शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

हॉस्पिसियोच्या छपराचा पंखा तुटून महिला जखमी; सार्वजनिक बांधकाम खात्याला कळवूनही खाते सुस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 18:44 IST

मोडकळीस आलेल्या हॉस्पिसियोच्या महिला वॉर्डातील छपराचा पंखा तुटून खाली पडल्याने एक रुग्ण महिला जखमी झाली.

 

मडगाव: मोडकळीस आलेल्या हॉस्पिसियोच्या महिला वॉर्डातील छपराचा पंखा तुटून खाली पडल्याने एक रुग्ण महिला जखमी झाली. यानंतर युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हॉस्पिसियोच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. आयरा आल्मेदा यांना घेराव घातला असता या वॉर्डाच्या दुरुस्तीबद्दल सार्वजनिक बांधकाम खात्याला मागच्या ऑक्टोबर महिन्यातच कळविले होते. मात्र त्या खात्याच्या अभियंत्यांनी पुढे काहीच केले नसल्याचे उघड झाले.गुरुवारी सकाळी ही दुर्घटना घडली. तीव्र मधुमेहाच्या रुग्ण असलेल्या बोर्डा मडगाव येथील रामरती नास्नोडकर या महिलेला हॉस्पिसियोत दाखल करण्यात आले होते. ती खाटीवर झोपली असताना वरचा पंखा तुटून तिच्या पायावर पडला. या रुग्ण महिलेच्या खाटेखाली जमिनीवर आणखी एका वृद्ध रुग्ण महिलेला झोपवले होते. हा पंखा तिच्या बाजूला पडला त्यामुळे ती बचावली. या वॉर्डातील छप्पराचा पंखा तुटून पडण्याची ही दुसरी घटना असून या वॉर्डची तातडीने दुरुस्ती करण्याची गरज व्यक्त केली असतानाही सार्वजनिक बांधकाम खात्याकडून याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले.हॉस्पिसियोची ही इमारत दीडशे वर्षापेक्षा जुनी असून ती पूर्णत: मोडकळीस आली आहे. यापूर्वी एका वॉर्डचा सज्जा तुटूनही एक रुग्ण जखमी झाला होता. अशातच या इस्पितळात रुग्णांना झोपण्यासाठी खाटांची कमतरता असल्याने रुग्णांना जमिनीवरच झोपविले जाते. मडगावात नवीन इस्पितळ बांधून तयार झाले असले तरी काही किरकोळ दुरुस्त्या करण्याचे काम बाकी असल्याने ही इमारत अजून चालू झालेली नाही. दरम्यान बोर्डातील सामाजिक कार्यकर्ते कामिल बर्ाेटो यांनी या घटनेबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करताना 15 जानेवारीपर्यंत जर नवीन इस्पितळ सुरू झाले नाही किंवा त्याबद्दल आम्हाला ठाम आश्वासन मिळाले नाही तर रास्ता रोको करण्याचा इशारा दिला. यासंदर्भात बर्ाेटो यांनी नंतर फातोर्डा पोलीस स्थानकात तक्रारही दाखल केली असून हॉस्पिसियोच्या अधिका-यांवर हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून गुन्हा नोंद करावा, अशी मागणी केली आहे.सायंकाळी युवा काँग्रेसचे अध्यक्ष वरद म्हादरेळकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वैद्यकीय अधीक्षकांना घेराव घातला. या इस्पितळात असलेल्या कर्मचा-यांकडून रुग्णांना अगदी हीन वागणूक दिली जाते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. जर अशा तक्रारी असल्यास त्या आपल्याला सांगा त्या कर्मचा-यांवर कारवाई करू, असे यावेळी डॉ. आल्मेदा यांनी सांगितले.