासह मंत्री जयेश साळगावकर, विनोद पालयेकर, विजय सरदेसाई तसेच आमदार दिगंबर कामत, लुईङिान फालेरो आदींनी संपकरी टॅक्सी व्यवसायिकांविषयी सहानुभूती दाखवली. टॅक्सी व्यवसायिक छोटय़ा प्रवासाला देखील प्रचंड भाडे आकारतात व त्यामुळे गोमंतकीयांत व पर्यटकांतही त्यांच्याबाबत चिड आहे. त्यामुळे सरकारने कठोरपणो टॅक्सी व्यवसायिकांशी वागावे असे लोकांना अपेक्षित होते पण काही राजकारणी व सरकार त्याबाबत पूर्णपणो कमी पडले. सरकारने आणखी एक यु-टर्न घेतला अशी टीका सोशल मीडियावरून सुरू आहे. 

टॅग्स :goaगोवाStrikeसंपManohar Parrikarमनोहर पर्रीकर